शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे

By admin | Updated: July 23, 2015 02:29 IST

वाढती महागाई, खत, बी-बियाणे व औषधींचे गगनाला भिडलेले दर यामुळे सध्या शेतकरी, शेतमजूर अडचणीत आला आहे.

निवेदन : शेतकरी संघटनेची मागणी, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारापुसद : वाढती महागाई, खत, बी-बियाणे व औषधींचे गगनाला भिडलेले दर यामुळे सध्या शेतकरी, शेतमजूर अडचणीत आला आहे. उत्पादन खर्च जास्त व हमीभाव कमी असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारने हमीभाव व इतर मागण्या मान्य करून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करावे, अन्यथा शेतकरी संघटना लोकशाही मार्गाने उपोषण आंदोलन करेल असा इशारा शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी शासनाला दिलेल्या निवेदनातून दिला आहे. देशात ६५ टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. वाढत्या महागाईने शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पादन खर्च वाढला असूनसुद्धा हमीभाव मात्र कमी असल्याने शेतकरीवर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. कापसाचा हमीभाव सात हजार रुपये क्विंटल, तुर डाळ सहा हजार रुपये व सोयाबीन चार हजार रुपये प्रती क्विंटल असा हमीभाव केंद्र व राज्य सरकारने वाढून द्यावा तसेच शेतीपंपासाठी सलग १२ तास वीज उपलब्ध करून द्यावी, शेतकऱ्यांना तीन हजार रुपये पेन्शन योजना द्यावी, शेतकऱ्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करावी, संपूर्ण कर्जमाफी शासनाने द्यावी, शेतकऱ्यांचा पीक विमा शासनाने भरावा, डॉ. स्वामीनाथन समितीच्या शिफारसी लागू कराव्यात व इतर मागण्यांचे निवेदन शेतकरी संघटनेच्या पुसद शाखेच्यावतीने उपविभागीय अधिकारी चंद्रकांत जाजू यांना देण्यात आले. सदर निवेदन वरिष्ठांना पाठविण्याचे आश्वासन यावेळी जाजू यांनी दिले. यावेळी शेतकरी संघटनेचे संजय पोंगाडे, रमेश ठाकरे, नारायण पुलाते, शेख अयुब, गजानन ठाकरे, गजानन शामसुदंर, रवींद्र तायडे, गोपाल अडसड, विष्णू आडे, विजय सुकळकर, मनोहर ठाकरे, धनंजय तोंडारे, आप्पाराव मस्के, उत्तम जाधव, गजानन महाजन, प्रमोद शिंदे, नूर ठेकेदार, समाधान कन्हाळे आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)