शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

भूलथापांना बळी पडत प्रत्येक महिन्याला पाच मुली बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 18:03 IST

अल्पवयीन मुलींचा टोकाचा निर्णय : भाकरीचा चंद्र शोधण्यात संवाद हरपला

जब्बार चीनी लोकमत न्यूज नेटवर्क वणी : वाढती महागाई, कुटुंबीयांच्या अपेक्षा, मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पालकांची मरमर सुरू आहे. भाकरीचा चंद्र शोधण्यात व्यस्त झालेल्या पालकांना कुटुंबातील मुला- मुलींशी संवाद साधण्यास उसंतच नसल्याने एका मर्यादेपर्यंत कुंथून आयुष्य जगणारी मुले आता डिजिटल संवादाच्या नादी लागली आहेत. हवे ते पालकांकडून देण्याच्या प्रयत्नात अत्यावश्यक मोबाईल, सोशल मीडियाच्या माध्यमातून आभासी सुखाच्या कल्पनेत अल्पवयीन मुली टोकाचा निर्णय घेत घर सोडून जाण्याचे प्रमाण वाढत आहे. 

एकत्र कुटुंब पद्धत केव्हाच कालबाह्य झाली आहे. पूर्वीचे चार ते पाच भाऊ-बहिणीचे कुटुंब आता एकुलत्या एक आपत्यावर येऊन ठेपले आहे. किमान दोनच अपत्य जन्माला घालून त्यांचे संगोपन आणि शिक्षण करण्यात आई-वडिलांचे आयुष्य खपून जातेय. अत्याधुनिक जीवनशैलीचा अवलंब वाढल्याने खर्चातही वाढ झाली आहे. परिणामी, आई आणि वडील, अशा दोघांनाही पैसा कमावण्यासाठी घराबाहेर पडावे लागत आहे. कुटुंबातील लहानगे आणि वयोवृद्ध यांच्याशी होणारा संवाद पूर्णतः हरपून गेल्याने त्याचे दुष्परिणाम आता प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. आपल्या मुलांना हवे ते देण्याची क्षमता असणाऱ्या पालकांना पाल्यांशी संवाद साधण्यास वेळ नाही, त्यांचे ऐकून घेणाऱ्या कुटुंबात कोणी नाही. अशा अवस्थेत अल्पवयीन मुले-मुली आभासी जगाकडे खेचले जात असून त्यांच्या हातातील मोबाईल त्यांचा सच्चा साथी झाला आहे. जगाला मुठीत आणलेल्या मोबाईल आणि सोशल मीडियाद्वारे अल्पवयीन मुले आभासी संवाद (चॅटिंग) साधू लागली आहेत. याच चॅटिंगच्या माध्यमातून नवे मित्र, मैत्रिणी तयार होऊन कमी वयातच नको ते करण्याचे धाडस ही मंडळी करू लागली आहेत. 

फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मैत्री व ओळखी होऊन नंतर त्याचे प्रेमात रूपांतर आणि वयाची १८ वर्षे होण्यापूर्वीच पलायन केलेल्या मुलींचे प्रमाण यात सर्वाधिक असून, गेल्या आठ महिन्यांत वणी तालुक्यात जवळपास ३८ मुलींनी पलायन केले आहे. त्यापैकी बहुतांश मुली १७ वर्षे पाच महिने, आठ महिने, १० महिने, अशाच वयाची आहेत. पळून गेल्यानंतर वय पूर्ण होईस्तोवर बेपत्ता राहून नंतर लग्न करून या मुली समोर आल्या. नंतर पालकांचाही नाइलाज होतो.

आठ महिन्यांत ३८ मुली बेपत्ता वणी तालुक्यात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत ३८ मुली, तर पाच मुले बेपत्ता झाली आहेत. त्यापैकी २३ मुली व दोन मुलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ