शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

दोन हजार एकर शेतीला फास

By admin | Updated: December 26, 2015 03:19 IST

सावकारांना कोेरपासून ढोपरापर्यंत सोलून काढण्याचे आदेश तत्कालीन गृह मंत्री आर. आर. पाटलांनी दिले होते.

अवैध सावकारी : ४५० प्रकरणात फेर अपिलाचे संकेत रूपेश उत्तरवार यवतमाळ सावकारांना कोेरपासून ढोपरापर्यंत सोलून काढण्याचे आदेश तत्कालीन गृह मंत्री आर. आर. पाटलांनी दिले होते. २००६ मध्ये अवैध सावकारांनी कर्ज प्रकरणात दोन हजार एकर जमीन हडपल्याच्या ४५० तक्रारी सहकार विभागाकडे आल्या होत्या. खरेदी खतामुळे अवैध सावकारांना पळवाट मिळली. त्यामुळे ४५० प्रकरण फेटाळले गेले होते. कायद्यात तरतुद झाल्याने सावकारांचे खरेदी खत रद्द करण्याचा अधिकार आता जिल्हा उपनिबंधकांना मिळाला आहे. यामुळे सावकारग्र्रस्त शेतकऱ्यांना जमीन परत मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.सावकारांनी कर्ज देतांना शेत जमिनीचे गहाणखत करण्याऐवजी सरळ खरेदी खत केले होते. यामुळे या शेतजमिनीत सावकारी सिध्द होत नव्हती. खरेदी खतामुळे शेतजमीन विकत घेतल्याचे स्पष्ट होत होते. कायद्यातील या पळवाटीचा फायदा बहुतांश सावकारांनी घेतला. यामुळे सहकार विभागाकडे अवैध सावकारीच्या तक्रारी आल्यानंतरही कुठलीही कारवाई झाली नाही. उलट कायद्यातील त्रुुटीमुळे अवैध सावकारी प्रकरणात चौकशीनंतर खारीज करण्यात आल्या.सावकारी कायद्यात बदल करण्यासाठी सावकारग्रस्त शेतकऱ्यांनी राष्ट्रपतीसह राज्य आणि केंद्राकडे दुरूस्तीची मागणी केली होती. सावकारी कायद्यात बदल करण्यात आले. २०१४ च्या अधिनियमानुसार अवैध सावकारी प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश सहकार विभागाला मिळाले आहे. या नवीन कायद्यानुसार अवैध सावकारानी कर्ज प्रकरणात जमीन खरेदी केली असल्यास हे खरेदी खत जिल्हा उपनिबंधकांना रद्द करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.त्यासाठी काही अटी आहे. अवैध सावकारीचे प्रकरण कायद्याच्या अंमलबजावनी वर्षापासून १५ वर्षाच्या आतील असने गरजेचे आहे. तरच या प्रकरणात सावकारग्रस्त शेतकऱ्यांना आपली शेतजमीन सोडविता येणार आहे. १५ वर्षानंतरचे प्रकरण असल्यास सावकारग्रस्त शेतकरी नवीन कायद्यात बसणार नाही.