शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
3
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
4
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
5
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
6
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
7
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
8
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
9
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
10
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
11
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
12
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
13
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
14
जातगणना : मॅजिक की मंडल?
15
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
16
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
17
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
18
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
19
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
20
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...

बदलीसाठी बनावट कागदपत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:08 IST

एका ग्रामसेवकाने पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत रायगड जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात बदलून येण्यासाठी चक्क पत्नीच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली. पत्नी नोकरीत नसताही ती एका संस्थेत नोकरीत असल्याचे दर्शवून बदलीचा लाभ घेतला. ही गंभीर बाब उघडकीस येताच जिल्हा परिषदेने तीन सदस्यीय चौकशी समिती नेमून या प्रकरणाचा छडा लावण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देग्रामसेवकाचा प्रताप : चौकशी समितीच्या अहवालाकडे लागले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एका ग्रामसेवकाने पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत रायगड जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात बदलून येण्यासाठी चक्क पत्नीच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली. पत्नी नोकरीत नसताही ती एका संस्थेत नोकरीत असल्याचे दर्शवून बदलीचा लाभ घेतला. ही गंभीर बाब उघडकीस येताच जिल्हा परिषदेने तीन सदस्यीय चौकशी समिती नेमून या प्रकरणाचा छडा लावण्याचा निर्णय घेतला आहे.आर्णी तालुक्यात सध्या कार्यरत नागरगोजे नामक ग्रामसेवक पूर्वी रायगड जिल्ह्यात कार्यरत होते. त्यांनी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केला. त्यात आपली पत्नी यवतमाळ जिल्ह्यातील एका संस्थेवर स्वयंपाकी म्हणून कार्यरत असल्याचे कागदपत्र जोडले. पती-पत्नी एकत्रीकरणाच्या नियमानुसार ते पात्र ठरल्याने शासनाने त्यांच्या आंतरजिल्हा बदलीला मंजुरी दिली. त्यानंतर ते यवतमाळ जिल्हा परिषदेत रुजू झाले. वास्तविक कर्मचाऱ्याला रुजू करून घेताना संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी करून घेण्याची जबाबदारी त्या विभाग प्रमुखाची असते. मात्र येथील जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांची कागदपत्रे ग्राह्य धरून त्यांना रुजू करून घेतले.आता या प्रकरणाचा भंडफोड झाला. त्या ग्रामसेवकाने पत्नी एका संस्थेत स्वयंपाकी असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. मात्र त्या संस्थेत दुसरीच व्यक्ती स्वयंपाकी म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे सदर ग्रामसेवकाने पत्नी संस्थेत नोकरीत असल्याचे बनावट कागदपत्र तयार करून बदली करवून घेतल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे यात संस्थेचीही परस्पर फसवणूक झाली. त्यामुळे ती संस्थाही ग्रामसेवकाविरूद्ध फौजदारी तक्रार करणार असल्याचे कळते.तीन दिवसात अहवालजिल्हा परिषदेच्या तीन सदस्यीय चौकशी समितीचे प्रमुख विस्तार अधिकारी रामदास चंदनकर आहे. या समितीत नेरच्या विस्तार अधिकारी रिंकी डाबरे आणि यवतमाळचे विस्तार अधिकारी आर.आर. जारंडे यांचा समावेश आहे. ही समिती येत्या दोन ते तीन दिवसांत आपला अहवाल सादर करणार असल्याचे चंदनकर यांनी सांगितले. सदर ग्रामसेवक संघटनेचा तालुका पदाधिकारीसुद्धा आहे. तथापि त्याला रुजू करून घेतानाच या सर्व कागदपत्रांची पडताळणी का करण्यात आली नाही, याची चौकशी होणेही गरजेचे झाले आहे.