शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

सडलेले पीक दाखवत शेतकऱ्यांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 06:00 IST

केंद्राच्या पथकाने शुक्रवारी नेर तालुक्यातील वटफळी, लोणी, मोझर, घारेफळ, सातेफळ शिवारात धावता दौरा केला. शेतकऱ्यांनी यावेळी प्रत्यक्ष आपल्या व्यथा मांडल्यावरील पथकातील अधिकारी मात्र शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडीमार करीत होते. त्यामुळे या पथकाला सोयाबीन, कापूस पिकाची कितपत माहिती असावी याबाबत शेतकऱ्यांनी शंका व्यक्त केली.

ठळक मुद्देकेंद्रीय पथक : नेर तालुक्यातील पाच शिवारात पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : परतीचा पावसाने झालेल्या नुकसानीची महिनाभरानंतर केंद्रीय पथकाने शुक्रवारी शेतांना भेटी देऊन पाहणी केली. नेर तालुक्यातील शेतशिवारात हे पथक पोहोचताच शेतकऱ्यांनी सडलेले सोयाबीन दाखवित मदतीसाठी आक्रोश केला.केंद्राच्या पथकाने शुक्रवारी नेर तालुक्यातील वटफळी, लोणी, मोझर, घारेफळ, सातेफळ शिवारात धावता दौरा केला. शेतकऱ्यांनी यावेळी प्रत्यक्ष आपल्या व्यथा मांडल्यावरील पथकातील अधिकारी मात्र शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडीमार करीत होते. त्यामुळे या पथकाला सोयाबीन, कापूस पिकाची कितपत माहिती असावी याबाबत शेतकऱ्यांनी शंका व्यक्त केली. वटफळी येथे दुपारी ओंकार खोब्रागडे, प्रफुल्ल गायनर, बबन केंबल, कोमल जैन, प्रशांत चौधरी आदींच्या पिकांची पाहणी केली. मागील वर्षीची मदत अजूनही मिळाली नसल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले. त्यानंतर पथकाने लोणी येथील बांगर यांच्या कपाशीची पाहणी केली. नंतर हे पथक मोझर येथील राजेंद्र साखरकर यांच्या शेतात पोहोचले. त्यांनी सोयाबीनची अवस्था पथकाला सांगितल्यावरही अधिकाºयांनी पाऊस कधी आला, पेरणी कधी केली, पीक केव्हा काढले अशी चोरासारखी चौकशी सुरू केली. याबाबत सरपंच गजानन गासे, मनोहर साखरवाडे, राहुल काळे, सुरेश दानखडे, गजानन चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. कपाशीची बोंडे अतिपावसामुळे बारिक झाल्याची माहिती लोणी येथे प्रहारचे तालुका प्रमुख गोपाल चव्हाण यांनी दिल्यावरही बारिक बोंडांनी काय फरक पडतो असा उलट प्रश्न पथकातील अधिकाºयांनी विचारला.या पथकात डॉ.आर.पी. सिंह यांच्यासह विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, दारव्हा एसडीओ इब्राहीम चौधरी, एसएओ नवनाथ कोळपकर, नेरचे तहसीलदार अमोल पोवार, गटविकास अधिकारी युवराज मेहेत्रे, जिल्हा परिषद सदस्य निखील जैत, कृषी अधिकारी नामदेव कुमरे, नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुंटलावार, तलाठी भारती धांदे, एस.आर. माहुरे उपस्थित होते. जिल्ह्यातील परिस्थितीचा अहवाल पाठवून शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यावेळी सांगितले. तर केंद्रीय पाहणीचा अहवाल जाईपर्यंत शेतकरी कशाच्या आधारे जगेल असा सवाल जिल्हा परिषद सदस्य निखील जैत यांनी उपस्थित केला.सडलेल्या सोयाबीनचे मांडले दुकानघारेफळ येथे अनिल खोडे यांच्या शेतातील कपाशीची पाहणी केली. तर सातेफळ येथील शेतकºयांनी नेर बाजार समितीचे सभापती रवींद्र राऊत यांच्या नेतृत्वात सडलेले सोयाबीन व कपाशीची बोंडे रस्त्यावर आणून टाकली. यावेळी हिंमत धोटे, संतोष किरकीटे, भास्कर किरकीटे, विजय हळदे, अरुण काळे, सुमन पिसोळे, राहुल ठोंबरे, गणेश खोडे यांनी रस्त्यावर सडलेल्या सोयाबीनचे आणि कपाशीचे स्टॉल लावले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी