शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

निम्न पैनगंगा प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला एल्गार, सहविचार सभेला हजारोंची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2022 11:21 IST

धरणविरोधी संघर्ष समितीची सहविचार सभा

सावळी सदोबा (यवतमाळ) : विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर निम्न पैनगंगा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी हजारो एकर शेती अधिग्रहित केली जात आहे. मात्र, शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जात नसल्याने शेतकऱ्यांनी या प्रकल्पाविरुद्ध लढ्याचा एल्गार केला आहे. प्रकल्पामुळे घरे गावे उद्ध्वस्त होऊन शेतकरी रस्त्यावर येण्याची भीती आहे. दुसरीकडे शासन जमिनीला तुटपुंजा निधी देऊन शेतकऱ्यांची बोळवण करीत आहे. त्यामुळे आता आम्हाला हा प्रकल्पच नको, अशी भूमिका या भागातील हजारो शेतकऱ्यांनी गुरुवारी घेतली.

आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा येथे गुरुवारी निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समिती विदर्भ-मराठवाडा यांच्या वतीने सहविचार सभा घेण्यात आली. या सभेला बुडीत क्षेत्रातील २५ गावांमधील शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. सभेत समितीच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी आपली मते मांडली. प्रकल्पाविरोधातील हा लढा ९५ गावांतील भूमिपुत्रांच्या अस्तित्वाचा आहे. त्यामुळे लढ्यात जीव गेला तरी मागे हटणार नाही, असा निर्धार व्यक्त करीत पुढील काळात या लढ्याला व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

या लढ्यासाठी आवश्यक आर्थिक मदत देण्याची तयारीही काही शेतकऱ्यांनी दर्शवित, धरण विरोधी संघर्ष समितीकडे निधी जमा केला. धरण होऊ द्यायचे नाही आणि होणारच असेल तर समृद्धी महामार्गाला जो मोबदला मिळाला, त्याच दराने धरणग्रस्तांनाही जमिनीचा मोबदला द्यावा, अशी मागणी यावेळी एकमुखी करण्यात आली.

सहविचार सभेत धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील, अॅड. बालाजी येरावार, बाबूभाई मुबारक तंवर, अॅड. पंजाबराव गावंडे, फारूकी. प्रा. भास्कर इथापे, डॉ. बाबाराव डाखोरे, प्रकाश गायकवाड, कॉ. शंकर सिडाम, बंडू नाईक, रामकृष्ण पाटील राऊत, मिलिंद पाटील, विवेक दहीफळे, प्रल्हादराव गावंडे आदींनी मार्गदर्शन केले. सभेला यवतमाळसह नांदेड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्तविक मुबारक तंवर, तर आभार विजय समगीर यांनी मानले.

समितीमुळेच मिळतोय समृद्धीचा मोबदला

धरण विरोधी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी याच विषयावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली होती. त्यांना समितीने शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितल्या होत्या. त्यानंतरच 'समृद्धी महामार्गासाठी संपादित जमिनीला कोरडवाहूसाठी ५ लाख तथा ओलिताच्या शेतीला १० लाख रुपये देण्यात येऊ लागले. हा निर्णय राजकीय मंडळींमुळे झाला नाही. याचे खरे श्रेय निम्न विरोधी संघर्ष समितीच्या लढ्याला असल्याचे प्रा. भास्कर इथापे यांनी यावेळी सांगितले. निम्न पैनगंगेचा लढाही असाच ताकदीने लढला जाईल, असा विश्वास त्यांनी प्रकल्पग्रस्तांना दिला.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती