शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची चिंता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 15:25 IST

मान्सून लवकरच केरळमध्ये धडकणार असल्याच्या वृत्ताने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. मशागत करून शेत पेरणीसाठी सज्ज असले तरी हातात एक दमडीही नसल्याने पाऊस वेळेवर आल्यास पेरणी कशी करावी, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

ठळक मुद्देकर्जाची प्रतीक्षाच तूर, हरभरा आणि विम्याचेही पैसे नाही

ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मान्सून लवकरच केरळमध्ये धडकणार असल्याच्या वृत्ताने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. मशागत करून शेत पेरणीसाठी सज्ज असले तरी हातात एक दमडीही नसल्याने पाऊस वेळेवर आल्यास पेरणी कशी करावी, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. कर्जमाफीनंतरही कर्जाची प्रतीक्षा कायम असून तूर, हरभरा आणि विम्याचेही पैसे शेतकऱ्यांच्या हाती पडले नाही.शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्हा गत पाच वर्षांपासून सातत्याने दुष्काळ झेलत आहे. गतवर्षी अपुऱ्या पावसाने कोरडा दुष्काळ पडला. यातून सावरत नाही तोच कपाशीवर गुलाबी बोंडअळीचे संकट आले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे उत्पन्न निम्यावर आले. त्यातच बाजारपेठेत हमी भावापेक्षाही कमी किंमतीत धान्य माल विकावा लागला. आता तर विकलेल्या तूर आणि हरभऱ्याचे पैसेही शेतकऱ्यांना मिळाले नाही. दुष्काळी परिस्थितीत विमा मदतीला धावून येईल, असे अनेकांना वाटत होते. परंतु त्याचेही पैसे आले नाही. अशा चिंताग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांना आशा आहे ती कर्जमाफीनंतर मिळणाऱ्या नवीन पीक कर्जाची. परंतु विविध अडचणीमुळे आजही शेतकऱ्यांच्या हाती कर्जाचे पैसे मिळाले नाहीत. राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँकेला दोन हजार कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले. जिल्हा बँकेने आतापर्यंत ३३ टक्के शेतकऱ्यांना कर्ज वितरित केले. राष्ट्रीयकृत बँकांनी केवळ दोन टक्के शेतकऱ्यांनाच कर्ज दिले. शासनाने अर्ज द्या, कर्ज घ्या ही योजना सुरू केली. परंतु यातही अनंत अडचणी आहेत.अशातच हवामान खात्याने शेतकऱ्यांना दिलासा देणारे अंदाज वर्तविले. अंदामाननंतर मान्सून कोणत्याही क्षणी केरळमध्ये धडकणार आणि कोकण मार्गे तो विदर्भात येणार. या सकारात्मक अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या अंगी हत्तीचे बळ संचारले. उधार उसणवार करून शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत केली. त्यातच इंधन दरवाढीने मशागतीचा खर्च हाताबाहेर गेला. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांजवळ आता पैसाच उरला नाही. जिल्ह्यात चार लाख शेतकरी असून नऊ लाख १४ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु पेरणीसाठी पैसा नसल्याने शेतकरी धास्तावला आहे. त्यातच शासनाने बियाणे कंपन्यांवर अनेक अटी टाकल्या. त्यामुळे सध्याही जिल्ह्यात बियाणे पोहोचले नाही. १५ मेपर्यंत बियाणे येणार असे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले होते. २५ मेपर्यंतही जिल्ह्यात बियाणे पोहोचले नाही. पाऊस वेळेवर आला तर एकाच वेळी बियाणे खरेदीमुळे गोंधळ उडून शेतकऱ्यांच्या माथी पुन्हा बोगस बियाणे मारण्याची शक्यता आहे. अशा या विपरित परिस्थितीत शेती पडिक तर राहणार नाही ना, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.शेतकऱ्यांची धूळ पेरणीकडे पाठजिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात धूळ पेरणी केली जाते. पावसापूर्वी पेरणी करून पावसाची प्रतीक्षा शेतकरी करतात. सिंचनाची सुविधा असणारे शेतकरी ओलितही करतात. मात्र यावर्षी जिल्ह्यात एकाही शेतकऱ्याने धूळ पेरणीची हिंमत केली नाही. गतवर्षी बोगस बियाण्यांमुळे गुलाबी बोंडअळीचा फटका बसला. तसेच आता मार्केटमध्येही बियाणे उपलब्ध झाले नाही. परिणामी जिल्ह्यात कोणत्याही शेतकऱ्याने धूळ पेरणी केली नसल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून दिसून येते.

टॅग्स :Farmerशेतकरी