शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

बदलीसाठी बनावट कागदपत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:08 IST

एका ग्रामसेवकाने पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत रायगड जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात बदलून येण्यासाठी चक्क पत्नीच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली. पत्नी नोकरीत नसताही ती एका संस्थेत नोकरीत असल्याचे दर्शवून बदलीचा लाभ घेतला. ही गंभीर बाब उघडकीस येताच जिल्हा परिषदेने तीन सदस्यीय चौकशी समिती नेमून या प्रकरणाचा छडा लावण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देग्रामसेवकाचा प्रताप : चौकशी समितीच्या अहवालाकडे लागले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एका ग्रामसेवकाने पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत रायगड जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात बदलून येण्यासाठी चक्क पत्नीच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली. पत्नी नोकरीत नसताही ती एका संस्थेत नोकरीत असल्याचे दर्शवून बदलीचा लाभ घेतला. ही गंभीर बाब उघडकीस येताच जिल्हा परिषदेने तीन सदस्यीय चौकशी समिती नेमून या प्रकरणाचा छडा लावण्याचा निर्णय घेतला आहे.आर्णी तालुक्यात सध्या कार्यरत नागरगोजे नामक ग्रामसेवक पूर्वी रायगड जिल्ह्यात कार्यरत होते. त्यांनी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केला. त्यात आपली पत्नी यवतमाळ जिल्ह्यातील एका संस्थेवर स्वयंपाकी म्हणून कार्यरत असल्याचे कागदपत्र जोडले. पती-पत्नी एकत्रीकरणाच्या नियमानुसार ते पात्र ठरल्याने शासनाने त्यांच्या आंतरजिल्हा बदलीला मंजुरी दिली. त्यानंतर ते यवतमाळ जिल्हा परिषदेत रुजू झाले. वास्तविक कर्मचाऱ्याला रुजू करून घेताना संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी करून घेण्याची जबाबदारी त्या विभाग प्रमुखाची असते. मात्र येथील जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांची कागदपत्रे ग्राह्य धरून त्यांना रुजू करून घेतले.आता या प्रकरणाचा भंडफोड झाला. त्या ग्रामसेवकाने पत्नी एका संस्थेत स्वयंपाकी असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. मात्र त्या संस्थेत दुसरीच व्यक्ती स्वयंपाकी म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे सदर ग्रामसेवकाने पत्नी संस्थेत नोकरीत असल्याचे बनावट कागदपत्र तयार करून बदली करवून घेतल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे यात संस्थेचीही परस्पर फसवणूक झाली. त्यामुळे ती संस्थाही ग्रामसेवकाविरूद्ध फौजदारी तक्रार करणार असल्याचे कळते.तीन दिवसात अहवालजिल्हा परिषदेच्या तीन सदस्यीय चौकशी समितीचे प्रमुख विस्तार अधिकारी रामदास चंदनकर आहे. या समितीत नेरच्या विस्तार अधिकारी रिंकी डाबरे आणि यवतमाळचे विस्तार अधिकारी आर.आर. जारंडे यांचा समावेश आहे. ही समिती येत्या दोन ते तीन दिवसांत आपला अहवाल सादर करणार असल्याचे चंदनकर यांनी सांगितले. सदर ग्रामसेवक संघटनेचा तालुका पदाधिकारीसुद्धा आहे. तथापि त्याला रुजू करून घेतानाच या सर्व कागदपत्रांची पडताळणी का करण्यात आली नाही, याची चौकशी होणेही गरजेचे झाले आहे.