शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी धान्य विक्रीस काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:00 IST

तूर, हरभरा, गहू, सोयाबीन ही प्रमुख पिके बाजारात विक्रीसाठी आले आहेत. दरवर्षी या शेतमालाचे दर जून महिन्यात वाढतात. यावर्षी शेतमालाची आवक वाढल्याने बाजारपेठेत दर नियंत्रणाखाली आले आहे. सोयाबीनच्या दरात मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सोयाबीनचे दर चार हजारांवर पोहोचतील, असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात सोयाबीनचे दर ३४०० ते ३७०० पर्यंतच मर्यादित राहिले आहे.

ठळक मुद्देखरिपातील पेरणीसाठी पैशाची तजवीज : बाजार समित्या हाऊसफुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पावसाळा तोंडावर येवून पोहोचला आहे. तत्पूर्वी पेरणीची तजवीज करण्यासाठी राखून ठेवलेले धान्य शेतकऱ्यांनी विक्रीसाठी काढले आहे. यातून बाजारात एकच गर्दी उसळली आहे. यामुळे पावसाळ््याच्या तोंडावर हातात पडणारी दरवाढ शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.दरवर्षी शेतकरी पेरणीसाठी काही धान्य राखून ठेवतात. दर वाढण्याची शक्यता असणाऱ्या धान्याचा यामध्ये समावेश आहे. यावर्षी कोरोनामुळे संपूर्ण गणितच बिघडले आहे. कुठल्याही धान्याची दरवाढ झाली नाही, उलट शेतमालाच्या किंमतीत घसरण नोंदविण्यात आली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.तूर, हरभरा, गहू, सोयाबीन ही प्रमुख पिके बाजारात विक्रीसाठी आले आहेत. दरवर्षी या शेतमालाचे दर जून महिन्यात वाढतात. यावर्षी शेतमालाची आवक वाढल्याने बाजारपेठेत दर नियंत्रणाखाली आले आहे. सोयाबीनच्या दरात मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सोयाबीनचे दर चार हजारांवर पोहोचतील, असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात सोयाबीनचे दर ३४०० ते ३७०० पर्यंतच मर्यादित राहिले आहे. हरभराच्या बाबतीतही असेच घडले आहे. हरभऱ्याचे दर ३४०० ते ३६०० पर्यंत स्थिर राहिले आहे. तुरीच्या दरानेही शेतकऱ्यांना दगा दिला. ४७०० ते ५२०० रुपये क्ंिवटल दराने तुरीची खरेदी होत आहे. गव्हाचे दर १६०० ते १७०० रुपये क्ंिवटलपर्यंत मर्यादित आहे. यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची अपेक्षा होती. मात्र दरवाढ मिळाली नाही, उलट वजन घटल्याने शेतकऱ्यांना कमी पैसे आणि कमी दर शेतमाल विकून हातात आला आहे. या पैशांवर शेतकऱ्यांना पेरणीचे नियोजन करावे लागणार आहे.पावसाचा अंदाज आणि गर्दीचा ओघहवामान विभागाने ११ ते १५ जून या कालावधीत पावसाचा जोर राहणार असल्याचे म्हटले आहे. बाजार समितीच्या आवारात शेतमालाचा सुरक्षित लिलाव करता यावा यासाठी पुरेशे शेड उपलब्ध नाहीत. यामुळे बाजारात धान्य विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना शेतमाल संरक्षणाचीही जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी