शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
5
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
6
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
7
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
8
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
9
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
10
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
11
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
12
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
13
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
14
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
15
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
16
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
17
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
18
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
19
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
20
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'

कर्जमाफी न देता शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 21:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राळेगाव : भाजप सरकारने शेतकऱ्यांना सन २००४ प्रमाणे सरसकट कर्जमाफी दिली नाही. यातून शेतकºयांची फसवणूक केली ...

ठळक मुद्देनाना पटोले : सावनेर येथे शेतकरी मेळावा, नेत्र तपासणी शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : भाजप सरकारने शेतकऱ्यांना सन २००४ प्रमाणे सरसकट कर्जमाफी दिली नाही. यातून शेतकºयांची फसवणूक केली आहे. दुसरीकडे शेतमालाला आश्वासनाप्रमाणे भाव दिला नाही. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाला असून शेतकरी आत्महत्यामध्ये वाढ झाली आहे. अशा सत्ताधाºयांना शेतकऱ्यांनी धडा शिकवावा, असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय किसान आघाडीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.तालुक्यातील सावनेर येथे शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कापूस, तूर, सोयाबीन या परंपरागत पिकाऐवजी आता फळबागांकडे वळा. त्यासाठी धरणाचे पाणी शेतीला मिळालेच पाहिजे अशी खंबीर भूमिका शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन माजीमंत्री माणिकराव ठाकरे यांनी केले. माजी मंत्री प्रा.वसंतराव पुरके यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही सदैव एकत्र आहो अशी ग्वाही दिली. शास्त्रीय, वैज्ञानिक, आधुनिक शेती करावी. शेतकऱ्यांशी आमची बांधिलकी असल्याचे बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर यांनी सांगितले.मनिष पाटील, देवानंद पवार यांनी समयोचित विचार मांडले. यावेळी चित्तरंजन कोल्हे, प्रवीण कोकाटे, मिलिंद इंगोले, अरविंद वाढोणकर, नंदकुमार गांधी, रमेश कन्नाके, अशोक पाटील, संजय काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर, नाना पटोले, देवानंद पवार यांच्यासह विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. डॉ.एन.बी.पाटील यांनी संत्रा व मोसंबी पिकाबाबत तर डॉ. मिलिंद गिरी यांनी तूर पिकाच्या व्यवस्थापनावर शेतकºयांना माहिती दिली. यावेळी किरण कुमरे यांच्या पुढाकाराने झालेल्या नेत्र तपासणी शिबिरात ५०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. बाजार समितीचे उपसभापती पुरुषोत्तम निम्रड, संचालक राजेंद्र महाजन, गोवर्धन वाघमारे, निश्चल बोभाटे, नामदेवराव फटींग, राजेंद्र तेलंग, सचिव सुजित चल्लावार आदी उपस्थित होते. सभेचे संचालन राजेश काळे, प्रास्ताविक अंकुश रोहणकर, आभार किरण कुमरे यांनी मानले.काँग्रेसचे दोन गट एकाच मंचावरराळेगाव तालुक्यात काँग्रेसचे दोन गट आहेत. गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही गटात एकमेकांवर कुरघोडीचे राजकरण सुरू आहे. मात्र सावनेर येथील मेळाव्यात अनेका वर्षांच्या संघर्षानंतर प्रथमच प्रा.वसंतराव पुरके, अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर व बाजार समितीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात दोन्ही गट सामिल झाले.काँग्रेसच्या दोन्ही गटाचे नेते यानिमित्ताने मतभेद विसरून एकाच मंचावर आले होते. मात्र हे नेते मनाने एकत्र येतील का असा प्रश्न कार्यकर्ते व मतदारांत उपस्थित होत आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माणिकराव ठाकरे यांनी वसंतराव पुरकेंना राजी केल्याची आतील गोटात चर्चा आहे.