शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

चातारीत पैनगंगा नदीपात्रात शेतकऱ्यांचे दफन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 21:59 IST

गेल्या १५ दिवसांपासून बोरी-चातारी येथे नदीपात्रात आंदोलन करणाºया शेतकºयांनी सोमवारी दफन आंदोलन केले. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली होती.

ठळक मुद्देप्रशासनाची तारांबळ : विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांसह प्रहारचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : गेल्या १५ दिवसांपासून बोरी-चातारी येथे नदीपात्रात आंदोलन करणाºया शेतकºयांनी सोमवारी दफन आंदोलन केले. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली होती.पैनगंगा नदीला इसापूर धरणाचा तिसरा कालवा घोषित करून नदीपात्रात त्वरित पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकºयांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकºयांनी १३ व्या दिवशी शासनाची तेरवी केली. सोमवारी १५ व्या दिवशी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी नदीपात्रात दफन आंदोलन केले. यापूर्वी धरणात उड्या मारून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला होता. सोमवारी प्रहारच्या कार्यकर्त्यांसह शेतकºयांनी अगोदरच खोदलेल्या खड्ड्यात स्वत:ला दफन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने आंदोलकांनी ऐनवेळी दुसरीकडे खड्डा खोदून आंदोलन पूर्ण केले.प्रहारचे संपर्क प्रमुख प्रमोद कुदळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रहारचे नांदेड, हिमायतनगर, उमरखेड, हदगाव येथील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार हनुमंत गायकवाड यांनी बंदोबस्त ठेवला. नांदेडचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, एसडीपीओ अभय देशपांडे, पोलीस निरीक्षक रवींद्र बोरसे, पीएसआय सुशील चव्हाण, बनसोडे यांच्यासह इस्लामपूर, किनवट, हदगाव, मनाठा, तामसा आणि नांदेड पोलीस मुख्यालयातील पोलीस व राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात होते.१२ दलघमी पाणी सोडण्याचे आदेशशेतकºयांचे आंदोलन लक्षात घेऊन यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख व नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सोमवारी पाटबंधारे विभागासोबत चर्चा केली. यानंतर नांदेड जिल्हाधिकाºयांनी सात तर यवतमाळच्या जिल्हाधिकाºयांनी नदीपात्रात पाच दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले आहे. सोमवारी सायंकाळी उशिरा आदेश देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात नदीत कधी पाणी येईल, याची शाश्वती नसल्याने आंदोलन सुरूच आहे.