शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

नेर तालुक्यात टॉवरग्रस्त शेतकऱ्यांची पिळवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 23:34 IST

शेतजमीन आणि शेती पिकाचे मोठे नुकसान होत असतानाही टॉवरग्रस्त शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे. शासनाच्या नवीन निर्णयाला मूठमाती देत विविध लाभ देण्यात मनमानी केली जात आहे. यातून मुक्तता व्हावी यासाठी तालुक्यातील टॉवरग्रस्त १ मे रोजी आंदोलन करणार आहेत.

ठळक मुद्देकंपनीची मनमानी : १ मे रोजी आंदोलन, शासनाच्या नव्या निर्णयाला मूठमाती

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : शेतजमीन आणि शेती पिकाचे मोठे नुकसान होत असतानाही टॉवरग्रस्त शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे. शासनाच्या नवीन निर्णयाला मूठमाती देत विविध लाभ देण्यात मनमानी केली जात आहे. यातून मुक्तता व्हावी यासाठी तालुक्यातील टॉवरग्रस्त १ मे रोजी आंदोलन करणार आहेत.तालुक्याच्या जवळपास ३०० शेतकऱ्यांच्या जमिनीवर टॉवर उभारण्यात आले आहे. यासाठीचा मोबदला २००७ च्या आदेशानुसारच दिला जाईल, यावर कंपनी ठाम आहे. या प्रकारात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने सन २०१० मध्ये नवीन आदेश काढला. यात स्पष्ट करण्यात आलेल्या बाबीनुसार मोबदला दिला जात नाही. टॉवरखाली आलेल्या जमिनीचे क्षेत्र मोजून दीडपट मोबदला द्यावा, रेडीरेकनरच्या दरापेक्षा दुप्पट मोबदला टॉवरग्रस्तांना देण्यात यावा, टॉवरकतिा दोन गुंठे जमीन गेली असल्यास ती तीन गुंठे धरावी, कोरडवाहू जमिनीचा दर प्रती एकर तीन लाख रुपये असल्यास चार लाख रुपये एकर धरण्यात यावा, ताराखाली असलेली जमीन कॉरिडोरसह अर्थात लांबी-रूंदी जे क्षेत्र येईल त्याच्या १५ टक्के नुकसानीचे क्षेत्र ग्राह्य धरावे, असे शासनाने स्पष्ट केले आहे. मात्र कपंनी जुन्याच आदेशाने मदतीवर अडून बसली आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. यानंतरही कंपनी मानत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी टॉवरविरोधी कृती समिती स्थापन केली आहे. समितीने केलेल्या आंदोलनामुळे ऊर्जा व कामगार विभागाने ३१ मे २०१७ रोजी मोबदल्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर केला. त्यातही योग्य मोबदला मिळण्याची खात्री नाही, असे टॉवरग्रस्त आंदोलन समितीचे मिलन राठोड यांनी म्हटले आहे. हा प्रश्न निकाली न निघावा यासाठीच १ मे रोजी आंदोलन केले जाणार आहे.शेतात काम करताना भीतीशेतात उभारलेल्या टॉवरमुळे नुकसान होत आहे. माकडं पिकांची नासाडी करून टॉवरवर चढून बसतात. अनेक ठिकाणी अर्थिंग योग्य नसल्याने शेतात काम करणाऱ्यांच्या पायांना मुंग्या येतात, सौम्य विद्युत धक्का बसतो. टॉवरच्या आजूबाजूला विहीर, बोअरवेल करता येत नाही. लगतच्या भागात पिकाला पाणीही देता येत नाही. एवढे नुकसान सहन करूनही कंपनी नियमानुसार मदतीस टाळाटाळ करत आहे.

टॅग्स :electricityवीज