शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 06:00 IST

हमीभाव अथवा ५१०० क्विंटलने कापूस खरेदी सुरू करावी, या मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर शेतकऱ्यांनी चक्काजाम केले. व्यापाऱ्यांनी केवळ ४१०० ते ४२०० रुपये दराने खरेदी सुरू केल्याने शेतकरी संतापले. कापूस विक्रीसाठी आलेल्या बैलगाड्या आणि इतर प्रकारची वाहने रस्त्यावर आडवी लावण्यात आली. दुपारी बाजार समितीचे सभापती अ‍ॅड.प्रफुल्ल मानकर, व्यापाऱ्यांच्यावतीने बाळू धुमाळ आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाली.

ठळक मुद्देराळेगावात बैलगाड्या रस्त्यावर : भाव पाडून कापूस खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : व्यापाऱ्यांनी केवळ ४१०० ते ४२०० रुपये क्विंटलने कापूस खरेदी सुरू केल्याने संतप्त शेतकºयांनी शुक्रवारी रास्ता रोको केला. यामुळे राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा चंद्रपूर-वर्धा-हिंगणघाट मार्ग बंद झाला होता. तब्बल तीन तासपर्यंत बैलबंड्या आडव्या करून रस्ता रोखण्यात आला होता. यामुळे दोन्ही बाजूने विविध प्रकारच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर ४८०० रुपये दराने खरेदी सुरू करण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.हमीभाव अथवा ५१०० क्विंटलने कापूस खरेदी सुरू करावी, या मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर शेतकऱ्यांनी चक्काजाम केले. व्यापाऱ्यांनी केवळ ४१०० ते ४२०० रुपये दराने खरेदी सुरू केल्याने शेतकरी संतापले. कापूस विक्रीसाठी आलेल्या बैलगाड्या आणि इतर प्रकारची वाहने रस्त्यावर आडवी लावण्यात आली. दुपारी बाजार समितीचे सभापती अ‍ॅड.प्रफुल्ल मानकर, व्यापाऱ्यांच्यावतीने बाळू धुमाळ आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाली. ४८०० रुपये क्विंटलने खरेदी करण्याचे ठरल्यानंतर चक्काजाम मागे घेण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदविल्या. व्यापारी शेतकऱ्यांना अडचणीत पकडत आहे. हमीभाव तर दूर कितीतरी कमी दरामध्ये कापूस खरेदी केली जात आहे. विविध कारणांमुळे आम्ही आधीच अडचणीत आलेलो आहोत. आता व्यापारी त्यात भर टाकत आहे, अशा प्रतिक्रिया महेश हिवरकर, जशा पवार, नारायण भूत, सुनील जामलाटे, मयूर पवार आदी शेतकऱ्यांनी नोंदविल्या.१५ पर्यंत खरेदी बंदजिल्ह्यात केवळ राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने शुक्रवारपासून कापूस खरेदी सुरू केली. मात्र पहिल्याच दिवशी त्याला गालबोट लागल्याने ही खरेदी १५ नोव्हेंबरपर्यंत थांबविली जात असल्याचे बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती