शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

अन् हताश झालेल्या शेतकऱ्याने ५ एकरातील संत्रा बागेवर फिरविली आरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 16:45 IST

पावसामुळे संत्र्याचे नुकसान झाल्याने एका शेतकऱ्याने फळांनी लदबलेली पाच एकरातील संपूर्ण बागच काढून टाकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पाच एकरातील संत्रा झाडांवर आरी चालविली.

यवतमाळ : अस्मानी व सुलतानी संकटामुळे सर्वच शेतकरी हवालदिल झाले आहे. शासकीय धोरणामुळे अनेक शेतकरी संताप व्यक्त करीत आहे. याच संतापातून तालुक्यातील उमरी येथील एका वृद्ध शेतकऱ्याने तब्बल पाच एकरावर उभ्या असलेल्या संत्रा झाडांवर आरी चालविली.

शेतकरी रघुनाथ मेश्राम यांनी उमरी येथे आपल्या पाच एकरात संत्रा बगीचा लावला होता. संत्रा आणि भाजीपाला विकून ते कुुटुंब चालवितात. संपूर्ण तालुक्यात संत्रा ते प्रसिद्ध आहे. मात्र यंदा पावसामुळे संत्र्याचे नुकसान झाले. झाडावरील काही फळे चोरट्यांनी लंपास केली. रघुनाथ मेश्राम यांचे वय ६५ झाले आहे. त्यामुळे आता आपण कुणाशी भांडूही शकत नाही, असे त्यांनी सांगितले.

पावसामुळे संत्र्याचे नुकसान झाल्याने हताशपणे त्यांनी आता फळांनी लदबलेली पाच एकरातील संपूर्ण बागच काढून टाकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पाच एकरातील संत्रा झाडांवर आरी चालविली. पावसामुळे नुकसान होऊनही शासकीय कर्मचारी संवेदनशीलपणे वागत नसल्याचा आरोप त्यांनी केला. शासनदरबारी कुणीच दखल घेत नाही. त्यामुळे आपण हा टोकाचा निर्णय घेतल्याचे मेश्राम यांनी सांगितले.

आरा चालविताना डोळ्यांत अश्रू

मुलाप्रमाणे जपलेली संत्राबाग स्वत:च काढून टाकताना रघुनाथ मेश्राम यांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते. शासन आणि कृषी विभागाने कोणतीही मदत न केल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. या झाडांचे आता संरक्षण करू शकत नसल्याने पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या संत्राबागेवर आरा चालवीत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी