शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

निम्न पैनगंगा प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला एल्गार, सहविचार सभेला हजारोंची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2022 11:21 IST

धरणविरोधी संघर्ष समितीची सहविचार सभा

सावळी सदोबा (यवतमाळ) : विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर निम्न पैनगंगा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी हजारो एकर शेती अधिग्रहित केली जात आहे. मात्र, शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जात नसल्याने शेतकऱ्यांनी या प्रकल्पाविरुद्ध लढ्याचा एल्गार केला आहे. प्रकल्पामुळे घरे गावे उद्ध्वस्त होऊन शेतकरी रस्त्यावर येण्याची भीती आहे. दुसरीकडे शासन जमिनीला तुटपुंजा निधी देऊन शेतकऱ्यांची बोळवण करीत आहे. त्यामुळे आता आम्हाला हा प्रकल्पच नको, अशी भूमिका या भागातील हजारो शेतकऱ्यांनी गुरुवारी घेतली.

आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा येथे गुरुवारी निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समिती विदर्भ-मराठवाडा यांच्या वतीने सहविचार सभा घेण्यात आली. या सभेला बुडीत क्षेत्रातील २५ गावांमधील शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. सभेत समितीच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी आपली मते मांडली. प्रकल्पाविरोधातील हा लढा ९५ गावांतील भूमिपुत्रांच्या अस्तित्वाचा आहे. त्यामुळे लढ्यात जीव गेला तरी मागे हटणार नाही, असा निर्धार व्यक्त करीत पुढील काळात या लढ्याला व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

या लढ्यासाठी आवश्यक आर्थिक मदत देण्याची तयारीही काही शेतकऱ्यांनी दर्शवित, धरण विरोधी संघर्ष समितीकडे निधी जमा केला. धरण होऊ द्यायचे नाही आणि होणारच असेल तर समृद्धी महामार्गाला जो मोबदला मिळाला, त्याच दराने धरणग्रस्तांनाही जमिनीचा मोबदला द्यावा, अशी मागणी यावेळी एकमुखी करण्यात आली.

सहविचार सभेत धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील, अॅड. बालाजी येरावार, बाबूभाई मुबारक तंवर, अॅड. पंजाबराव गावंडे, फारूकी. प्रा. भास्कर इथापे, डॉ. बाबाराव डाखोरे, प्रकाश गायकवाड, कॉ. शंकर सिडाम, बंडू नाईक, रामकृष्ण पाटील राऊत, मिलिंद पाटील, विवेक दहीफळे, प्रल्हादराव गावंडे आदींनी मार्गदर्शन केले. सभेला यवतमाळसह नांदेड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्तविक मुबारक तंवर, तर आभार विजय समगीर यांनी मानले.

समितीमुळेच मिळतोय समृद्धीचा मोबदला

धरण विरोधी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी याच विषयावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली होती. त्यांना समितीने शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितल्या होत्या. त्यानंतरच 'समृद्धी महामार्गासाठी संपादित जमिनीला कोरडवाहूसाठी ५ लाख तथा ओलिताच्या शेतीला १० लाख रुपये देण्यात येऊ लागले. हा निर्णय राजकीय मंडळींमुळे झाला नाही. याचे खरे श्रेय निम्न विरोधी संघर्ष समितीच्या लढ्याला असल्याचे प्रा. भास्कर इथापे यांनी यावेळी सांगितले. निम्न पैनगंगेचा लढाही असाच ताकदीने लढला जाईल, असा विश्वास त्यांनी प्रकल्पग्रस्तांना दिला.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती