शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पाथरीतील शेतकरी आत्महत्या नापिकीनेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 22:33 IST

केळापूर तालुक्याच्या पाथरी गावातील प्रेमदास ताकसांडे हे शेतकरी नापिकीचेच बळी ठरले आहे. शेतकरी मिशनच्या सत्यशोधन अहवालात हे भीषण वास्तव पुढे आल्याचे शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देकिशोर तिवारी : सत्यशोधन समितीचा अहवाल पंतप्रधानांना सादर करणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केळापूर तालुक्याच्या पाथरी गावातील प्रेमदास ताकसांडे हे शेतकरी नापिकीचेच बळी ठरले आहे. शेतकरी मिशनच्या सत्यशोधन अहवालात हे भीषण वास्तव पुढे आल्याचे शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.शेतकऱ्यांचे उत्पन्न विविध कारणांमुळे ३० ते ४० टक्क्यांवर आले आहे. आता वातावरणातील बदल तुरीचे संपूर्ण पीक नष्ट करीत आहे. यात शेतकऱ्यांच्या अडचणीत कमालीची वाढ झाली आहे. अशा कठीण समयी सरकारी अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना योजनांचा फायदा तर दूर संपर्कही करत नाहीत हे कटूसत्य आहे. १५ नोव्हेंबर रोजी पाथरी येथील प्रेमदास ताकसांडे या शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपविली. किशोर तिवारी यांनी मंगळवारी त्यांच्या घरी भेट दिली. यावेळी पुढे आलेले सत्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करणार असल्याचे किशोर तिवारी यांनी कळविले.प्रेमदास ताकसांडे यांच्या आत्महत्येनंतर केवळ पटवारी आणि कृषी सहायकांनी त्यांच्या घरी भेट दिली. पीककर्ज माफीचा केवळ १५ हजार रुपये लाभ मिळाला. एकही कृषी योजना मिळाली नाही. रमाई घरकूल योजनेचाही लाभ मिळाला नाही, अशी व्यथा प्रेमदास ताकसांडे यांच्या पत्नी तुळसाबाई यांनी किशोर तिवारी यांच्याकडे या भेटीत मांडली.दिवसा कधीच वीज राहात नाही. रात्री वाघाची भीती आहे. शेतात जाऊ शकत नसल्याने पाणी असूनही पीक बुडाले. बहुतांश शेतकऱ्यांची हीच परिस्थिती असल्याची माहिती शेतकरी व पाथरीचे सरपंच राजू पेंदोर आणि मोहद्याचे सरपंच विजय तेलंगे यांनी यावेळी दिली. प्रेमदास ताकसांडे हे नापिकीमुळेच विवंचनेत होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे यावेळी स्पष्ट झाल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. शिवाय भ्रष्ट यंत्रणाही शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठल्याही उपाययोजना करत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या