शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
5
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
6
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
7
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
8
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
9
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
10
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
11
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
12
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
13
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
14
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
15
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
16
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
17
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
18
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
19
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
20
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन

चातारीत पैनगंगा नदीपात्रात शेतकऱ्यांचे दफन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 21:59 IST

गेल्या १५ दिवसांपासून बोरी-चातारी येथे नदीपात्रात आंदोलन करणाºया शेतकºयांनी सोमवारी दफन आंदोलन केले. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली होती.

ठळक मुद्देप्रशासनाची तारांबळ : विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांसह प्रहारचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : गेल्या १५ दिवसांपासून बोरी-चातारी येथे नदीपात्रात आंदोलन करणाºया शेतकºयांनी सोमवारी दफन आंदोलन केले. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली होती.पैनगंगा नदीला इसापूर धरणाचा तिसरा कालवा घोषित करून नदीपात्रात त्वरित पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकºयांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकºयांनी १३ व्या दिवशी शासनाची तेरवी केली. सोमवारी १५ व्या दिवशी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी नदीपात्रात दफन आंदोलन केले. यापूर्वी धरणात उड्या मारून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला होता. सोमवारी प्रहारच्या कार्यकर्त्यांसह शेतकºयांनी अगोदरच खोदलेल्या खड्ड्यात स्वत:ला दफन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने आंदोलकांनी ऐनवेळी दुसरीकडे खड्डा खोदून आंदोलन पूर्ण केले.प्रहारचे संपर्क प्रमुख प्रमोद कुदळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रहारचे नांदेड, हिमायतनगर, उमरखेड, हदगाव येथील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार हनुमंत गायकवाड यांनी बंदोबस्त ठेवला. नांदेडचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, एसडीपीओ अभय देशपांडे, पोलीस निरीक्षक रवींद्र बोरसे, पीएसआय सुशील चव्हाण, बनसोडे यांच्यासह इस्लामपूर, किनवट, हदगाव, मनाठा, तामसा आणि नांदेड पोलीस मुख्यालयातील पोलीस व राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात होते.१२ दलघमी पाणी सोडण्याचे आदेशशेतकºयांचे आंदोलन लक्षात घेऊन यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख व नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सोमवारी पाटबंधारे विभागासोबत चर्चा केली. यानंतर नांदेड जिल्हाधिकाºयांनी सात तर यवतमाळच्या जिल्हाधिकाºयांनी नदीपात्रात पाच दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले आहे. सोमवारी सायंकाळी उशिरा आदेश देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात नदीत कधी पाणी येईल, याची शाश्वती नसल्याने आंदोलन सुरूच आहे.