शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
2
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
3
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
4
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
5
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
6
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
7
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
8
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
9
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
10
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
11
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
12
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
13
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
14
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
15
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
16
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
17
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
18
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
19
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
20
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

मजुरांअभावी शेती कामांना लागला ‘ब्रेक’

By admin | Updated: May 15, 2015 02:20 IST

लवकरच खरिपाचा हंगाम सुरू होणार असून ग्रामीण भागात शेतीच्या उन्हाळी मशागतीच्या कामांना वेग आला आहे.

नेर : लवकरच खरिपाचा हंगाम सुरू होणार असून ग्रामीण भागात शेतीच्या उन्हाळी मशागतीच्या कामांना वेग आला आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांना मजूरच मिळत नसल्याने ते काळजीत आहेत. मजुरांअभावी शेतीची कामे रेंगाळली आहे. परिणामी खरिपाची लागवड कशी करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.शासनाकडून ग्रामीण भागात स्वस्त धान्य वितरित केले जाते. शिवाय १०० दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यात येते. प्रत्यक्षात मात्र रोजगार हमी योजनेच्या कामावर जाण्यासाठी मजूर इच्छूकच नसल्याचे दिसते. शेतातील अंगमेहनीच्या कामाकडेही नवीन पिढीने आता दुर्लक्ष केले आहे. पूर्वी अन्न, धान्यासाठी मजूर शेतावर राबत होते. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात ज्वारी व इतर धान्याची लागवड करीत होते. आता मजूरवर्गाला शासनाकडूनच नाममात्र दरात भरपूर धान्य मिळते. त्यामुळे शेतकरी धान्य देतील या भरवशावर मजूर नाहीत. शिवाय मजुरीचे दरही चांगले वाढले आहेत. गावातील कामांपेक्षा शहरी भागातील कामांकडे नवीन पिढीचा कल आहे. पुण्या-मुंबईत कारखान्यांमध्ये तसेच मराठवाड्यात ऊस तोडणीच्या कामावर मोठ्या प्रमाणात दरवर्षी मजूर जात असते. त्यामुळे तालुक्यातील शेतातील कामांसाठी मजूरच मिळत नाही. ज्यांच्याकडे अत्यल्प शेती आहे, असे छोटे शेतकरी स्वत:च आपल्या कुटुंबासह शेतात राबतात. परंतु मोठ्या शेतकऱ्यांना ते शक्य होत नसल्याने ते मजुरांना अंगावर रोख रक्कम देवून बाहेरगावहून वाहनाने आणतात. अन्नधान्यासाठी आता कुणीच काम करायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनाही नाईलाजास्तव नगदी पिकांची लागवण करावी लागत आहे. यातूनच सोयाबीनसारख्या पिकांचा पेरा वाढला आहे. मागील तीन वर्षांपासून तालुक्यात मोठ्या प्रमाणात उद्भवत असलेल्या दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांना आणखी अडचणीत आणले आहे. शेतशिवारात राबण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतीची कामेही रखडली आहे. मे महिना अर्धा संपला असतानाही खरिपाच्या मशागतीची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. रोजगार हमी योजनेवरील मजुरीचे दर सध्याच्या महागाईच्या तुलनेत फारच कमी आहे. त्यामुळे अल्पशा मोबदल्यात कुणाचेही घर चालणे कठीण आहे. त्यामुळे शासनाने मजुरीचे दर वाढविणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात मजुरांना मजूरी चांगल्या रितीने उपलब्ध झाल्यास ते मजुरीच्या शोधात इतरत्र भटकणार नाही. त्यासाठी शासनासह इतरांनीही प्रयत्न करायला पाहिजे. (तालुका प्रतिनिधी)