शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

पाथरीतील शेतकरी आत्महत्या नापिकीनेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 22:33 IST

केळापूर तालुक्याच्या पाथरी गावातील प्रेमदास ताकसांडे हे शेतकरी नापिकीचेच बळी ठरले आहे. शेतकरी मिशनच्या सत्यशोधन अहवालात हे भीषण वास्तव पुढे आल्याचे शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देकिशोर तिवारी : सत्यशोधन समितीचा अहवाल पंतप्रधानांना सादर करणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केळापूर तालुक्याच्या पाथरी गावातील प्रेमदास ताकसांडे हे शेतकरी नापिकीचेच बळी ठरले आहे. शेतकरी मिशनच्या सत्यशोधन अहवालात हे भीषण वास्तव पुढे आल्याचे शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.शेतकऱ्यांचे उत्पन्न विविध कारणांमुळे ३० ते ४० टक्क्यांवर आले आहे. आता वातावरणातील बदल तुरीचे संपूर्ण पीक नष्ट करीत आहे. यात शेतकऱ्यांच्या अडचणीत कमालीची वाढ झाली आहे. अशा कठीण समयी सरकारी अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना योजनांचा फायदा तर दूर संपर्कही करत नाहीत हे कटूसत्य आहे. १५ नोव्हेंबर रोजी पाथरी येथील प्रेमदास ताकसांडे या शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपविली. किशोर तिवारी यांनी मंगळवारी त्यांच्या घरी भेट दिली. यावेळी पुढे आलेले सत्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करणार असल्याचे किशोर तिवारी यांनी कळविले.प्रेमदास ताकसांडे यांच्या आत्महत्येनंतर केवळ पटवारी आणि कृषी सहायकांनी त्यांच्या घरी भेट दिली. पीककर्ज माफीचा केवळ १५ हजार रुपये लाभ मिळाला. एकही कृषी योजना मिळाली नाही. रमाई घरकूल योजनेचाही लाभ मिळाला नाही, अशी व्यथा प्रेमदास ताकसांडे यांच्या पत्नी तुळसाबाई यांनी किशोर तिवारी यांच्याकडे या भेटीत मांडली.दिवसा कधीच वीज राहात नाही. रात्री वाघाची भीती आहे. शेतात जाऊ शकत नसल्याने पाणी असूनही पीक बुडाले. बहुतांश शेतकऱ्यांची हीच परिस्थिती असल्याची माहिती शेतकरी व पाथरीचे सरपंच राजू पेंदोर आणि मोहद्याचे सरपंच विजय तेलंगे यांनी यावेळी दिली. प्रेमदास ताकसांडे हे नापिकीमुळेच विवंचनेत होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे यावेळी स्पष्ट झाल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. शिवाय भ्रष्ट यंत्रणाही शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठल्याही उपाययोजना करत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या