शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची महागाव कृषी कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:00 IST

२०१९ मध्ये शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कपाशी पिकाचा विमा उतरविला. अनेकांनी सोयाबीनचासुद्धा विमा उतरविला होता. गेल्यावर्षी दोन्ही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीकडे दावे दाखल केले. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना कपाशीच्या पिकाचा विमा मिळाला नाही. काही शेतकऱ्यांना सोयाबीनचा पीक विमा मिळाला. मात्र कपाशीची विमा रक्कम अद्याप त्यांच्या खात्यात जमा झाली नाही.

ठळक मुद्देविम्यापासून वंचित : कपाशीचा मोबदला अद्यापही मिळाला नाही, वर्ष लोटूनही बँक खात्यात रक्कम आलीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : तालुक्यातील अनेक शेतकरी कोरोना संकटाशी लढा देत आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांना अद्यापही २०१९ मधील खरीप हंगामातील कपाशीची नुकसान भरपाईमिळाली नाही. शेकडो शेतकरी विम्यापासून वंचित आहे. त्यांनी गुरुवारी कृषी कार्यालयावर धडक दिली.२०१९ मध्ये शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कपाशी पिकाचा विमा उतरविला. अनेकांनी सोयाबीनचासुद्धा विमा उतरविला होता. गेल्यावर्षी दोन्ही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीकडे दावे दाखल केले. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना कपाशीच्या पिकाचा विमा मिळाला नाही. काही शेतकऱ्यांना सोयाबीनचा पीक विमा मिळाला. मात्र कपाशीची विमा रक्कम अद्याप त्यांच्या खात्यात जमा झाली नाही.गेल्या वर्षी खरिपात २७ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. ३७ हजार शेतकºयांनी लागवड केली होती. शेतकऱ्यांनी सोयाबीनचा प्रतिहेक्टर ३६० तर कपाशीचा प्रतिहेक्टर १५०० रुपयांप्रमाणे विमा हप्ता भरला. शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा हप्ता जमा केला. मात्र अनेक शेतकऱ्यांना कपाशीचा विमा मिळालाच नाही. यामुळे उटी येथील प्रकाश वानखेडे, मुकुंद गावंडे, गजानन वानखेडे, बापुराव वानखेडे, नत्थू मोरे, शांता धनगर, दत्ता वानखेडे, अशोक गावंडे, विजय वानखेडे आदींनी गुरूवारी कृषी कार्यालयावर धडक दिली. त्यांनी विमा लाभ देण्याची मागणी लावून धरली.जिल्हा बँकेचा कोड बदलल्याने झाला विलंबजिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कोड बदलल्याने विमा मिळण्यास विलंब होत असल्याचे जिल्हा बँकेचे वसुली अधिकारी सुरेश भरवाडे यांनी सांगितले. कंपनीकडून त्यांच्या खात्यात पैसे टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे. महागाव शाखेची ८११ शेतकऱ्यांची यादी सादर केली आहे. लवकरच त्यांच्या खात्यात विमा अनुदानाचे पैसे जमा होईल, असे भरवाडे यांनी सांगितले. विमा प्रतिनिधी गुणवंत राठोड यांनी आपला विमा कंपनीसोबतचा करार जुलैमध्ये संपुष्टात आल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी विम्यासंदर्भात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडे विचारपूस करावे, असे स्पष्ट केले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती