शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

शेतकरी-शेतमजुरांवर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: August 14, 2014 23:57 IST

यावर्षी पावसाळा सुरू होवून दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी उलटला आहे. परंतु आवश्यक असा पाऊस अद्याप झाला नाही. मध्यंतरी एक-दोन वेळा पावसाने हजेरी लावली.

महागाव(कसबा) : यावर्षी पावसाळा सुरू होवून दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी उलटला आहे. परंतु आवश्यक असा पाऊस अद्याप झाला नाही. मध्यंतरी एक-दोन वेळा पावसाने हजेरी लावली. यावेळी शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी उरकली. परंतु नंतर मात्र पावसाने दडी मारल्यामुळे दुबार व तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले. परंतु त्यानंतरही यावर्षी शेतकऱ्यांच्या हातात काही येईल याची शक्यता आता जवळपास मावळली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजुरांवर दुष्काळाचे प्रचंड सावट उभे ठाकले आहे. येत्या काही दिवसात गोकुळाष्टमी, पोळा व गणेशोत्सव आदी सण येणार आहेत. या सणांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात मात्र निराशा पसरली आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला पोळा हा सणसुद्धा साजरा कसा करावा, या संकटात शेतकरी आहे. पोळ्याला पशुधनाची पूजा करण्याची परंपरा आहे. परंतु सध्या अस्मानी संकटामुळे शेतकरी आहे ते पशुधन विक्री करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी, शेतमजुरांच्याजवळ दमडीही शिल्लक नाही. याचा थेट परिणाम बाजारपेठांवरही दिसून असला आहे. दरवर्षी महिनाभरापूर्वीच पोळ्याच्या खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणात दिसणारी गर्दी यावर्षी मात्र दिसून येत नाही. गुराढोरांना चारा नाही, प्यायला पाणी नाही, शेतकऱ्यांकडे असलेला चारा आता जवळपास संपला आहे. शासनाकडून चाराडेपो सुरू करण्यात आलेले नाही. अशा सर्व दुष्टचक्रात शेतकरी सापडला आहे. बँकांनी कर्ज देण्यास नकार दिल्याने अनेकांनी सावकारांकडून कर्ज घेवून दुबार व तिबार पेरणी केली आहे. आता मात्र सावकारसुद्धा थांबायला तयार नाहीत. डोक्यावरील कर्ज कसे फेडावे, हीसुद्धा काळजी शेतकऱ्यांना सतावत आहे. शेतमजुरांचीही हीच परिस्थिती आहे. पावसाने एकदम डोळे टवकारल्याने शेतात मजुरांना कोणतीही कामे उरली नाही. त्यामुळे मजूर वर्गावर उपासमारीची पाळी आली आहे. शासनाने शेतकरी, शेतमजुरांना त्वरित मदत जाहीर करावी किंवा रोजगार हमी योजनेची कामे सुरू करून त्यांच्या हाताला काम द्यावे, जेणेकरून यातून मिळणाऱ्या मजुरीतून त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटू शकेल, अशी मागणी होत आहे. जनावरांसाठी चारा डेपोची अत्यंत गरज असतानासुद्धा पशुसंवर्धन व महसूल विभाग याकडे लक्ष देण्यासाठी तयार नाही. याबाबतची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांनी तलाठ्याला दिली असताना वरिष्ठांकडून मात्र कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. ग्रामीण भागात कुणीही राजकीय पुढारी सध्या भटकायला तयार नाही. कुणालाही जनतेचे सोयरसुतक राहिलेले नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांबाबत ग्रामीण जनतेत प्रचंड रोष दिसून येत आहे. कृषीप्रधान ग्रामीण भागाची भाषा प्रत्येक भाषणातून बोलून दाखविणारे नेते आज कृषीवरील संकटाबाबत विचारपूस करायलाही तयार नाही.लोकप्रतिनिधींनी आता विधानसभेची तयारी चालविली आहे. त्यासाठी ग्रामीण कार्यकर्त्यांना त्यांनी कामाला लावले आहे. परंतु शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. अशा लोकप्रतिनिधींबाबत ग्रामीण जनतेत प्रचंड रोष व्यक्त होत असून शासनाने त्वरित मदत जाहीर करावी, अशी मागणी महागाव(कसबा) परिसरातून शेतकरी, शेतमजुरांमधून होत आहे. (वार्ताहर)