शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

शैक्षणिक असमतोलावर ‘सगुण’ उतारा; विद्या प्राधिकरणाचा नवा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 13:14 IST

राज्यातील ५० हजारांपेक्षा जास्त प्राथमिक शाळा अप्रगतच राहिल्या आहेत. हा असमतोल दूर करण्यासाठी आता ‘सगुण’ उपक्रम राबविला जाणार आहे.

ठळक मुद्दे मागास शाळांची जबाबदारी प्रगत शाळांवर

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यातील अनेक शाळांनी अध्यापनात सुधारणा करीत आणि नवे तंत्रज्ञान वापरुन शैक्षणिक प्रगती साधली आहे. मात्र त्याच वेळी ५० हजारांपेक्षा जास्त प्राथमिक शाळा अप्रगतच राहिल्या आहेत. हा असमतोल दूर करण्यासाठी आता ‘सगुण’ उपक्रम राबविला जाणार आहे. त्यानुसार प्रगत आणि अप्रगत अशा दोन-दोन शाळांच्या जोड्या लावल्या जाणार आहेत.शैक्षणिक प्रगतीत महाराष्ट्र देशातील पहिल्या तीन राज्यात समाविष्ठ व्हावे यासाठी शिक्षण विभागाने जंगजंग पछाडले. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असले तरी अद्यापही हजारो प्राथमिक शाळा प्रगत होऊ शकलेल्या नाहीत. विशेष म्हणजे असरच्या अहवालाने आणि शासनाच्याच राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे. त्यामुळे उर्वरित मागास शाळांनाही प्रगत करण्याची जबाबदारी आता प्रगत शाळांवर दिली जाणार आहे. त्यासाठी विद्या प्राधिकरणाने सगुण उपक्रम सुरू केला आहे. सगुण म्हणजे सहकार्यासह गुणवत्ता.या उपक्रमात एका केंद्रातील एक अप्रगत आणि दुसरी प्रगत शाळा एकमेकांशी जोडली जाणार आहे. प्रगत शाळेतील तज्ज्ञ शिक्षकांनी ठराविक कालावधीत अप्रगत शाळेतही शिकवावे, अप्रगत शाळेतील विद्यार्थ्यांना ठराविक दिवशी प्रगत शाळेत बसून शिकता यावे असा परस्पर संबंध जोडला जाणार आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम वर्षभर काटेकोर राबविण्यासाठी नोडल अधिकारीही नेमले जाणार आहे. त्याची विशेष जबाबदारी संबंधित केंद्र प्रमुख आणि प्रगत शाळेतील समन्वयक शिक्षकावर दिली जाणार आहे.असा आहे शैक्षणिक असमतोलमहाराष्ट्रात प्राथमिक शाळांच्या बाबतीत मोठा असमतोल निर्माण झाला आहे. एक लाखापेक्षा अधिक शाळा असताना केवळ तीन हजार ३२५ शाळांना आयएसओ मानांकन मिळू शकले आहे. तर १५ हजार ४५२ शाळांमध्येच अ‍ॅक्टीव्हीटी बेस्ड लर्निंग सुरू आहे. शिवाय एक लाखाच्या तुलनेत निम्म्या म्हणजे ४९ हजार ५८३ शाळाच ‘शाळा सिद्धी’च्या स्वयंमूल्यांकनात प्रगत ठरू शकल्या. यात प्राथमिक ३७ हजार १४८ तर १२ हजार ४३५ उच्च प्राथमिक शाळांचा समावेश आहे. राज्यातील एकूण शाळांच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ५० टक्के आहे. ५० टक्के शाळा अजूनही अप्रगत आहे.

टॅग्स :Schoolशाळा