शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

शेतकऱ्यांच्या संतापाची ‘गारपीट’

By admin | Updated: August 7, 2015 02:21 IST

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना डावलून इतर शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली.

आर्णी तहसील : उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्वत: केली चौकशीआर्णी : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना डावलून इतर शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली. खंडाळा गावातील हा प्रकार तलाठ्यामुळेच झाला, अशी ओरड वंचित शेतकऱ्यांनी केली. याप्रकरणी गुरुवारी उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्वत: तहसीलमध्ये येऊन चौकशी केली. त्यावेळी दोनही बाजूच्या शेतकऱ्यांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला. खंडाळा गावातील गारपीटग्रस्तांची यादी करताना महिला तलाठ्याने खऱ्या नुकसानग्रस्तांना डावलले. याबाबत वंचित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत गुरुवारी दुपारी १ वाजता उपविभागीय अधिकारी विकास माने हे स्वत: तहसील कार्यालयात आले. त्यांनी तहसीलदार सुधीर पवार यांच्यासह तक्रारकर्ते शेतकरी व लाभ मिळालेले शेतकरी अशा दोनही गटातील शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी दोनही गटातील शेतकरी एकाचवेळी आपला संताप व्यक्त करू लागल्याने गोंधळ उडाला होता. तक्रारीवरून काही शेतकऱ्यांनी पुरावे सादर केले. तक्रारीतील काही बाबी खोट्या आहेत, हे त्यावरून उघड झाले. परंतु गावात भेट देवून प्रत्यक्ष चौकशी केल्याशिवाय खरे काय ते समोर येणार नाही, असे उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले. आता खंडाळा गावात किती गारपीटग्रस्त सुटले आणि किती शेतकऱ्यांचे नाव चुकीने यादीत घुसडण्यात आले, हे चौकशीअंतीच स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या तरी तलाठ्याविरुद्ध रोष व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी या प्रकरणाच्या चौकशीसाठी उपविभागीय अधिकारी तहसीलमध्ये आल्यामुळे खंडाळा गावातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली होती. (शहर प्रतिनिधी)