शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

यवतमाळात शेतकाऱ्यांनी घातला पालकमंत्र्यांना घेराव; गळ्यात कापूस, साेयाबीनच्या झाडांची माळ घालून आंदाेलन

By सुरेंद्र राऊत | Updated: September 7, 2024 15:18 IST

गळ्यात कापूस-साेयाबीनची माळ : शेतमालाच्या भाववाढीची केली मागणी

यवतमाळ : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठाेड शहरातील समता मैदानात शनिवारी गणपती खरेदी करत असताना, त्यांना शेतकऱ्यांनी घेराव घातला. कापूस व साेयबीनचे भाव वाढविण्याची मागणी केली. या शेतकऱ्यांनी मागील काही दिवसापासून साेशल मिडियात शेतमालाच्या भाववाढीची माेहीम उघडली आहे. याअंतर्गतच शेतकऱ्यांनी कापूस, साेयाबीनच्या झाडांची माळ गळ्यात  घालून आंदाेलन केले.   

जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीसह अनेक नैसर्गिक संकटांनी त्रस्त झाला आहे. शासन अशाही स्थितीत शेतमालाचा भाव वाढवावा म्हणून प्रयत्न करताना दिसत नाही. शासानाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी साेशल मिडियावर माेहीम उघडली आहे. मंत्री संजय राठोड यांना घेरून सोयाबीन व कापूस पिकाच्या भाववाढी संदर्भात निर्दशने केली.  शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत अशा पद्धतीची निदर्शने प्रदर्शने चालूच राहतील.अशी स्पष्ट भूमिका शेतकऱ्यांनी मंत्री संजय राठाेड यांच्या समाेर व्यक्त केली. सोयाबीन-कापूस दरवाढ,पिकविमा,अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची १०० टक्के भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदेालन सुरू आहे.  या आंदाेलनाची सुरूवात काॅग्रेसच्या सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे. शनिवारी झालेल्या आंदाेलनात शेतकरी प्रकाश कांबळे,अनिल चवरे,अभय अनासाने,अतुल झोपाटे,कृषी अभ्यासक प्रा.पंढरी पाठे,नरेश खोब्रागडे,सचिन मनवर यांच्यासह माेठ्यासंख्येने शेतकरी उपस्थित हाेते. 

शासनाला ११ सप्टेंबर पर्यंतचा अल्टिमेटम"जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही,त्यांच्या मागणीची पूर्तता होणार नाही,तोवर अशाच पद्धतीची प्रदर्शने,निदर्शने चालूच राहतील.येत्या ११ सप्टेंबर पर्यंत जर सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर जिल्ह्यात माेठे जन आंदोलन जिल्हाभर उभारण्यात येईल"- प्रा. पंढरी पाठे, शेतकरी नेते.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनfarmingशेतीYavatmalयवतमाळSanjay Rathodसंजय राठोड