शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

चार तालुक्यांतील शेतकऱ्यांना नुकसानीच्या मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2022 21:54 IST

जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वळते होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, या चार तालुक्यांमध्ये पैसे वळते झालेच नाही. दोन दिवसांनंतर बँकांना सुट्ट्या आहेत. यामुळे उर्वरित दोन दिवसांत मदत गोळा होईल का हा खरा प्रश्न आहे. ही प्रक्रिया सोपी असली तरी ग्रामसेवकांच्या असहकारामुळे शेतकरी मदतीपासून वंचित असल्याचा आरोप समितीने केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची घोषणा केली. त्यानंतर जिल्ह्याकडे मदत वळती झाली. मात्र, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकाच्या असहकार आंदोलनानंतर ग्रामसेवकांनी चार तालुक्यांमध्ये कामच केले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी जिल्हा कचेरीवर धडक दिली. यावेळी त्यांना आंदोलन करण्यासाठी जागाच मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनावर संताप नोंदविला. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब, राळेगाव, घाटंजी आणि नेर तालुक्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची मदत गोळा झाली नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे या तालुक्यात ग्रामसेवकांनी कोऱ्या याद्या दिल्याचा आरोप शेतकरी संघर्ष समितीने केला आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वळते होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, या चार तालुक्यांमध्ये पैसे वळते झालेच नाही. दोन दिवसांनंतर बँकांना सुट्ट्या आहेत. यामुळे उर्वरित दोन दिवसांत मदत गोळा होईल का हा खरा प्रश्न आहे. ही प्रक्रिया सोपी असली तरी ग्रामसेवकांच्या असहकारामुळे शेतकरी मदतीपासून वंचित असल्याचा आरोप समितीने केला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. यासोबतच परतीच्या पावसानेही नुकसान झाले आहे. या परिस्थितीत दिवाळी तोंडावर असताना मदत मिळाली असतील तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता. मात्र, तसे झाले नाही. यावर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे प्रवीण देशमुख, सुरेश चिंचोळकर, दत्तकुमार दरणे, आनंदराव जगताप, प्रा. घनश्याम दरणे, प्रा. विजय गाडगे, दिनेश गोगरकर, अरविंद वाढोणकर, अरुण राऊत, अशोक बोबडे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. मदत तातडीने देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. 

शेतकऱ्यांना उभे राहायलाही जागा नाहीलोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. या आंदोलनात लक्ष वेधण्यासाठी जागाही असावी लागते. यवतमाळात आंदोलनासाठी जागाच नाही. तिरंगा चाैकात पार्किंगची व्यवस्था आहे तर आझाद मैदानात फटाक्याची दुकाने आहे. त्यामुळे बुधवारी शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर बसून आंदोलन केले.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती