शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
3
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
4
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
5
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
6
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
7
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
8
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
10
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
11
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
12
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
13
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
15
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
16
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
17
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
18
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
19
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
20
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी न देता शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 21:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राळेगाव : भाजप सरकारने शेतकऱ्यांना सन २००४ प्रमाणे सरसकट कर्जमाफी दिली नाही. यातून शेतकºयांची फसवणूक केली ...

ठळक मुद्देनाना पटोले : सावनेर येथे शेतकरी मेळावा, नेत्र तपासणी शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : भाजप सरकारने शेतकऱ्यांना सन २००४ प्रमाणे सरसकट कर्जमाफी दिली नाही. यातून शेतकºयांची फसवणूक केली आहे. दुसरीकडे शेतमालाला आश्वासनाप्रमाणे भाव दिला नाही. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाला असून शेतकरी आत्महत्यामध्ये वाढ झाली आहे. अशा सत्ताधाºयांना शेतकऱ्यांनी धडा शिकवावा, असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय किसान आघाडीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.तालुक्यातील सावनेर येथे शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कापूस, तूर, सोयाबीन या परंपरागत पिकाऐवजी आता फळबागांकडे वळा. त्यासाठी धरणाचे पाणी शेतीला मिळालेच पाहिजे अशी खंबीर भूमिका शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन माजीमंत्री माणिकराव ठाकरे यांनी केले. माजी मंत्री प्रा.वसंतराव पुरके यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही सदैव एकत्र आहो अशी ग्वाही दिली. शास्त्रीय, वैज्ञानिक, आधुनिक शेती करावी. शेतकऱ्यांशी आमची बांधिलकी असल्याचे बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर यांनी सांगितले.मनिष पाटील, देवानंद पवार यांनी समयोचित विचार मांडले. यावेळी चित्तरंजन कोल्हे, प्रवीण कोकाटे, मिलिंद इंगोले, अरविंद वाढोणकर, नंदकुमार गांधी, रमेश कन्नाके, अशोक पाटील, संजय काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर, नाना पटोले, देवानंद पवार यांच्यासह विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. डॉ.एन.बी.पाटील यांनी संत्रा व मोसंबी पिकाबाबत तर डॉ. मिलिंद गिरी यांनी तूर पिकाच्या व्यवस्थापनावर शेतकºयांना माहिती दिली. यावेळी किरण कुमरे यांच्या पुढाकाराने झालेल्या नेत्र तपासणी शिबिरात ५०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. बाजार समितीचे उपसभापती पुरुषोत्तम निम्रड, संचालक राजेंद्र महाजन, गोवर्धन वाघमारे, निश्चल बोभाटे, नामदेवराव फटींग, राजेंद्र तेलंग, सचिव सुजित चल्लावार आदी उपस्थित होते. सभेचे संचालन राजेश काळे, प्रास्ताविक अंकुश रोहणकर, आभार किरण कुमरे यांनी मानले.काँग्रेसचे दोन गट एकाच मंचावरराळेगाव तालुक्यात काँग्रेसचे दोन गट आहेत. गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही गटात एकमेकांवर कुरघोडीचे राजकरण सुरू आहे. मात्र सावनेर येथील मेळाव्यात अनेका वर्षांच्या संघर्षानंतर प्रथमच प्रा.वसंतराव पुरके, अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर व बाजार समितीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात दोन्ही गट सामिल झाले.काँग्रेसच्या दोन्ही गटाचे नेते यानिमित्ताने मतभेद विसरून एकाच मंचावर आले होते. मात्र हे नेते मनाने एकत्र येतील का असा प्रश्न कार्यकर्ते व मतदारांत उपस्थित होत आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माणिकराव ठाकरे यांनी वसंतराव पुरकेंना राजी केल्याची आतील गोटात चर्चा आहे.