शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचेही सीईटीमुळे दणाणले धाबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:44 IST

शिंदोला : यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शालेय परीक्षेसह बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. मात्र, नुकताच अंतर्गत ...

शिंदोला : यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शालेय परीक्षेसह बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. मात्र, नुकताच अंतर्गत मूल्यमापनाद्वारे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. बहुतांश शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात परीक्षा न देताही बऱ्याच विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा चांगले गुण मिळाले. त्यामुळे पाहिजे त्या शाखेत पसंतीनुसार प्रवेश घेता येईल, अशी अपेक्षा होती. तथापि, शासनाने अकरावी प्रवेशासाठी सीईटी अर्थातच सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. परिणामी ग्रामीण भागासह शहरी भागातील काही प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचे धाबे चांगलेच दणाणल्याचे चित्र दिसून येत आहे.

महाराष्ट्र शासनाने यंदा प्रथमच कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून काही निकषांच्या आधारे परीक्षा न घेता निकाल दिला. दरम्यान, शालेय स्तरावर अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुणदान करण्यात आले. अनेक शाळांच्या शिक्षकांनी नामी संधीचा फायदा घेत सढळ हाताने गुणदान केल्याची शंका व्यक्त होत आहे, तर निवडक शाळांच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची खरी गुणवत्ता डोळ्यासमोर ठेवून गुणदान केल्याचे दिसून येते. बहुतांश शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. नव्हे तर दरवर्षीपेक्षा प्रथम श्रेणीसह प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांची संख्या वाढली. यामुळे अभ्यासाची आवड नसणाऱ्या विद्यार्थ्यांचा आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणित झाला. आता गुणांच्या आधारे आपल्याला पसंतीनुसार पुढील अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल, अशी अपेक्षा निर्माण झाली. मात्र शासनाकडून अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय जाहीर होताच विद्यार्थ्यांचा आनंद क्षणभंगूर ठरला. सीईटी घेण्याच्या निर्णयामुळे दहावीच्या निकालाला फारसे महत्त्व उरले नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. आता परीक्षा केंद्रांवर २१ ऑगस्टला सीईटी घेतली जाणार आहे. सदर परीक्षा इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्र या विषयांवर असून, प्रत्येक घटकांवर प्रत्येकी २५ गुणांचे एकूण १०० बहुपर्यायी प्रश्न असणार आहे. परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी आहे. विशेष म्हणजे सीईटी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशास प्राधान्य मिळणार आहे. अर्थातच सीईटी न देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळणार आहे. तथापि या निर्णयामुळे विद्यार्थी, पालकांच्या मनाजोग्या शाखेत किंवा महाविद्यालयातील प्रवेशाबाबतच्या आशेला निश्चितच लगाम बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.