शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

बोंडअळ्यांनी पीक फस्त केल्याचा धक्का बसलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 11:58 IST

शेतातील सोयाबीन पीक अळ्यांनी फस्त केल्याचे पाहून तो शेतकरी सैरभैर झाला. आता काहीही पिकणार नाही, या हतबलतेतून या शेतकऱ्याने स्वत:च विष घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देपिकावरील अळ्या खिशात भरल्या आठ दिवस मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

:लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतातील सोयाबीन पीक अळ्यांनी फस्त केल्याचे पाहून तो शेतकरी सैरभैर झाला. क्षणाचाही विलंब न करता त्याने झाडांवरील अळ्या उचलून खिशात भरायला सुरुवात केली. मात्र खिसा छोटा पडला. अळ्या संपता संपेना. आता काहीही पिकणार नाही, या हतबलतेतून या शेतकऱ्याने स्वत:च विष घेऊन आत्महत्या केली.हृदय पिळवटून टाकणारी ही घटना महागाव तालुक्यातील भांब या गावात घडली. रामराव विठ्ठल करे (४४) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. रामराव करे यांनी यंदा सोयाबीन पेरले आहे. २९ जुलै रोजी सकाळी ते आपल्या शेतात गेले, एक एकरातील संपूर्ण सोयाबीन पीक अळ्यांनी फस्त केल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. प्रत्येक झाडावर अळ्या दिसल्याने ते निराश झाले. पीक वाचविण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी भराभर झाडावरील अळ्या उचलायला सुरूवात केली. त्या अळ्या पुन्हा झाडावर जाऊ नये, म्हणून स्वत:च्या खिशात भरल्या. खिसा भरून गेला, तरी जिकडे पाहावे तिकडे सोयाबीनवर अळ्याच दिसत होत्या. निराशेतच रामराव घरी परतले आणि त्यांनी विषारी औषध प्राशन केले.ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना पुसदच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. आठ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर सोमवारी ६ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजता त्यांचा मृत्यू झाला. पुसद उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, आई असा आप्त परिवार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी