शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचेही सीईटीमुळे दणाणले धाबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:44 IST

शिंदोला : यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शालेय परीक्षेसह बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. मात्र, नुकताच अंतर्गत ...

शिंदोला : यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शालेय परीक्षेसह बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. मात्र, नुकताच अंतर्गत मूल्यमापनाद्वारे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. बहुतांश शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात परीक्षा न देताही बऱ्याच विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा चांगले गुण मिळाले. त्यामुळे पाहिजे त्या शाखेत पसंतीनुसार प्रवेश घेता येईल, अशी अपेक्षा होती. तथापि, शासनाने अकरावी प्रवेशासाठी सीईटी अर्थातच सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. परिणामी ग्रामीण भागासह शहरी भागातील काही प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचे धाबे चांगलेच दणाणल्याचे चित्र दिसून येत आहे.

महाराष्ट्र शासनाने यंदा प्रथमच कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून काही निकषांच्या आधारे परीक्षा न घेता निकाल दिला. दरम्यान, शालेय स्तरावर अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुणदान करण्यात आले. अनेक शाळांच्या शिक्षकांनी नामी संधीचा फायदा घेत सढळ हाताने गुणदान केल्याची शंका व्यक्त होत आहे, तर निवडक शाळांच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची खरी गुणवत्ता डोळ्यासमोर ठेवून गुणदान केल्याचे दिसून येते. बहुतांश शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. नव्हे तर दरवर्षीपेक्षा प्रथम श्रेणीसह प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांची संख्या वाढली. यामुळे अभ्यासाची आवड नसणाऱ्या विद्यार्थ्यांचा आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणित झाला. आता गुणांच्या आधारे आपल्याला पसंतीनुसार पुढील अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल, अशी अपेक्षा निर्माण झाली. मात्र शासनाकडून अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय जाहीर होताच विद्यार्थ्यांचा आनंद क्षणभंगूर ठरला. सीईटी घेण्याच्या निर्णयामुळे दहावीच्या निकालाला फारसे महत्त्व उरले नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. आता परीक्षा केंद्रांवर २१ ऑगस्टला सीईटी घेतली जाणार आहे. सदर परीक्षा इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्र या विषयांवर असून, प्रत्येक घटकांवर प्रत्येकी २५ गुणांचे एकूण १०० बहुपर्यायी प्रश्न असणार आहे. परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी आहे. विशेष म्हणजे सीईटी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशास प्राधान्य मिळणार आहे. अर्थातच सीईटी न देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळणार आहे. तथापि या निर्णयामुळे विद्यार्थी, पालकांच्या मनाजोग्या शाखेत किंवा महाविद्यालयातील प्रवेशाबाबतच्या आशेला निश्चितच लगाम बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.