शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची चिंता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 15:25 IST

मान्सून लवकरच केरळमध्ये धडकणार असल्याच्या वृत्ताने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. मशागत करून शेत पेरणीसाठी सज्ज असले तरी हातात एक दमडीही नसल्याने पाऊस वेळेवर आल्यास पेरणी कशी करावी, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

ठळक मुद्देकर्जाची प्रतीक्षाच तूर, हरभरा आणि विम्याचेही पैसे नाही

ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मान्सून लवकरच केरळमध्ये धडकणार असल्याच्या वृत्ताने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. मशागत करून शेत पेरणीसाठी सज्ज असले तरी हातात एक दमडीही नसल्याने पाऊस वेळेवर आल्यास पेरणी कशी करावी, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. कर्जमाफीनंतरही कर्जाची प्रतीक्षा कायम असून तूर, हरभरा आणि विम्याचेही पैसे शेतकऱ्यांच्या हाती पडले नाही.शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्हा गत पाच वर्षांपासून सातत्याने दुष्काळ झेलत आहे. गतवर्षी अपुऱ्या पावसाने कोरडा दुष्काळ पडला. यातून सावरत नाही तोच कपाशीवर गुलाबी बोंडअळीचे संकट आले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे उत्पन्न निम्यावर आले. त्यातच बाजारपेठेत हमी भावापेक्षाही कमी किंमतीत धान्य माल विकावा लागला. आता तर विकलेल्या तूर आणि हरभऱ्याचे पैसेही शेतकऱ्यांना मिळाले नाही. दुष्काळी परिस्थितीत विमा मदतीला धावून येईल, असे अनेकांना वाटत होते. परंतु त्याचेही पैसे आले नाही. अशा चिंताग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांना आशा आहे ती कर्जमाफीनंतर मिळणाऱ्या नवीन पीक कर्जाची. परंतु विविध अडचणीमुळे आजही शेतकऱ्यांच्या हाती कर्जाचे पैसे मिळाले नाहीत. राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँकेला दोन हजार कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले. जिल्हा बँकेने आतापर्यंत ३३ टक्के शेतकऱ्यांना कर्ज वितरित केले. राष्ट्रीयकृत बँकांनी केवळ दोन टक्के शेतकऱ्यांनाच कर्ज दिले. शासनाने अर्ज द्या, कर्ज घ्या ही योजना सुरू केली. परंतु यातही अनंत अडचणी आहेत.अशातच हवामान खात्याने शेतकऱ्यांना दिलासा देणारे अंदाज वर्तविले. अंदामाननंतर मान्सून कोणत्याही क्षणी केरळमध्ये धडकणार आणि कोकण मार्गे तो विदर्भात येणार. या सकारात्मक अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या अंगी हत्तीचे बळ संचारले. उधार उसणवार करून शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत केली. त्यातच इंधन दरवाढीने मशागतीचा खर्च हाताबाहेर गेला. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांजवळ आता पैसाच उरला नाही. जिल्ह्यात चार लाख शेतकरी असून नऊ लाख १४ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु पेरणीसाठी पैसा नसल्याने शेतकरी धास्तावला आहे. त्यातच शासनाने बियाणे कंपन्यांवर अनेक अटी टाकल्या. त्यामुळे सध्याही जिल्ह्यात बियाणे पोहोचले नाही. १५ मेपर्यंत बियाणे येणार असे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले होते. २५ मेपर्यंतही जिल्ह्यात बियाणे पोहोचले नाही. पाऊस वेळेवर आला तर एकाच वेळी बियाणे खरेदीमुळे गोंधळ उडून शेतकऱ्यांच्या माथी पुन्हा बोगस बियाणे मारण्याची शक्यता आहे. अशा या विपरित परिस्थितीत शेती पडिक तर राहणार नाही ना, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.शेतकऱ्यांची धूळ पेरणीकडे पाठजिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात धूळ पेरणी केली जाते. पावसापूर्वी पेरणी करून पावसाची प्रतीक्षा शेतकरी करतात. सिंचनाची सुविधा असणारे शेतकरी ओलितही करतात. मात्र यावर्षी जिल्ह्यात एकाही शेतकऱ्याने धूळ पेरणीची हिंमत केली नाही. गतवर्षी बोगस बियाण्यांमुळे गुलाबी बोंडअळीचा फटका बसला. तसेच आता मार्केटमध्येही बियाणे उपलब्ध झाले नाही. परिणामी जिल्ह्यात कोणत्याही शेतकऱ्याने धूळ पेरणी केली नसल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून दिसून येते.

टॅग्स :Farmerशेतकरी