शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी, शेतमजूर तहसीलवर धडकले

By admin | Updated: October 7, 2015 03:05 IST

तालुक्यातील शेतकरी आणि शेतमजुरांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना सोबतच शेतमजुरांनाही अनेक समस्या भेडसावत आहे.

राळेगाव येथे निवेदन सादर : आर्थिक सहकार्य आणि हाताला काम देण्याची मागणीराळेगाव : तालुक्यातील शेतकरी आणि शेतमजुरांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना सोबतच शेतमजुरांनाही अनेक समस्या भेडसावत आहे. शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत आणि शेतमजुरांना कामे उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. तहसीलसमोर धरणे देऊन निवेदन सादर करण्यात आले.दीड महिना पावसाचा खंड आणि दीर्घ विश्रांतीनंतर पावसाचा अतिरेक यामुळे सोयाबीन, कापूस आदी पिकांची नासाडी झाली. शेतकरी हवालदिल झाला. सोबतच मजुरांच्या हाताला काम मिळाले नाही. तालुक्यात रोजगाराची पर्यायी संधी नसल्याने मागील दोन महिन्यांपासून शेतमजूर कामासाठी भटकत आहे. रोजगाराच्या मागणीसाठी गेल्या महिन्यात नगरपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय आणि उपविभागीय कार्यालयाला निवेदन देण्यात आले होते. मात्र याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे मजुरांनी तहसीलसमोर धरणे देऊन निवेदन सादर केले.यावेळी मजुरांच्यावतीने रोजगार मागणी अर्जाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत म्हणून हेक्टरी २५ हजार रुपये प्रमाणे किमान दोन हेक्टरपर्यंत ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. प्रसंगी आंदोलनकर्त्यांना प्रा. प्रकाश देवघरे यांनी संबोधित केले. जिल्हा परिषद सदस्य मिलिंद धुर्वे, बेंबळा कालवे संघर्ष समितीचे तालुका प्रमुख सुधीर जवादे यांनीही मार्गदर्शन केले. प्रश्न निकाली न काढल्यास शेतकरी-शेतमजुरांचा लढा तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी दादाजी नागोसे, युसुफ अली सैयद आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)