शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची तहसीलवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 23:05 IST

मागीलवर्षी कोरडा दुष्काळ, मावा व तुळतुळा या रोगामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले. परिणामी अत्यल्प उत्पादन झाले. तरीसुद्धा सावली तालुक्याला पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार यांचे नेतृत्व : पीक विमा देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसावली : मागीलवर्षी कोरडा दुष्काळ, मावा व तुळतुळा या रोगामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले. परिणामी अत्यल्प उत्पादन झाले. तरीसुद्धा सावली तालुक्याला पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी तहसीलवर धडक दिली. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.ओबिसींचे आरक्षण २७ टक्के असताना वैद्यकीय प्रवेशात फक्त दोन टक्के आरक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे आरक्षण द्यावे, शेतकऱ्यांची सरकट कर्जमाफी करावी, ज्या शेतकऱ्यांनी सन २०१५-२०१६ मध्ये कर्ज घेतले. त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांना मार्च २०१७ पर्यंतचे कर्ज माफ करावे, कृषी पंपासाठी शेतकऱ्यांनी वीज मंडळाकडे पैसे भरले. मात्र दोन वर्षांपासून त्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत.त्यांना वीज पुरवठा देण्यात यावा, कृषी पंपाचे विजबिल माफ करावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी, विज मंडळाने ग्राम विद्युत सेवकांचा प्रस्ताव ग्रामपंचायतकडून मागितला मात्र विद्युत सेवक अजूनही नेमण्यात आले नाही. परिणामी दुर्घटना घडत असल्याने विद्युत सेवकांची नियुक्ती करावी आदी मागण्यासाठी नगरपंचायत पटांगणातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.मोर्चाला संबोधित करताना आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, पीक विम्याच्या नावाखाली शेतकºयांंकडून पैसे वसूल करण्यात येतात. मात्र नुकसान भरपाई दिल्या जात नाही. हा केवळ कंपन्यांचा फायदा करण्याचे धोरण सरकारने आखले आहे. हे खोटारडे सरकार असून यांच्या भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. तर माजी आमदार नामदेवराव उसेंडी यांनी शेतकऱ्यांना १५ लाख देण्यापेक्षा हक्काची पीकविम्याची रक्कम द्यावी अशी मागणी केली.यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महीला आघाडीच्या राज्य सचिव नंदा अल्लूरवार, माजी जि.प. सदस्य दिनेश चिटनूरवार, जि. प. सदस्य वैशाली शेरकी, नगराध्यक्ष विलास यासलवार, तालुका अध्यक्ष यशवंत बोरकुटे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष उषा भोयर, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष राजेश सिध्दम, पंचायत समिती सदस्य विजय कोरेवार, मनिषा जवादे, उर्मिला तरारे, संगिता चौधरी, राकेश गड्डमवार, शहर अध्यक्ष विजय मुत्यालवार, उपनगराध्यक्ष भोगेश्वर मोहुर्ले, युवक अध्यक्ष नितीन दुव्वावार, यांच्यासह शेकडो शेतकरी मोर्चामध्ये सहभागी झाले होते.