शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी-शेतमजुरांवर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: August 14, 2014 23:57 IST

यावर्षी पावसाळा सुरू होवून दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी उलटला आहे. परंतु आवश्यक असा पाऊस अद्याप झाला नाही. मध्यंतरी एक-दोन वेळा पावसाने हजेरी लावली.

महागाव(कसबा) : यावर्षी पावसाळा सुरू होवून दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी उलटला आहे. परंतु आवश्यक असा पाऊस अद्याप झाला नाही. मध्यंतरी एक-दोन वेळा पावसाने हजेरी लावली. यावेळी शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी उरकली. परंतु नंतर मात्र पावसाने दडी मारल्यामुळे दुबार व तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले. परंतु त्यानंतरही यावर्षी शेतकऱ्यांच्या हातात काही येईल याची शक्यता आता जवळपास मावळली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजुरांवर दुष्काळाचे प्रचंड सावट उभे ठाकले आहे. येत्या काही दिवसात गोकुळाष्टमी, पोळा व गणेशोत्सव आदी सण येणार आहेत. या सणांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात मात्र निराशा पसरली आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला पोळा हा सणसुद्धा साजरा कसा करावा, या संकटात शेतकरी आहे. पोळ्याला पशुधनाची पूजा करण्याची परंपरा आहे. परंतु सध्या अस्मानी संकटामुळे शेतकरी आहे ते पशुधन विक्री करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी, शेतमजुरांच्याजवळ दमडीही शिल्लक नाही. याचा थेट परिणाम बाजारपेठांवरही दिसून असला आहे. दरवर्षी महिनाभरापूर्वीच पोळ्याच्या खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणात दिसणारी गर्दी यावर्षी मात्र दिसून येत नाही. गुराढोरांना चारा नाही, प्यायला पाणी नाही, शेतकऱ्यांकडे असलेला चारा आता जवळपास संपला आहे. शासनाकडून चाराडेपो सुरू करण्यात आलेले नाही. अशा सर्व दुष्टचक्रात शेतकरी सापडला आहे. बँकांनी कर्ज देण्यास नकार दिल्याने अनेकांनी सावकारांकडून कर्ज घेवून दुबार व तिबार पेरणी केली आहे. आता मात्र सावकारसुद्धा थांबायला तयार नाहीत. डोक्यावरील कर्ज कसे फेडावे, हीसुद्धा काळजी शेतकऱ्यांना सतावत आहे. शेतमजुरांचीही हीच परिस्थिती आहे. पावसाने एकदम डोळे टवकारल्याने शेतात मजुरांना कोणतीही कामे उरली नाही. त्यामुळे मजूर वर्गावर उपासमारीची पाळी आली आहे. शासनाने शेतकरी, शेतमजुरांना त्वरित मदत जाहीर करावी किंवा रोजगार हमी योजनेची कामे सुरू करून त्यांच्या हाताला काम द्यावे, जेणेकरून यातून मिळणाऱ्या मजुरीतून त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटू शकेल, अशी मागणी होत आहे. जनावरांसाठी चारा डेपोची अत्यंत गरज असतानासुद्धा पशुसंवर्धन व महसूल विभाग याकडे लक्ष देण्यासाठी तयार नाही. याबाबतची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांनी तलाठ्याला दिली असताना वरिष्ठांकडून मात्र कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. ग्रामीण भागात कुणीही राजकीय पुढारी सध्या भटकायला तयार नाही. कुणालाही जनतेचे सोयरसुतक राहिलेले नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांबाबत ग्रामीण जनतेत प्रचंड रोष दिसून येत आहे. कृषीप्रधान ग्रामीण भागाची भाषा प्रत्येक भाषणातून बोलून दाखविणारे नेते आज कृषीवरील संकटाबाबत विचारपूस करायलाही तयार नाही.लोकप्रतिनिधींनी आता विधानसभेची तयारी चालविली आहे. त्यासाठी ग्रामीण कार्यकर्त्यांना त्यांनी कामाला लावले आहे. परंतु शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. अशा लोकप्रतिनिधींबाबत ग्रामीण जनतेत प्रचंड रोष व्यक्त होत असून शासनाने त्वरित मदत जाहीर करावी, अशी मागणी महागाव(कसबा) परिसरातून शेतकरी, शेतमजुरांमधून होत आहे. (वार्ताहर)