शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
7
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
8
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
11
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
12
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
13
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
14
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
15
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
16
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
17
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
18
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
19
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
20
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे

By admin | Updated: July 23, 2015 02:29 IST

वाढती महागाई, खत, बी-बियाणे व औषधींचे गगनाला भिडलेले दर यामुळे सध्या शेतकरी, शेतमजूर अडचणीत आला आहे.

निवेदन : शेतकरी संघटनेची मागणी, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारापुसद : वाढती महागाई, खत, बी-बियाणे व औषधींचे गगनाला भिडलेले दर यामुळे सध्या शेतकरी, शेतमजूर अडचणीत आला आहे. उत्पादन खर्च जास्त व हमीभाव कमी असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारने हमीभाव व इतर मागण्या मान्य करून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करावे, अन्यथा शेतकरी संघटना लोकशाही मार्गाने उपोषण आंदोलन करेल असा इशारा शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी शासनाला दिलेल्या निवेदनातून दिला आहे. देशात ६५ टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. वाढत्या महागाईने शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पादन खर्च वाढला असूनसुद्धा हमीभाव मात्र कमी असल्याने शेतकरीवर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. कापसाचा हमीभाव सात हजार रुपये क्विंटल, तुर डाळ सहा हजार रुपये व सोयाबीन चार हजार रुपये प्रती क्विंटल असा हमीभाव केंद्र व राज्य सरकारने वाढून द्यावा तसेच शेतीपंपासाठी सलग १२ तास वीज उपलब्ध करून द्यावी, शेतकऱ्यांना तीन हजार रुपये पेन्शन योजना द्यावी, शेतकऱ्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करावी, संपूर्ण कर्जमाफी शासनाने द्यावी, शेतकऱ्यांचा पीक विमा शासनाने भरावा, डॉ. स्वामीनाथन समितीच्या शिफारसी लागू कराव्यात व इतर मागण्यांचे निवेदन शेतकरी संघटनेच्या पुसद शाखेच्यावतीने उपविभागीय अधिकारी चंद्रकांत जाजू यांना देण्यात आले. सदर निवेदन वरिष्ठांना पाठविण्याचे आश्वासन यावेळी जाजू यांनी दिले. यावेळी शेतकरी संघटनेचे संजय पोंगाडे, रमेश ठाकरे, नारायण पुलाते, शेख अयुब, गजानन ठाकरे, गजानन शामसुदंर, रवींद्र तायडे, गोपाल अडसड, विष्णू आडे, विजय सुकळकर, मनोहर ठाकरे, धनंजय तोंडारे, आप्पाराव मस्के, उत्तम जाधव, गजानन महाजन, प्रमोद शिंदे, नूर ठेकेदार, समाधान कन्हाळे आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)