शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

कोरोनातही कास्तकारांची हिंमत कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 18:07 IST

केंद्रीय कृषी मंत्रालयाने यंदाच्या खरीप हंगामातील पीक लागवडीचा अहवाल जाहीर केला आहे. त्या आकडेवारीनुसार यंदा संपूर्ण देशातील लागवड क्षेत्रात दुपटीने वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे कापूस दुपटीने तर सोयाबीन लागवड पाच पट अधिकदेशात पेरा वाढविला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना आणि लॉकडाऊनने देशातील उद्योगधंदे अडचणीत असताना आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम कृषी क्षेत्रावरही झालेला असताना देशातील कास्तकारांनी तगडी हिंमत कायम ठेवली आहे. या हिमतीमुळेच यंदा मागील वर्षीच्या तुलनेत कापसाची लागवड दुप्पट तर सोयाबीन लागवड पाच पटीने अधिक झाली आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने यंदाच्या खरीप हंगामातील पीक लागवडीचा अहवाल जाहीर केला आहे. त्या आकडेवारीनुसार यंदा संपूर्ण देशातील लागवड क्षेत्रात दुपटीने वाढ झाली आहे. देशात खरिपाचे अपेक्षित लागवड क्षेत्र १०६३ लाख हेक्टरपैकी मागील वर्षी केवळ २३० लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा मात्र अडचणीत भर पडलेली असतानाही शेतकऱ्यांनी ४३२ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी केली आहे.

महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा दुपटीने वाढविला. गेल्या वर्षी ४५ लाख ८५ हजार हेक्टरपर्यंत मर्यादित असलेला हा पेरा यंदा ९१ लाख ६७ हजार हेक्टरपर्यंत वाढला आहे. तर सोयाबीनचा पेरा मागील वर्षी १६ लाख ४३ हजार हेक्टरपर्यंत मर्यादित असताना यंदा हे क्षेत्र एकदम ८१ लाख ८१ हजार हेक्टरवर पोहोचला आहे. तुरीची लागवडही यंदा २ लाख ७९ हजार हेक्टरवरून थेट आठ पटींनी वाढून १६ लाख ५६ हजार हेक्टरवर पोहोचली आहे. याचाच प्रत्यय यवतमाळ जिल्ह्यातही आला असून यंदा ४ लाख ५५ हजार ५९९ हेक्टरमध्ये कापूस, २ लाख ७५ हजार ६२९ हेक्टरमध्ये सोयाबीन आणि १ लाख १० हजार ९५९ हेक्टरमध्ये तूर असे लागवड क्षेत्र वाढले आहे.कडधान्यात महाराष्ट्र अव्वलदेशात कापसाचा पेरा महाराष्ट्रात सर्वाधिक झाला आहे. त्यासह कडधान्याचा महाराष्ट्रात झालेला ११ लाख ९४ हजार हेक्टरवरील पेरा देशात सर्वाधिक आहे. त्याखालोखाल मध्यप्रदेश ६ लाख ५५ हजार, तेलंगणा २ लाख १६ हजार, राजस्थान १ लाख ९७ हजार, कर्नाटक १ लाख ८९ हजार, झारखंड ८९ हजार, उत्तर प्रदेश ६८ हजार, गुजरात ५३ हजार, आंध्र प्रदेश २७ हजार, छत्तीसगड २१ हजार, बिहार १९ हजार आणि हरियाणात केवळ १२ हजार हेक्टरवर कडधान्याचा पेरा आहे. शिवाय, ज्वारी लागवडीतही महाराष्ट्र पहिल्या स्थानावर असून महाराष्ट्रातील उस लागवडही (१ लाख १० हजार हेक्टर) देशात सर्वाधिक ठरली.

टॅग्स :Farmerशेतकरी