शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे

By admin | Updated: July 23, 2015 02:29 IST

वाढती महागाई, खत, बी-बियाणे व औषधींचे गगनाला भिडलेले दर यामुळे सध्या शेतकरी, शेतमजूर अडचणीत आला आहे.

निवेदन : शेतकरी संघटनेची मागणी, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारापुसद : वाढती महागाई, खत, बी-बियाणे व औषधींचे गगनाला भिडलेले दर यामुळे सध्या शेतकरी, शेतमजूर अडचणीत आला आहे. उत्पादन खर्च जास्त व हमीभाव कमी असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारने हमीभाव व इतर मागण्या मान्य करून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करावे, अन्यथा शेतकरी संघटना लोकशाही मार्गाने उपोषण आंदोलन करेल असा इशारा शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी शासनाला दिलेल्या निवेदनातून दिला आहे. देशात ६५ टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. वाढत्या महागाईने शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पादन खर्च वाढला असूनसुद्धा हमीभाव मात्र कमी असल्याने शेतकरीवर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. कापसाचा हमीभाव सात हजार रुपये क्विंटल, तुर डाळ सहा हजार रुपये व सोयाबीन चार हजार रुपये प्रती क्विंटल असा हमीभाव केंद्र व राज्य सरकारने वाढून द्यावा तसेच शेतीपंपासाठी सलग १२ तास वीज उपलब्ध करून द्यावी, शेतकऱ्यांना तीन हजार रुपये पेन्शन योजना द्यावी, शेतकऱ्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करावी, संपूर्ण कर्जमाफी शासनाने द्यावी, शेतकऱ्यांचा पीक विमा शासनाने भरावा, डॉ. स्वामीनाथन समितीच्या शिफारसी लागू कराव्यात व इतर मागण्यांचे निवेदन शेतकरी संघटनेच्या पुसद शाखेच्यावतीने उपविभागीय अधिकारी चंद्रकांत जाजू यांना देण्यात आले. सदर निवेदन वरिष्ठांना पाठविण्याचे आश्वासन यावेळी जाजू यांनी दिले. यावेळी शेतकरी संघटनेचे संजय पोंगाडे, रमेश ठाकरे, नारायण पुलाते, शेख अयुब, गजानन ठाकरे, गजानन शामसुदंर, रवींद्र तायडे, गोपाल अडसड, विष्णू आडे, विजय सुकळकर, मनोहर ठाकरे, धनंजय तोंडारे, आप्पाराव मस्के, उत्तम जाधव, गजानन महाजन, प्रमोद शिंदे, नूर ठेकेदार, समाधान कन्हाळे आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)