शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

स्वातंत्र्याच्या ७३ वर्षानंतरही रस्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST

मारेगाव तालुक्यातील कान्हाळगाव (वाई) हे डोंगर कपारित वसलेले १०० घरांचे आदिवासीबहुल गाव अगदी तालुक्याच्या एका टोकाला आहे. हे गाव वणी विधानसभा क्षेत्रात येत असले तरी पांढरकवडा शहर हे या गावाची बाजारपेठ आहे. त्यामुळे राजकीयदृष्टीने गावाला दुर्लक्षितपणाचा कलंक सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । कान्हाळगाव(वाई) येथील ग्रामस्थ त्रस्त, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतोयं परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्ष पूर्ण झालीत. तरीही मारेगाव तालुक्याच्या एका टोकावर असलेल्या कान्हाळगाव (वाई) या आदिवासीबहुल गावात अद्याप रस्ता पोहोचला नाही. त्यामुळे बाराही महिने मोठ्या यातना सहन करीत नागरिकांना ये-जा करावी लागते.मारेगाव तालुक्यातील कान्हाळगाव (वाई) हे डोंगर कपारित वसलेले १०० घरांचे आदिवासीबहुल गाव अगदी तालुक्याच्या एका टोकाला आहे. हे गाव वणी विधानसभा क्षेत्रात येत असले तरी पांढरकवडा शहर हे या गावाची बाजारपेठ आहे. त्यामुळे राजकीयदृष्टीने गावाला दुर्लक्षितपणाचा कलंक सहन करावा लागत आहे. भारतीय स्वातंत्र्याला ७३ वर्षे पुर्ण झालीत. गावाच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जातात.पंतप्रधान, मुख्यमंत्री अशा विविध योजना आल्या तरी कान्हाळगाव मुख्य रस्त्याला जोडले गेले नाही. गावापासून चार किलोमीटर अंतरावरून दोन पक्के जिल्हा मार्ग आहेत. परंतु या मार्गाला जोडणारा गावातून रस्ता नाही. जिल्हा मार्गावर पोहोचण्यासाठी गावातून दोन रस्ते आहेत. परंतु हे रस्ते जाण्यास योग्य नसून या रस्त्यावर नाले आहे. पावसाळ्यात या नाल्याला पूर येऊन गावाचा संपर्क बरेचदा खंडीत होत असतो.गावात जिल्हा परिषदेची पाचवीपर्यंत शाळा आहे. त्यापुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना बाहेरगावी जावे लागते. परंतु गावाला बारमाही रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडतो. त्यामुळे रोजगाराचे प्रमाण गावात कमी आहे.याबाबत अनेकदा लोकप्रतिनिधींच्या भेटी घेतल्या, निवेदन दिले. परंतु आश्वासनापलीकडे ग्रामस्थांना काहीही मिळाले नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये मात्र प्रशासनाविषयी तीव्र असंतोष दिसून येत आहे.निवडणुकीवर टाकला होता बहिष्काररस्त्याच्या समस्येकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष वळविण्यासाठी गावकऱ्यांनी अनेक उपाययोजना केल्या, अनेकदा निवदने दिली. परंतु फक्त आश्वाशिवाय जनतेच्या काहीही पदरात पडले नाही. शेवटी गावकऱ्यांनी विधानसभा, लोकसभा निवडणुका मतदानावर बहिष्कार टाकला. परंतु याचाही प्रशासनावर काहीही परिणाम झाला नाही. आता बेमूदत उपोषणाला बसू, अशा इशारा कान्हळगावच्या नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.एकाकीपणाची भावनाआज सगळ्या गावात पक्के रस्ते पोहोचले. लोकांचे राहणीमान बदलले. प्रत्येक गावात वाहतुकीची साधने आली. मोटारसायकल आली, परंतु गावाला रस्ता नसल्याने गावात कोणत्याही सुविधा पोहोचल्या नाही. गावात जाण्यासाठी योग्य रस्ताच नसल्याने अधिकारी कर्मचारी येत नाही. गावात दोन शिक्षकी शाळा असून शिक्षक मिळत नाही. त्यामुळे गावकºयांत एकाकीपणाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे या कामात लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सरपंच माया पेंदोर यांनी केली आहे.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास