शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
3
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
4
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
5
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
7
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
8
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
9
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
10
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
11
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
12
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
13
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
15
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
17
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
18
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
19
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
20
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?

कृषी केंद्र चालकांकडून शेतकर्‍यांची सर्रास लूट

By admin | Updated: May 27, 2014 01:13 IST

परिसरातील जंगल भागात सुरू असलेल्या कृषी केंद्र चालकांकडून शेतकर्‍यांची प्रचंड लूट सुरू आहे. कृषी केंद्राच्या परवान्याचे नूतनीकरण अनेकांनी अद्याप केलेलेच नाही.

बिटरगाव : परिसरातील जंगल भागात सुरू असलेल्या कृषी केंद्र चालकांकडून शेतकर्‍यांची प्रचंड लूट सुरू आहे. कृषी केंद्राच्या परवान्याचे नूतनीकरण अनेकांनी अद्याप केलेलेच नाही. तरीसुद्धा काही कृषी केंद्र चालकांकडून मोठ्या प्रमाणात तेही बोगस बियाण्यांची विक्री सुरू असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहे. सध्या पेरणीचे दिवस जवळ येऊन ठेपले असल्याने तसेच उन्हाळी कापसाची लागवड परिसरात मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतकर्‍यांनी कृषी केंद्रांवर एकच गर्दी केली आहे. याच गर्दीचा व शेतकर्‍यांच्या अज्ञानाचा फायदा घेत कृषी केंद्र चालकांकडून बोगस बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारले जात आहे. अशा कृषी केंद्रांना शोधून काढून त्यांचेवर कारवाई करण्याचे आव्हान जिल्हा कृषी विभागाकडे आहे. कृषी केंद्र चालकांना जे बियाणे एमआरपी किंमतीच्या अर्ध्या किंमतीत मिळतात किंवा ज्या कंपनीकडून त्यांचे बियाणे अधिकाधिक विक्री केल्यास भेटवस्तू अथवा मोठे पॅकेज दिले जाते, अशाच कंपन्यांचे बियाणे ग्राहकांच्या माथी मारले जात असल्याचा प्रकार सर्रास घडत आहे. असे बियाणे कसे चांगले आहे, हे विक्रेते अतिशय पद्धतशीरपणे ग्राहकांच्या गळी उतरवित असल्याचे दिसून येते. आंध्रप्रदेशातल बियाणे कंपन्यांचा महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणात शिरकार झाला असून बिटरगाव सारखा जंगल भाग त्यांनी त्यांची बियाणी विक्रीसाठी प्रामुख्याने निवडला आहे. उल्लेखनिय म्हणजे बिटरगाव परिसरात सध्या सुरू असलेल्या कृषी केंद्र चालकांपैकी कुणाचाही परवाना नूतनीकरण केलेला नाही. तरीसुद्धा अशा केंद्रांमधून मोठ्या प्रमाणात दररोज बियाण्यांची सर्रास विक्री सुरू आहे. यासंदर्भात उमरखेड पंचायत समितीचे कृषी अधिकारी एस.के. राठोड यांच्याशी संपर्क साधला असता सदर कृषी केंद्र चालकांनी जर विहित नमुन्यात परवाना नुतनीकरणासाठी प्रस्ताव दाखल केले असेल तर त्यांना माल विकता येतो परंतु त्यांच्या परवाना नूतनीकरणाचा वैधता कालावधी संपला असेल तर त्यांना बियाणे व खते विक्री करता येत नाही. अशा कृषी केंद्र चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येइल. शेतकर्‍यांनी मात्र कृषी केंद्र चालकांकडून आपण घेतलेल्या मालाचे पक्के बिल घ्यावे. तसेच नामांकीत व विश्वसनिय कंपनीचेच बियाणे खरेदी करावे, असे आवाहनसुद्धा त्यांनी शेतकर्‍यांना केले. (वार्ताहर)