शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

शेतकऱ्यांची महागाव कृषी कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:00 IST

२०१९ मध्ये शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कपाशी पिकाचा विमा उतरविला. अनेकांनी सोयाबीनचासुद्धा विमा उतरविला होता. गेल्यावर्षी दोन्ही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीकडे दावे दाखल केले. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना कपाशीच्या पिकाचा विमा मिळाला नाही. काही शेतकऱ्यांना सोयाबीनचा पीक विमा मिळाला. मात्र कपाशीची विमा रक्कम अद्याप त्यांच्या खात्यात जमा झाली नाही.

ठळक मुद्देविम्यापासून वंचित : कपाशीचा मोबदला अद्यापही मिळाला नाही, वर्ष लोटूनही बँक खात्यात रक्कम आलीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : तालुक्यातील अनेक शेतकरी कोरोना संकटाशी लढा देत आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांना अद्यापही २०१९ मधील खरीप हंगामातील कपाशीची नुकसान भरपाईमिळाली नाही. शेकडो शेतकरी विम्यापासून वंचित आहे. त्यांनी गुरुवारी कृषी कार्यालयावर धडक दिली.२०१९ मध्ये शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कपाशी पिकाचा विमा उतरविला. अनेकांनी सोयाबीनचासुद्धा विमा उतरविला होता. गेल्यावर्षी दोन्ही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीकडे दावे दाखल केले. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना कपाशीच्या पिकाचा विमा मिळाला नाही. काही शेतकऱ्यांना सोयाबीनचा पीक विमा मिळाला. मात्र कपाशीची विमा रक्कम अद्याप त्यांच्या खात्यात जमा झाली नाही.गेल्या वर्षी खरिपात २७ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. ३७ हजार शेतकºयांनी लागवड केली होती. शेतकऱ्यांनी सोयाबीनचा प्रतिहेक्टर ३६० तर कपाशीचा प्रतिहेक्टर १५०० रुपयांप्रमाणे विमा हप्ता भरला. शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा हप्ता जमा केला. मात्र अनेक शेतकऱ्यांना कपाशीचा विमा मिळालाच नाही. यामुळे उटी येथील प्रकाश वानखेडे, मुकुंद गावंडे, गजानन वानखेडे, बापुराव वानखेडे, नत्थू मोरे, शांता धनगर, दत्ता वानखेडे, अशोक गावंडे, विजय वानखेडे आदींनी गुरूवारी कृषी कार्यालयावर धडक दिली. त्यांनी विमा लाभ देण्याची मागणी लावून धरली.जिल्हा बँकेचा कोड बदलल्याने झाला विलंबजिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कोड बदलल्याने विमा मिळण्यास विलंब होत असल्याचे जिल्हा बँकेचे वसुली अधिकारी सुरेश भरवाडे यांनी सांगितले. कंपनीकडून त्यांच्या खात्यात पैसे टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे. महागाव शाखेची ८११ शेतकऱ्यांची यादी सादर केली आहे. लवकरच त्यांच्या खात्यात विमा अनुदानाचे पैसे जमा होईल, असे भरवाडे यांनी सांगितले. विमा प्रतिनिधी गुणवंत राठोड यांनी आपला विमा कंपनीसोबतचा करार जुलैमध्ये संपुष्टात आल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी विम्यासंदर्भात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडे विचारपूस करावे, असे स्पष्ट केले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती