शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचेही सीईटीमुळे दणाणले धाबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:44 IST

शिंदोला : यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शालेय परीक्षेसह बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. मात्र, नुकताच अंतर्गत ...

शिंदोला : यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शालेय परीक्षेसह बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. मात्र, नुकताच अंतर्गत मूल्यमापनाद्वारे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. बहुतांश शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात परीक्षा न देताही बऱ्याच विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा चांगले गुण मिळाले. त्यामुळे पाहिजे त्या शाखेत पसंतीनुसार प्रवेश घेता येईल, अशी अपेक्षा होती. तथापि, शासनाने अकरावी प्रवेशासाठी सीईटी अर्थातच सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. परिणामी ग्रामीण भागासह शहरी भागातील काही प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचे धाबे चांगलेच दणाणल्याचे चित्र दिसून येत आहे.

महाराष्ट्र शासनाने यंदा प्रथमच कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून काही निकषांच्या आधारे परीक्षा न घेता निकाल दिला. दरम्यान, शालेय स्तरावर अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुणदान करण्यात आले. अनेक शाळांच्या शिक्षकांनी नामी संधीचा फायदा घेत सढळ हाताने गुणदान केल्याची शंका व्यक्त होत आहे, तर निवडक शाळांच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची खरी गुणवत्ता डोळ्यासमोर ठेवून गुणदान केल्याचे दिसून येते. बहुतांश शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. नव्हे तर दरवर्षीपेक्षा प्रथम श्रेणीसह प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांची संख्या वाढली. यामुळे अभ्यासाची आवड नसणाऱ्या विद्यार्थ्यांचा आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणित झाला. आता गुणांच्या आधारे आपल्याला पसंतीनुसार पुढील अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल, अशी अपेक्षा निर्माण झाली. मात्र शासनाकडून अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय जाहीर होताच विद्यार्थ्यांचा आनंद क्षणभंगूर ठरला. सीईटी घेण्याच्या निर्णयामुळे दहावीच्या निकालाला फारसे महत्त्व उरले नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. आता परीक्षा केंद्रांवर २१ ऑगस्टला सीईटी घेतली जाणार आहे. सदर परीक्षा इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्र या विषयांवर असून, प्रत्येक घटकांवर प्रत्येकी २५ गुणांचे एकूण १०० बहुपर्यायी प्रश्न असणार आहे. परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी आहे. विशेष म्हणजे सीईटी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशास प्राधान्य मिळणार आहे. अर्थातच सीईटी न देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळणार आहे. तथापि या निर्णयामुळे विद्यार्थी, पालकांच्या मनाजोग्या शाखेत किंवा महाविद्यालयातील प्रवेशाबाबतच्या आशेला निश्चितच लगाम बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.