शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कर्जमाफीसाठी शेतकरी धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 21:02 IST

पेरण्या तोंडावर आल्या तरी मंजूर झालेल्या कर्जाचा एक रुपयाही शेतकऱ्यांना मिळाला नाही. कर्जमाफीचे आलेले पैसेही परत गेले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. मात्र दोन तास ताटकळत राहिल्यावरही अधिकाऱ्यांची भेटच होऊ शकली नाही.

ठळक मुद्दे२० हजार शेतकरी प्रतीक्षेत : खरीप तोंडावर येऊनही माफीच्या पैशाचा पत्ता नाही

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पेरण्या तोंडावर आल्या तरी मंजूर झालेल्या कर्जाचा एक रुपयाही शेतकऱ्यांना मिळाला नाही. कर्जमाफीचे आलेले पैसेही परत गेले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. मात्र दोन तास ताटकळत राहिल्यावरही अधिकाऱ्यांची भेटच होऊ शकली नाही. अखेर या शेतकऱ्यांना परत फिरावे लागले.बाभूळगाव तालुक्यातील कोटंबा, कृष्णापूरच्या शेतकऱ्यांना पीककर्ज मंजूर झाले. मात्र वर्ष लोटले तरी अनेक शेतकऱ्यांना कर्जाचे पैसे मिळाले नाही. आता तरी कर्ज द्या, असे म्हणत या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ठिय्या दिला. मात्र जिल्हाधिकारी हजर नसल्याने त्यांना दोन तास वाट पाहावी लागली.शंकर मेंढे यांचे २०१५ मध्ये घेतलेले कर्ज माफीला पात्र ठरले. याची रक्कमही जिल्हा बँकेकडे आली. पण परतावा जास्त अन् रक्कम कमी आहे, हे कारण सांगत कर्जाचे पैसे परत गेले. शंकर मेंढे यांचे ३५ हजारांचे कर्ज होते. तर राजू मेंढेचे ७४ हजार रूपयांचे कर्ज होते. या दोन्ही प्रकरणात मंजूर झालेली रक्कम कमी पडत आहे, असे सांगत पैसे परत गेले. सदानंद झांबरे यांनी २००८-०९ मध्ये ३२ हजारांचे कर्ज घेतले होते. त्यांचे नाव अद्यापही ‘ग्रीन लिस्ट’मध्ये आले नाही. दिवाकर भानस यांनी २००७-०८ मध्ये १५,७०० रूपयांचे तर वामन गुरनुले यांनी ३५ हजारांचे कर्ज घेतले होते. दिलीप डाखोरेकडे ५० हजार रूपयांचे कर्ज आहे. नलू गुरनुले, कमला रामगडे, चंद्रकला येंडे, सरस्वता गवत्रे हे जिल्हा बँक, ग्रामीण बँक आणि सेन्ट्रल बँकेचे कर्जदार शेतकरी आहेत. बँक अधिकारी शेतकऱ्यांना सन्मान देत नसल्याचा आरोप त्यांनी केला.तांत्रिक चुकांनी वाढली ‘यलो लिस्ट’बँक खाते क्रमांक चुकणे, आयएफएससी कोड नसणे, आधार नंबर चुकणे, बँक आणि शेतकºयांच्या रकमेत तफावत असणे अशा तांत्रिक कारणांमुळेही पात्र शेतकरी कर्जमाफीला मुकले आहेत. त्यांचा जिल्ह्यातील आकडा २० हजारांच्या जवळपास आहे. हे सर्व शेतकरी ‘यलो लिस्ट’मध्ये आहेत.‘यलो लिस्ट’मधील शेतकऱ्यांची माहिती बँकेने हब सेंटरला दुरुस्त करून पाठविली आहे. मात्र सुधारित यादी अजूनही आली नाही. या यादीत १५ ते २० हजार शेतकरी आहेत.- अरविंद देशपांडेसीईओ, जिल्हा बँक, यवतमाळ

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज