शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

बोंडअळ्यांनी पीक फस्त केल्याचा धक्का बसलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 11:58 IST

शेतातील सोयाबीन पीक अळ्यांनी फस्त केल्याचे पाहून तो शेतकरी सैरभैर झाला. आता काहीही पिकणार नाही, या हतबलतेतून या शेतकऱ्याने स्वत:च विष घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देपिकावरील अळ्या खिशात भरल्या आठ दिवस मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

:लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतातील सोयाबीन पीक अळ्यांनी फस्त केल्याचे पाहून तो शेतकरी सैरभैर झाला. क्षणाचाही विलंब न करता त्याने झाडांवरील अळ्या उचलून खिशात भरायला सुरुवात केली. मात्र खिसा छोटा पडला. अळ्या संपता संपेना. आता काहीही पिकणार नाही, या हतबलतेतून या शेतकऱ्याने स्वत:च विष घेऊन आत्महत्या केली.हृदय पिळवटून टाकणारी ही घटना महागाव तालुक्यातील भांब या गावात घडली. रामराव विठ्ठल करे (४४) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. रामराव करे यांनी यंदा सोयाबीन पेरले आहे. २९ जुलै रोजी सकाळी ते आपल्या शेतात गेले, एक एकरातील संपूर्ण सोयाबीन पीक अळ्यांनी फस्त केल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. प्रत्येक झाडावर अळ्या दिसल्याने ते निराश झाले. पीक वाचविण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी भराभर झाडावरील अळ्या उचलायला सुरूवात केली. त्या अळ्या पुन्हा झाडावर जाऊ नये, म्हणून स्वत:च्या खिशात भरल्या. खिसा भरून गेला, तरी जिकडे पाहावे तिकडे सोयाबीनवर अळ्याच दिसत होत्या. निराशेतच रामराव घरी परतले आणि त्यांनी विषारी औषध प्राशन केले.ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना पुसदच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. आठ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर सोमवारी ६ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजता त्यांचा मृत्यू झाला. पुसद उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, आई असा आप्त परिवार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी