शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

‘यू-टर्न’नंतरही वाहतूक परिस्थिती ‘जैसे थे’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:28 IST

बसस्थानक चौकात सातत्याने जीवघेणे अपघात होत आहेत. या अपघाताला टाळण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून वाहतूक व्यवस्थेत प्रायोगिक तत्त्वावर बदल करण्यात आला.

ठळक मुद्देबसस्थानक चौक : ट्रॅव्हल्सचा सिग्नलवर ठिय्या

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : बसस्थानक चौकात सातत्याने जीवघेणे अपघात होत आहेत. या अपघाताला टाळण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून वाहतूक व्यवस्थेत प्रायोगिक तत्त्वावर बदल करण्यात आला. मात्र दारव्हा मार्गावरील ट्रॅव्हल्स चालकांची दादागिरी आणि कमिशनखोरीतून पोलिसांची चुप्पी या प्रयोगाला हरताळ फासत आहे.वाहतुकीला वळण लावण्यासाठी बसस्थानक चौकात आर्णी मार्गाने येणारी वाहने दारव्हा मार्गाकडे वळवून यू-टर्नने बसस्थानक चौकात आणण्यात येत आहेत. मात्र दारव्हा मार्गावर दोन्ही बाजूंनी प्रवासी वाहने व ट्रॅव्हल्सचे अतिक्रमण राहते. हे अतिक्रमण काढण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र रस्त्याच्या दुतर्फा सिग्नल सुरू असतानाही ट्रॅव्हल्समधून प्रवाशांची चढ-उतार केली जाते. यामुळे यू-टर्न घेताना अनेक वाहनांना त्रास होतो. परिणामी येथे वाहतुकीची कोंडी कायम आहे.शुक्रवारी सकाळी ११ वाजता यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे शासकीय वाहन या मार्गावरून जात होते. त्याच वेळी एका वाहतूक शिपायाच्या ट्रॅव्हल्समधून भर रस्त्याच्या मध्ये प्रवाशांची चढ-उतार सुरू होती. वाहतूक शाखेतील हा शिपाई ट्रॅव्हल्सच्या धंद्यात मोठा गुंतवणूकदार आहे. ट्रॅव्हल्स व प्रवासी वाहनाच्या पॉर्इंटवरून पोलिसांना मोठी रसद जाते. त्यामुळे त्यांच्याकडून होणाºया नियमांची पायमल्ली उघड्या डोळ्याने खपवून घेतली जाते.

टॅग्स :Travelप्रवास