शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

पाथरीतील शेतकरी आत्महत्या नापिकीनेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 22:33 IST

केळापूर तालुक्याच्या पाथरी गावातील प्रेमदास ताकसांडे हे शेतकरी नापिकीचेच बळी ठरले आहे. शेतकरी मिशनच्या सत्यशोधन अहवालात हे भीषण वास्तव पुढे आल्याचे शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देकिशोर तिवारी : सत्यशोधन समितीचा अहवाल पंतप्रधानांना सादर करणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केळापूर तालुक्याच्या पाथरी गावातील प्रेमदास ताकसांडे हे शेतकरी नापिकीचेच बळी ठरले आहे. शेतकरी मिशनच्या सत्यशोधन अहवालात हे भीषण वास्तव पुढे आल्याचे शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.शेतकऱ्यांचे उत्पन्न विविध कारणांमुळे ३० ते ४० टक्क्यांवर आले आहे. आता वातावरणातील बदल तुरीचे संपूर्ण पीक नष्ट करीत आहे. यात शेतकऱ्यांच्या अडचणीत कमालीची वाढ झाली आहे. अशा कठीण समयी सरकारी अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना योजनांचा फायदा तर दूर संपर्कही करत नाहीत हे कटूसत्य आहे. १५ नोव्हेंबर रोजी पाथरी येथील प्रेमदास ताकसांडे या शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपविली. किशोर तिवारी यांनी मंगळवारी त्यांच्या घरी भेट दिली. यावेळी पुढे आलेले सत्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करणार असल्याचे किशोर तिवारी यांनी कळविले.प्रेमदास ताकसांडे यांच्या आत्महत्येनंतर केवळ पटवारी आणि कृषी सहायकांनी त्यांच्या घरी भेट दिली. पीककर्ज माफीचा केवळ १५ हजार रुपये लाभ मिळाला. एकही कृषी योजना मिळाली नाही. रमाई घरकूल योजनेचाही लाभ मिळाला नाही, अशी व्यथा प्रेमदास ताकसांडे यांच्या पत्नी तुळसाबाई यांनी किशोर तिवारी यांच्याकडे या भेटीत मांडली.दिवसा कधीच वीज राहात नाही. रात्री वाघाची भीती आहे. शेतात जाऊ शकत नसल्याने पाणी असूनही पीक बुडाले. बहुतांश शेतकऱ्यांची हीच परिस्थिती असल्याची माहिती शेतकरी व पाथरीचे सरपंच राजू पेंदोर आणि मोहद्याचे सरपंच विजय तेलंगे यांनी यावेळी दिली. प्रेमदास ताकसांडे हे नापिकीमुळेच विवंचनेत होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे यावेळी स्पष्ट झाल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. शिवाय भ्रष्ट यंत्रणाही शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठल्याही उपाययोजना करत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या