शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी आले मेटाकुटीस

By admin | Updated: November 10, 2014 22:51 IST

नव्या केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी धोरण आणि निसर्गाचा लहरीपणा, यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. नेहमीच नव्या आशेवर जगणाऱ्या शेतकऱ्यांचे जीवन निराशमय झाले आहे.

शिंदोला : नव्या केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी धोरण आणि निसर्गाचा लहरीपणा, यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. नेहमीच नव्या आशेवर जगणाऱ्या शेतकऱ्यांचे जीवन निराशमय झाले आहे.बहुप्रतीक्षेनंतर केंद्रात भाजपाची सत्ता आली. काँग्रेस आघाडीकडून निराशा पदरी पडलेल्या सर्व स्तरावरील मतदारांनी भाजपाच्या पारड्यात मोठ्या आशेने भरभरून मते टाकली. भाजपाच्या यशात शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. परंतु अवघ्या अल्प कालावधीतच जगाचा पोशिंदा केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाने निराश झाला आणि हेच का ‘अच्छे दिन’, म्हणून स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करताना दिसून येत आहेत.पूर्वी केंद्रात अन् राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना विरोधी पक्षातील भाजपाचे नेते आंदोलनाच्या माध्यमातून तत्कालीन सरकारवर आसूड ओढायचे़ जणू आम्हीच शेतकऱ्यांचे खरे कैवारी आहोत, असे ते दाखवायचे़ मात्र केंद्रात सत्ता स्थापन होताच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, परिस्थितीवर साध्या प्रतिक्रियादेखील प्रसार माध्यमांसमोर व्यक्त करून शेतकऱ्यांना दिलासा देताना आता ते दिसत नाही़ मोठ्या अपेक्षेने मोदी सरकारकडे पाहणाऱ्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाल्याचे चित्र शेतकऱ्यांत दिसून येत आहे़चालू हंगामात उशीरा सुरू झालेल्या आणि अपुऱ्या पावसामुळे खरीप उत्पादनात लक्षणीय घट येत आहे. जमिनीत ओलावा नसल्यामुळे रबी हंगामही पूर्णपणे धोक्यात सापडला आहे़ सोयाबीन, कापूस या खरीप पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्यानंतर रबी पिकांना पोषक वातावरण नसल्यामुळे रबी उत्पादनातही घट येण्याची दाट शक्यता आहे़ दरवर्षीपेक्षा उत्पादनात घट होऊनही मात्र शेतमालाच्या भावात ३० ते ४० टक्क्यांची घट झाली आहे़ महासंघाने कापूस खरेदी सुरू न केल्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांच्या अडचणीचा लाभ घेत हमी भावापेक्षा कमी भावात सर्व शेतमालाची खरेदी करीत आहे़ (वार्ताहर)