शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

शेतकरी, शेतमजूर तहसीलवर धडकले

By admin | Updated: October 7, 2015 03:05 IST

तालुक्यातील शेतकरी आणि शेतमजुरांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना सोबतच शेतमजुरांनाही अनेक समस्या भेडसावत आहे.

राळेगाव येथे निवेदन सादर : आर्थिक सहकार्य आणि हाताला काम देण्याची मागणीराळेगाव : तालुक्यातील शेतकरी आणि शेतमजुरांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना सोबतच शेतमजुरांनाही अनेक समस्या भेडसावत आहे. शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत आणि शेतमजुरांना कामे उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. तहसीलसमोर धरणे देऊन निवेदन सादर करण्यात आले.दीड महिना पावसाचा खंड आणि दीर्घ विश्रांतीनंतर पावसाचा अतिरेक यामुळे सोयाबीन, कापूस आदी पिकांची नासाडी झाली. शेतकरी हवालदिल झाला. सोबतच मजुरांच्या हाताला काम मिळाले नाही. तालुक्यात रोजगाराची पर्यायी संधी नसल्याने मागील दोन महिन्यांपासून शेतमजूर कामासाठी भटकत आहे. रोजगाराच्या मागणीसाठी गेल्या महिन्यात नगरपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय आणि उपविभागीय कार्यालयाला निवेदन देण्यात आले होते. मात्र याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे मजुरांनी तहसीलसमोर धरणे देऊन निवेदन सादर केले.यावेळी मजुरांच्यावतीने रोजगार मागणी अर्जाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत म्हणून हेक्टरी २५ हजार रुपये प्रमाणे किमान दोन हेक्टरपर्यंत ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. प्रसंगी आंदोलनकर्त्यांना प्रा. प्रकाश देवघरे यांनी संबोधित केले. जिल्हा परिषद सदस्य मिलिंद धुर्वे, बेंबळा कालवे संघर्ष समितीचे तालुका प्रमुख सुधीर जवादे यांनीही मार्गदर्शन केले. प्रश्न निकाली न काढल्यास शेतकरी-शेतमजुरांचा लढा तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी दादाजी नागोसे, युसुफ अली सैयद आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)