शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

चार तालुक्यांतील शेतकऱ्यांना नुकसानीच्या मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2022 21:54 IST

जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वळते होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, या चार तालुक्यांमध्ये पैसे वळते झालेच नाही. दोन दिवसांनंतर बँकांना सुट्ट्या आहेत. यामुळे उर्वरित दोन दिवसांत मदत गोळा होईल का हा खरा प्रश्न आहे. ही प्रक्रिया सोपी असली तरी ग्रामसेवकांच्या असहकारामुळे शेतकरी मदतीपासून वंचित असल्याचा आरोप समितीने केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची घोषणा केली. त्यानंतर जिल्ह्याकडे मदत वळती झाली. मात्र, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकाच्या असहकार आंदोलनानंतर ग्रामसेवकांनी चार तालुक्यांमध्ये कामच केले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी जिल्हा कचेरीवर धडक दिली. यावेळी त्यांना आंदोलन करण्यासाठी जागाच मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनावर संताप नोंदविला. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब, राळेगाव, घाटंजी आणि नेर तालुक्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची मदत गोळा झाली नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे या तालुक्यात ग्रामसेवकांनी कोऱ्या याद्या दिल्याचा आरोप शेतकरी संघर्ष समितीने केला आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वळते होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, या चार तालुक्यांमध्ये पैसे वळते झालेच नाही. दोन दिवसांनंतर बँकांना सुट्ट्या आहेत. यामुळे उर्वरित दोन दिवसांत मदत गोळा होईल का हा खरा प्रश्न आहे. ही प्रक्रिया सोपी असली तरी ग्रामसेवकांच्या असहकारामुळे शेतकरी मदतीपासून वंचित असल्याचा आरोप समितीने केला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. यासोबतच परतीच्या पावसानेही नुकसान झाले आहे. या परिस्थितीत दिवाळी तोंडावर असताना मदत मिळाली असतील तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता. मात्र, तसे झाले नाही. यावर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे प्रवीण देशमुख, सुरेश चिंचोळकर, दत्तकुमार दरणे, आनंदराव जगताप, प्रा. घनश्याम दरणे, प्रा. विजय गाडगे, दिनेश गोगरकर, अरविंद वाढोणकर, अरुण राऊत, अशोक बोबडे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. मदत तातडीने देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. 

शेतकऱ्यांना उभे राहायलाही जागा नाहीलोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. या आंदोलनात लक्ष वेधण्यासाठी जागाही असावी लागते. यवतमाळात आंदोलनासाठी जागाच नाही. तिरंगा चाैकात पार्किंगची व्यवस्था आहे तर आझाद मैदानात फटाक्याची दुकाने आहे. त्यामुळे बुधवारी शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर बसून आंदोलन केले.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती