शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
2
भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न'
3
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
4
मजुराला रस्त्याच्या कडेला सापडला एक दगड, घरी नेल्यावर कळलं की...; क्षणात आयुष्य बदलले!
5
दिवाळी धमाका! 'या' कंपनीची फ्लाइंग कनेक्शन्स सेल; फक्त २००० रुपयांमध्ये करा हवाई प्रवास
6
Bihar Election 2025: प्रशांत किशोर यांनी ६५ मतदारसंघात उघडले पत्ते; कोणाला उमदेवारी?
7
कोरोनाच्या संसर्गामुळे शुक्राणूंमध्ये झाला मोठा बदल, नव्या अपत्यांमध्ये चिंता वाढली
8
GMP देतोय संकेत, ₹१५५० च्या पार लिस्ट होऊ शकतो 'हा' IPO; पहिल्यांदा जीएमपी ₹४०० पार
9
Harshita Dave : रील बनवण्याची आवड पण स्वप्न मोठी; २२ व्या वर्षी झाली डेप्युटी कलेक्टर, तुम्हीही कराल कौतुक
10
बिग बींशी उद्धटपणे बोलला, त्यांच्यावर ओरडला! शेवटी अतिआत्मविश्वास नडला, आगाऊ इशितची ५व्या प्रश्नावरच उडाली विकेट
11
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
12
वेस्ट इंडीजची टीम इंडियाला कडवी टक्कर; तब्बल १२ वर्षानंतर पाहावा लागला 'लाजिरवाणा' दिवस!
13
फक्त २५,००० रुपये पगारात ईपीएफमध्ये १ कोटींचा फंड शक्य आहे! गुंतवणुकीचं गणित समजून घ्या
14
IND vs WI : दोन शतकवीरांसह शेपटीनं दमवलं! टीम इंडियावर चौथ्यांदा आली ही वेळ
15
दिवाळीत Kia च्या कार्सवर मिळतोय बंपर डिस्काऊंट, कंपनीनं आणल्या अनेक ऑफर्स; कोणत्या कारवर किती बचत?
16
भगवी वस्त्रे काढून फेकली, बुरखा घालून पळाली; हत्याकांडाची मास्टरमाईंड पूजा पांडे कुठे लपली होती?
17
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'दिवाळी जॅकपॉट'! महागाई भत्त्यात ३% ने वाढ; पाहा कोणाचा पगार किती वाढणार?
19
खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं
20
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी

शेतकऱ्यांच्या नजरा आता पीक विम्याकडे

By admin | Updated: May 19, 2016 02:05 IST

शेतकऱ्यांचा उन्हाळी हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे़ पेरणी पाण्याचे दिवस जवळ येत आहे़ यावर्षी कपासी व इतर शेतमालाचे भाव कमालीचे अस्थिर होते.

कळंब तालुका : खरीप हंगामासाठी पैशांची केली जात आहे जुळवाजुळवकळंब : शेतकऱ्यांचा उन्हाळी हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे़ पेरणी पाण्याचे दिवस जवळ येत आहे़ यावर्षी कपासी व इतर शेतमालाचे भाव कमालीचे अस्थिर होते. या अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागली़ उत्पन्न आणि खर्चाचा मेळ बसविताना गाठीशी एकही पैसा शिल्लक राहिलेला नाही़, ही वास्तविकता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आता पीक विम्याच्या रकमेसाठी धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे़ यावर्षी ज्यांनी पीक विमा काढला नाही त्यांनाही मदत देणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे, हे विशेष. त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांच्या नजरा पीक विम्याकडे लागल्या आहे.शासन शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी विविध योजना राबवित असल्याचा आव आणते़ असे असले तरी, शासनाच्या योजना व नीती या शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचे हित जोपासणाऱ्या असतात, असा आरोप नेहमीच केला जातो़ या आरोपात तसे पाहिले तर तथ्य आढळून येते़ कारण दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कापसाच्या निर्यातीसंदर्भात शासनाने धोरण शेतकऱ्यांसाठी मारक ठरलेले आहे़ शेती व्यवसाय हा आता फायद्याचा राहिलेला नाही, अशी बोंब वारंवार केली जाते़ उत्पादीत खर्चाच्या आधारावर शेतमालाला जोपर्यंत भाव मिळत नाही, तोपर्यंत अशीच परिस्थिती राहणार आहे़ यावर्षी बेभरवशाचा पाणी व मजुरीचे वाढलेले दर यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले. सद्यस्थितीत शेतमालाचे बाजारमूल्यही घसरलेले आहे़ आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांची आशा आता शासनाच्या पीक विम्यावरच एकवटली आहे़ शेती करण्यासाठी पैशाची जुळवाजुळव करणे, हे शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजले आहे. बँका पाहिजे तेव्हा व पाहिजे तेवढे कर्ज उपलब्ध करून देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर नाईलाजाने सावकाराचे उंबरठे झिजविण्याची वेळ येते़ शेवटी कर्जाच्या खाईत लोटलेला शेतकरी उत्पन्न न झाल्याने हवालदिल होतो़ त्यातच तो आपली जीवनयात्रा संपवितो़ अशी उदाहरणेही कळंब तालुक्यात कमी नाही़ यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या कळंब तालुक्यात झालेल्या आहेत़ अशा परिस्थितीत पीक विमा तरी तत्काळ पदरात पडेल का, हा खचलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे़ दुसरीकडे ज्यांनी पीक विमा काढलेला नाही, अशानाही मदत देण्याची घोषणा शासनाने केली. परंतु अजुनपर्यंतही त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. यासंदर्भात तहसीलदार संतोष काकडे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी यासंदर्भात शासनाकडून कुठलीच माहिती आलेली नाही, असे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)