शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रस बाजार समितीत शेतकऱ्यांची दैनावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 22:22 IST

येथील बाजार समितीत शेतकऱ्यांची दैनावस्था होत असून संचालक, प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहे.

ठळक मुद्देगोदामांचा अभाव : आवारात खासगी वाहनांचीच गर्दी

प्रकाश सातघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : येथील बाजार समितीत शेतकऱ्यांची दैनावस्था होत असून संचालक, प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहे. आपलाच शेतमाल विकण्यासाठी शेतकºयांना ताटकळत राहावे लागत आहे.काही वर्षांपूर्वी दिग्रस बाजार समिती जिल्हात अव्वल होती. तालुक्यातील जवळपास ८५ गावांतील शेतकरी येथे शेतमाल विक्रीसाठी आणायचे. मात्र गेल्या काही वर्षांत या बाजार समितीच्या कारभारात अनागोंदी निर्माण झाली आहे. संचालक मंडळ आणि प्रशासनाच्या नियोजनशून्यतेने बाजार समितीचे धींडवडे निघत आहे. बाजार समितीचे जुने वैभवच लयास गेल्याचे दिसत आहे. परिणामी अनेक व्यापारी आता धान्य खरेदीसाठी समितीकडे फिरकायला तयार नाही. शेतकरीही बाजार समितीऐवजी खुल्या बाजारात शेतमाल विक्रीस प्राधान्य देत आहे. यामुळे बाजार समितीला उतरती कळा लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.पूर्वी येथील बाजार समितीत सप्ताहातील सातही दिवस शेतकऱ्यांचा राबता राहात होता. बाजार समितीचे प्रांगण शेतमालाने तुडूंब भरून राहात होते. शेतकऱ्यांच्या मालाचा दररोज लिलाव होत होता. शेतकऱ्यांना रोख चुकारेही मिळत होते. त्यावेळच्या संचालकांशी शेतकऱ्यांशी नाळ जुळली होती. त्यांनी बाजार समितीला शिखरावर नेऊन ठेवले होते. मात्र अलिकडील काळात या सर्व बाबी गायब झाल्या आहे. बाजार समितीला भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याने जुने वैभव लयास गेले आहे.सध्याचे पदाधिकारी, संचालक, सचिव यांचे सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे. शेतमाल ठेवण्यासाठी गोदामांची कमतरता असताना त्याकडे लक्ष दिले जात नाही. बाजार समिती ङबघाईस येण्यासाठी संचालक मंडळ व सचिव जबाबदार असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. एकेकाळी वैभव असलेल्या या बाजार समितीचा परिसर आता वाहनतळ म्हणून उपयोगात आणला जात आहे. समितीत शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाणी मिळणेही दुर्लभ झाले आहे. थंड पाण्याची मशीन लागली, पण ती बंद आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शेतकरी हिताचा एकही निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे पाठ फिरविली आहे.बाजार समितीबाहेरच धान्य खरेदी केली जाते. मात्र त्यावर समितीचे कोणतेही नियंत्रण नाही. बाजार समितीत धान्याला योग्य भाव मिळत नाही. मोठ्या व्यापारांची हुकुमशाही सुरू असल्याने बाजार समितीचा विकास खुंटला आहे. शेतकऱ्यांना योग्य वागणूक, सुविधा देण्यास बाजार समितीचे संचालक आणि प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.शेतकरी जातात दुसऱ्या जिल्ह्यातयेथील बाजार समितीच्या अनागोंदी कारभारामुळे तालुक्यातील शेतकरी आता आपला शेतमाल दुसऱ्या तालुक्यात व जिलह्यात विक्रीस नेत आहे. मानोरा, कारंजा, मंगरूळपीर, वाशीम, अकोला आदी ठिकाणी शेतकरी शेतमाल नेत आहे. तेथील अनेक व्यापारीही थेट येथे येऊन शेतमाल खरेदी करीत आहे. काही व्यापारी येथेच नवीन बाजारपेठ सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यांचे कामही सुरू झाले आहे. त्यामुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला धोक्याची घंटा दिसून येत आहे. एकूण येथील प्रशासन आणि संचालकांच्या धोरणामुळे बाजार समितीला उतरती कळा लागली आहे.