शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

कर्जमाफीसाठी शेतकरी धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 21:02 IST

पेरण्या तोंडावर आल्या तरी मंजूर झालेल्या कर्जाचा एक रुपयाही शेतकऱ्यांना मिळाला नाही. कर्जमाफीचे आलेले पैसेही परत गेले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. मात्र दोन तास ताटकळत राहिल्यावरही अधिकाऱ्यांची भेटच होऊ शकली नाही.

ठळक मुद्दे२० हजार शेतकरी प्रतीक्षेत : खरीप तोंडावर येऊनही माफीच्या पैशाचा पत्ता नाही

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पेरण्या तोंडावर आल्या तरी मंजूर झालेल्या कर्जाचा एक रुपयाही शेतकऱ्यांना मिळाला नाही. कर्जमाफीचे आलेले पैसेही परत गेले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. मात्र दोन तास ताटकळत राहिल्यावरही अधिकाऱ्यांची भेटच होऊ शकली नाही. अखेर या शेतकऱ्यांना परत फिरावे लागले.बाभूळगाव तालुक्यातील कोटंबा, कृष्णापूरच्या शेतकऱ्यांना पीककर्ज मंजूर झाले. मात्र वर्ष लोटले तरी अनेक शेतकऱ्यांना कर्जाचे पैसे मिळाले नाही. आता तरी कर्ज द्या, असे म्हणत या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ठिय्या दिला. मात्र जिल्हाधिकारी हजर नसल्याने त्यांना दोन तास वाट पाहावी लागली.शंकर मेंढे यांचे २०१५ मध्ये घेतलेले कर्ज माफीला पात्र ठरले. याची रक्कमही जिल्हा बँकेकडे आली. पण परतावा जास्त अन् रक्कम कमी आहे, हे कारण सांगत कर्जाचे पैसे परत गेले. शंकर मेंढे यांचे ३५ हजारांचे कर्ज होते. तर राजू मेंढेचे ७४ हजार रूपयांचे कर्ज होते. या दोन्ही प्रकरणात मंजूर झालेली रक्कम कमी पडत आहे, असे सांगत पैसे परत गेले. सदानंद झांबरे यांनी २००८-०९ मध्ये ३२ हजारांचे कर्ज घेतले होते. त्यांचे नाव अद्यापही ‘ग्रीन लिस्ट’मध्ये आले नाही. दिवाकर भानस यांनी २००७-०८ मध्ये १५,७०० रूपयांचे तर वामन गुरनुले यांनी ३५ हजारांचे कर्ज घेतले होते. दिलीप डाखोरेकडे ५० हजार रूपयांचे कर्ज आहे. नलू गुरनुले, कमला रामगडे, चंद्रकला येंडे, सरस्वता गवत्रे हे जिल्हा बँक, ग्रामीण बँक आणि सेन्ट्रल बँकेचे कर्जदार शेतकरी आहेत. बँक अधिकारी शेतकऱ्यांना सन्मान देत नसल्याचा आरोप त्यांनी केला.तांत्रिक चुकांनी वाढली ‘यलो लिस्ट’बँक खाते क्रमांक चुकणे, आयएफएससी कोड नसणे, आधार नंबर चुकणे, बँक आणि शेतकºयांच्या रकमेत तफावत असणे अशा तांत्रिक कारणांमुळेही पात्र शेतकरी कर्जमाफीला मुकले आहेत. त्यांचा जिल्ह्यातील आकडा २० हजारांच्या जवळपास आहे. हे सर्व शेतकरी ‘यलो लिस्ट’मध्ये आहेत.‘यलो लिस्ट’मधील शेतकऱ्यांची माहिती बँकेने हब सेंटरला दुरुस्त करून पाठविली आहे. मात्र सुधारित यादी अजूनही आली नाही. या यादीत १५ ते २० हजार शेतकरी आहेत.- अरविंद देशपांडेसीईओ, जिल्हा बँक, यवतमाळ

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज