शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

शेतकऱ्यांनी शेतात गाळ टाकून समृद्धीची गुढी उभारावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 11:56 PM

ऑनलाईन लोकमतघाटंजी : ग्रामविकास व जलसंधारण विभागातर्फे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, या महत्त्वाकांक्षी योजनेतून धरणातून सुपीक गाळ काढून शेतकऱ्यांनी तो आपल्या शेतात टाकून शेतीसमृद्धीची गुढी उभारावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.तालुक्यातील सावरगड येथे तलावातील गाळ काढण्याच्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, शेतात गाळ टाकल्याने शेती उत्पादनात ...

ठळक मुद्देराजेश देशमुख : सावरगड येथे जलयुक्त शिवारअंतर्गत धरणातील गाळ उपसा कार्यक्रम

ऑनलाईन लोकमतघाटंजी : ग्रामविकास व जलसंधारण विभागातर्फे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, या महत्त्वाकांक्षी योजनेतून धरणातून सुपीक गाळ काढून शेतकऱ्यांनी तो आपल्या शेतात टाकून शेतीसमृद्धीची गुढी उभारावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.तालुक्यातील सावरगड येथे तलावातील गाळ काढण्याच्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, शेतात गाळ टाकल्याने शेती उत्पादनात वाढ होणार आहे. गाव क्षेत्रात पाणीसाठा वाढून पिण्याच्या पाण्याची समस्याही दूर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. गुढीपाडव्याचे औचित्य साधून पंचायत समिती सदस्य सुनंदा भुजाडे यांच्या अध्यक्ष्यतेत सावरगड येथे गाळ काढण्याच्या कामाची सुरुवात झाली. अस्मिता संस्था, यवतमाळ यांनी केअरिंग फ्रेंड्स मुंबई व विकासगंगा संस्था घाटंजी यांच्या सहकार्याने हे काम सुरू केले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, यवतमाळचे तहसीलदार सचिन शेजाळ, सूरज शिंदे, रणजीत बोबडे, सरपंच हरिदास खडसे, उपसरपंच सुहास सरगर, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. धरणांमध्ये दरवर्षी साठत असलेल्या गाळामुळे पाणी साठवणूक क्षमतेत घट होत आहे. हा गाळ उपसा करून शेतात टाकल्यास धरणांची मूळ साठवणूक क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात भरीव वाढ होते, असे मत उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी व्यक्त केले. तहसीलदार सचिन शेजाळ, शिंदे, रणजीत बोबडे यांनीही मार्गदर्शन केले.सावरगड सिंचन तलावातून ४० हजार घनमीटर गाळ निघणार असून तो शेतात टाकण्याची तयारी शेतकऱ्यांनी दर्शविली. या कामाचा लाभ सावरगड परिसरातील पाच गावांतील शेतकºयांना होणार असल्याचे संगीता गायकवाड यांनी सांगितले. अमित गाडबैल, विनोद गुजलवार यांनी क्षेत्रीय प्रक्रिया पूर्ण केली.