शहरं
Join us  
Trending Stories
1
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
१५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
4
भारतीय नौदलाची ताकद वाढणार! आज अँड्रोथ युद्धनौका मिळणार, जाणून काय आहे खास?
5
"मी माझ्या भावाचा मृतदेह स्वतःच्या हाताने बाहेर काढला", प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
6
हरमनप्रीत कौरचे तेवर! नजरेने धाक दाखवणारी पाकिस्तानी खेळाडू खाली मान घालून पळाली (VIDEO)
7
Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी
8
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
9
Indian shot dead: "मित्रा, तू बरा आहेस ना?" मदतीसाठी आलेल्या भारतीय व्यक्तीचीच गोळी घालून हत्या
10
VIRAL : 'सर डोकं दुखतंय...', कर्मचारी आजारी तरीही मॅनेजर सुट्टी देईना! संतापलेल्या तरुणानं काय केलं बघाच  
11
FD करुन तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही? CA ने दिला इशारा, म्हणाले खऱ्या कमाईसाठी गुंतवणूक धोरण बदला
12
Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
13
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
14
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
15
"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट
16
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
17
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
18
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
19
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
20
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक

शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी आले मेटाकुटीस

By admin | Updated: November 10, 2014 22:51 IST

नव्या केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी धोरण आणि निसर्गाचा लहरीपणा, यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. नेहमीच नव्या आशेवर जगणाऱ्या शेतकऱ्यांचे जीवन निराशमय झाले आहे.

शिंदोला : नव्या केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी धोरण आणि निसर्गाचा लहरीपणा, यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. नेहमीच नव्या आशेवर जगणाऱ्या शेतकऱ्यांचे जीवन निराशमय झाले आहे.बहुप्रतीक्षेनंतर केंद्रात भाजपाची सत्ता आली. काँग्रेस आघाडीकडून निराशा पदरी पडलेल्या सर्व स्तरावरील मतदारांनी भाजपाच्या पारड्यात मोठ्या आशेने भरभरून मते टाकली. भाजपाच्या यशात शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. परंतु अवघ्या अल्प कालावधीतच जगाचा पोशिंदा केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाने निराश झाला आणि हेच का ‘अच्छे दिन’, म्हणून स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करताना दिसून येत आहेत.पूर्वी केंद्रात अन् राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना विरोधी पक्षातील भाजपाचे नेते आंदोलनाच्या माध्यमातून तत्कालीन सरकारवर आसूड ओढायचे़ जणू आम्हीच शेतकऱ्यांचे खरे कैवारी आहोत, असे ते दाखवायचे़ मात्र केंद्रात सत्ता स्थापन होताच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, परिस्थितीवर साध्या प्रतिक्रियादेखील प्रसार माध्यमांसमोर व्यक्त करून शेतकऱ्यांना दिलासा देताना आता ते दिसत नाही़ मोठ्या अपेक्षेने मोदी सरकारकडे पाहणाऱ्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाल्याचे चित्र शेतकऱ्यांत दिसून येत आहे़चालू हंगामात उशीरा सुरू झालेल्या आणि अपुऱ्या पावसामुळे खरीप उत्पादनात लक्षणीय घट येत आहे. जमिनीत ओलावा नसल्यामुळे रबी हंगामही पूर्णपणे धोक्यात सापडला आहे़ सोयाबीन, कापूस या खरीप पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्यानंतर रबी पिकांना पोषक वातावरण नसल्यामुळे रबी उत्पादनातही घट येण्याची दाट शक्यता आहे़ दरवर्षीपेक्षा उत्पादनात घट होऊनही मात्र शेतमालाच्या भावात ३० ते ४० टक्क्यांची घट झाली आहे़ महासंघाने कापूस खरेदी सुरू न केल्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांच्या अडचणीचा लाभ घेत हमी भावापेक्षा कमी भावात सर्व शेतमालाची खरेदी करीत आहे़ (वार्ताहर)