शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्या विकासाचा पराभव

By admin | Updated: March 20, 2016 02:22 IST

शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर हमीभाव मिळत नाही. म्हणूनच मी माझ्या अध्यक्षीय भाषणात सहा पाने शेतकऱ्यांसंदर्भात ...

श्रीपाल सबनीस : माणूसदरी येथे कृषी साहित्य संमेलनाचा समारोपघाटंजी : शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर हमीभाव मिळत नाही. म्हणूनच मी माझ्या अध्यक्षीय भाषणात सहा पाने शेतकऱ्यांसंदर्भात लिहिली. भारतातील शेतकऱ्यांसाठी अ‍ॅग्रीकल्चरची स्थापना केली पाहिजे, लवाद निर्माण केला पाहिजे, ही मागणी आपण केली आहे. नागरिकांनीही ती करावी. सदर मागणी मंजूर झाल्यास भारतात क्रांती होईल, शेतकरी सुखी होईल. होत असलेल्या शेतकरी आत्महत्या संस्कृतीचा, विकासाचा पराभव करणाऱ्या आहे, इथल्या कार्यकर्त्यांचा, राजकीय, सामाजिक नेतृत्वाचा पराभव आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष प्रा.डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. माणूसदरी येथील फुले-आंबेडकरी कृषी साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर संमेलनाध्यक्ष मोतीराम कटारे, स्वागताध्यक्ष देवानंद पवार, न.मा. जोशी, गंधे, प्रा. माधवराव सरकुंडे, बळी खैरे, हेमंत कांबळे, प्रशांत वंजारे, नगराध्यक्ष चंद्ररेखा रामटेके, शैलेश इंगोले, नागेश गोरख, प्रा. वंजारी, साहेबराव पवार आदी उपस्थित होते. डॉ. सबनीस पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या घामातून मोती पिकत असलेल्या या मातीमध्ये हे संमेलन होत आहे. या ऐतिहासिक संमेलनात शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसून टाकण्यासाठी लवाद व अ‍ॅग्रीकल्चरची स्थापना उपयुक्त ठरावी. महात्मा फुले यांचे कर्तृत्व साऱ्या जगाला माहीत आहे, ते वंदनीय आहे. बाबासाहेब आंबेडकरांचेही कर्तृत्व जगवंदे आहे. कृषी आणि साहित्य या दोन संकल्पना एकत्र आणण्याचा योग, प्रयत्न आणि कार्य माणूसदरी गावाने सिद्ध केले असल्याचे त्यांनी सांगितले. पालखीमध्ये डॉ. बाबासाहेबांचे संविधान आणि ‘शेतकऱ्यांचे आसूड’ हे महात्मा फुले यांचे पुस्तक ठेवलं आहे. हे पहिल्यांदाच घडत आहे. इतरांचेही साहित्य पालखीमध्ये असायला पहिजे होते, असे ते म्हणाले. स्वागताध्यक्ष देवानंद पवार यांनी काही ठराव या संमेलनात मांडले. ते आवाजी मताने मंजूर झाले. यावेळी २५ प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. १० शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते आठवीची विद्यार्थिनी प्रणौती पांडुरंग निवल हिच्या ‘उमलनाचे नवतरंग’ या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. संचालन साहेबराव पवार, आभार हेमंत कांबळे यांनी मानले. या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, कविसंमेलन, परिसंवाद आणि सत्यपाल महाराजांचा प्रबोधनाचा कार्यक्रम झाला. (तालुका प्रतिनिधी)