शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

चातारीत पैनगंगा नदीपात्रात शेतकऱ्यांचे दफन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 21:59 IST

गेल्या १५ दिवसांपासून बोरी-चातारी येथे नदीपात्रात आंदोलन करणाºया शेतकºयांनी सोमवारी दफन आंदोलन केले. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली होती.

ठळक मुद्देप्रशासनाची तारांबळ : विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांसह प्रहारचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : गेल्या १५ दिवसांपासून बोरी-चातारी येथे नदीपात्रात आंदोलन करणाºया शेतकºयांनी सोमवारी दफन आंदोलन केले. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली होती.पैनगंगा नदीला इसापूर धरणाचा तिसरा कालवा घोषित करून नदीपात्रात त्वरित पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकºयांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकºयांनी १३ व्या दिवशी शासनाची तेरवी केली. सोमवारी १५ व्या दिवशी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी नदीपात्रात दफन आंदोलन केले. यापूर्वी धरणात उड्या मारून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला होता. सोमवारी प्रहारच्या कार्यकर्त्यांसह शेतकºयांनी अगोदरच खोदलेल्या खड्ड्यात स्वत:ला दफन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने आंदोलकांनी ऐनवेळी दुसरीकडे खड्डा खोदून आंदोलन पूर्ण केले.प्रहारचे संपर्क प्रमुख प्रमोद कुदळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रहारचे नांदेड, हिमायतनगर, उमरखेड, हदगाव येथील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार हनुमंत गायकवाड यांनी बंदोबस्त ठेवला. नांदेडचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, एसडीपीओ अभय देशपांडे, पोलीस निरीक्षक रवींद्र बोरसे, पीएसआय सुशील चव्हाण, बनसोडे यांच्यासह इस्लामपूर, किनवट, हदगाव, मनाठा, तामसा आणि नांदेड पोलीस मुख्यालयातील पोलीस व राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात होते.१२ दलघमी पाणी सोडण्याचे आदेशशेतकºयांचे आंदोलन लक्षात घेऊन यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख व नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सोमवारी पाटबंधारे विभागासोबत चर्चा केली. यानंतर नांदेड जिल्हाधिकाºयांनी सात तर यवतमाळच्या जिल्हाधिकाºयांनी नदीपात्रात पाच दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले आहे. सोमवारी सायंकाळी उशिरा आदेश देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात नदीत कधी पाणी येईल, याची शाश्वती नसल्याने आंदोलन सुरूच आहे.