शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या नजरा आता पीक विम्याकडे

By admin | Updated: May 19, 2016 02:05 IST

शेतकऱ्यांचा उन्हाळी हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे़ पेरणी पाण्याचे दिवस जवळ येत आहे़ यावर्षी कपासी व इतर शेतमालाचे भाव कमालीचे अस्थिर होते.

कळंब तालुका : खरीप हंगामासाठी पैशांची केली जात आहे जुळवाजुळवकळंब : शेतकऱ्यांचा उन्हाळी हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे़ पेरणी पाण्याचे दिवस जवळ येत आहे़ यावर्षी कपासी व इतर शेतमालाचे भाव कमालीचे अस्थिर होते. या अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागली़ उत्पन्न आणि खर्चाचा मेळ बसविताना गाठीशी एकही पैसा शिल्लक राहिलेला नाही़, ही वास्तविकता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आता पीक विम्याच्या रकमेसाठी धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे़ यावर्षी ज्यांनी पीक विमा काढला नाही त्यांनाही मदत देणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे, हे विशेष. त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांच्या नजरा पीक विम्याकडे लागल्या आहे.शासन शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी विविध योजना राबवित असल्याचा आव आणते़ असे असले तरी, शासनाच्या योजना व नीती या शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचे हित जोपासणाऱ्या असतात, असा आरोप नेहमीच केला जातो़ या आरोपात तसे पाहिले तर तथ्य आढळून येते़ कारण दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कापसाच्या निर्यातीसंदर्भात शासनाने धोरण शेतकऱ्यांसाठी मारक ठरलेले आहे़ शेती व्यवसाय हा आता फायद्याचा राहिलेला नाही, अशी बोंब वारंवार केली जाते़ उत्पादीत खर्चाच्या आधारावर शेतमालाला जोपर्यंत भाव मिळत नाही, तोपर्यंत अशीच परिस्थिती राहणार आहे़ यावर्षी बेभरवशाचा पाणी व मजुरीचे वाढलेले दर यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले. सद्यस्थितीत शेतमालाचे बाजारमूल्यही घसरलेले आहे़ आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांची आशा आता शासनाच्या पीक विम्यावरच एकवटली आहे़ शेती करण्यासाठी पैशाची जुळवाजुळव करणे, हे शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजले आहे. बँका पाहिजे तेव्हा व पाहिजे तेवढे कर्ज उपलब्ध करून देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर नाईलाजाने सावकाराचे उंबरठे झिजविण्याची वेळ येते़ शेवटी कर्जाच्या खाईत लोटलेला शेतकरी उत्पन्न न झाल्याने हवालदिल होतो़ त्यातच तो आपली जीवनयात्रा संपवितो़ अशी उदाहरणेही कळंब तालुक्यात कमी नाही़ यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या कळंब तालुक्यात झालेल्या आहेत़ अशा परिस्थितीत पीक विमा तरी तत्काळ पदरात पडेल का, हा खचलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे़ दुसरीकडे ज्यांनी पीक विमा काढलेला नाही, अशानाही मदत देण्याची घोषणा शासनाने केली. परंतु अजुनपर्यंतही त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. यासंदर्भात तहसीलदार संतोष काकडे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी यासंदर्भात शासनाकडून कुठलीच माहिती आलेली नाही, असे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)