शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कर्जमाफी न देता शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 21:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राळेगाव : भाजप सरकारने शेतकऱ्यांना सन २००४ प्रमाणे सरसकट कर्जमाफी दिली नाही. यातून शेतकºयांची फसवणूक केली ...

ठळक मुद्देनाना पटोले : सावनेर येथे शेतकरी मेळावा, नेत्र तपासणी शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : भाजप सरकारने शेतकऱ्यांना सन २००४ प्रमाणे सरसकट कर्जमाफी दिली नाही. यातून शेतकºयांची फसवणूक केली आहे. दुसरीकडे शेतमालाला आश्वासनाप्रमाणे भाव दिला नाही. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाला असून शेतकरी आत्महत्यामध्ये वाढ झाली आहे. अशा सत्ताधाºयांना शेतकऱ्यांनी धडा शिकवावा, असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय किसान आघाडीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.तालुक्यातील सावनेर येथे शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कापूस, तूर, सोयाबीन या परंपरागत पिकाऐवजी आता फळबागांकडे वळा. त्यासाठी धरणाचे पाणी शेतीला मिळालेच पाहिजे अशी खंबीर भूमिका शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन माजीमंत्री माणिकराव ठाकरे यांनी केले. माजी मंत्री प्रा.वसंतराव पुरके यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही सदैव एकत्र आहो अशी ग्वाही दिली. शास्त्रीय, वैज्ञानिक, आधुनिक शेती करावी. शेतकऱ्यांशी आमची बांधिलकी असल्याचे बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर यांनी सांगितले.मनिष पाटील, देवानंद पवार यांनी समयोचित विचार मांडले. यावेळी चित्तरंजन कोल्हे, प्रवीण कोकाटे, मिलिंद इंगोले, अरविंद वाढोणकर, नंदकुमार गांधी, रमेश कन्नाके, अशोक पाटील, संजय काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर, नाना पटोले, देवानंद पवार यांच्यासह विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. डॉ.एन.बी.पाटील यांनी संत्रा व मोसंबी पिकाबाबत तर डॉ. मिलिंद गिरी यांनी तूर पिकाच्या व्यवस्थापनावर शेतकºयांना माहिती दिली. यावेळी किरण कुमरे यांच्या पुढाकाराने झालेल्या नेत्र तपासणी शिबिरात ५०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. बाजार समितीचे उपसभापती पुरुषोत्तम निम्रड, संचालक राजेंद्र महाजन, गोवर्धन वाघमारे, निश्चल बोभाटे, नामदेवराव फटींग, राजेंद्र तेलंग, सचिव सुजित चल्लावार आदी उपस्थित होते. सभेचे संचालन राजेश काळे, प्रास्ताविक अंकुश रोहणकर, आभार किरण कुमरे यांनी मानले.काँग्रेसचे दोन गट एकाच मंचावरराळेगाव तालुक्यात काँग्रेसचे दोन गट आहेत. गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही गटात एकमेकांवर कुरघोडीचे राजकरण सुरू आहे. मात्र सावनेर येथील मेळाव्यात अनेका वर्षांच्या संघर्षानंतर प्रथमच प्रा.वसंतराव पुरके, अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर व बाजार समितीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात दोन्ही गट सामिल झाले.काँग्रेसच्या दोन्ही गटाचे नेते यानिमित्ताने मतभेद विसरून एकाच मंचावर आले होते. मात्र हे नेते मनाने एकत्र येतील का असा प्रश्न कार्यकर्ते व मतदारांत उपस्थित होत आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माणिकराव ठाकरे यांनी वसंतराव पुरकेंना राजी केल्याची आतील गोटात चर्चा आहे.