शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

निम्न पैनगंगा प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला एल्गार, सहविचार सभेला हजारोंची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2022 11:21 IST

धरणविरोधी संघर्ष समितीची सहविचार सभा

सावळी सदोबा (यवतमाळ) : विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर निम्न पैनगंगा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी हजारो एकर शेती अधिग्रहित केली जात आहे. मात्र, शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जात नसल्याने शेतकऱ्यांनी या प्रकल्पाविरुद्ध लढ्याचा एल्गार केला आहे. प्रकल्पामुळे घरे गावे उद्ध्वस्त होऊन शेतकरी रस्त्यावर येण्याची भीती आहे. दुसरीकडे शासन जमिनीला तुटपुंजा निधी देऊन शेतकऱ्यांची बोळवण करीत आहे. त्यामुळे आता आम्हाला हा प्रकल्पच नको, अशी भूमिका या भागातील हजारो शेतकऱ्यांनी गुरुवारी घेतली.

आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा येथे गुरुवारी निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समिती विदर्भ-मराठवाडा यांच्या वतीने सहविचार सभा घेण्यात आली. या सभेला बुडीत क्षेत्रातील २५ गावांमधील शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. सभेत समितीच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी आपली मते मांडली. प्रकल्पाविरोधातील हा लढा ९५ गावांतील भूमिपुत्रांच्या अस्तित्वाचा आहे. त्यामुळे लढ्यात जीव गेला तरी मागे हटणार नाही, असा निर्धार व्यक्त करीत पुढील काळात या लढ्याला व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

या लढ्यासाठी आवश्यक आर्थिक मदत देण्याची तयारीही काही शेतकऱ्यांनी दर्शवित, धरण विरोधी संघर्ष समितीकडे निधी जमा केला. धरण होऊ द्यायचे नाही आणि होणारच असेल तर समृद्धी महामार्गाला जो मोबदला मिळाला, त्याच दराने धरणग्रस्तांनाही जमिनीचा मोबदला द्यावा, अशी मागणी यावेळी एकमुखी करण्यात आली.

सहविचार सभेत धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील, अॅड. बालाजी येरावार, बाबूभाई मुबारक तंवर, अॅड. पंजाबराव गावंडे, फारूकी. प्रा. भास्कर इथापे, डॉ. बाबाराव डाखोरे, प्रकाश गायकवाड, कॉ. शंकर सिडाम, बंडू नाईक, रामकृष्ण पाटील राऊत, मिलिंद पाटील, विवेक दहीफळे, प्रल्हादराव गावंडे आदींनी मार्गदर्शन केले. सभेला यवतमाळसह नांदेड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्तविक मुबारक तंवर, तर आभार विजय समगीर यांनी मानले.

समितीमुळेच मिळतोय समृद्धीचा मोबदला

धरण विरोधी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी याच विषयावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली होती. त्यांना समितीने शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितल्या होत्या. त्यानंतरच 'समृद्धी महामार्गासाठी संपादित जमिनीला कोरडवाहूसाठी ५ लाख तथा ओलिताच्या शेतीला १० लाख रुपये देण्यात येऊ लागले. हा निर्णय राजकीय मंडळींमुळे झाला नाही. याचे खरे श्रेय निम्न विरोधी संघर्ष समितीच्या लढ्याला असल्याचे प्रा. भास्कर इथापे यांनी यावेळी सांगितले. निम्न पैनगंगेचा लढाही असाच ताकदीने लढला जाईल, असा विश्वास त्यांनी प्रकल्पग्रस्तांना दिला.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती