शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याच्या ७३ वर्षानंतरही रस्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST

मारेगाव तालुक्यातील कान्हाळगाव (वाई) हे डोंगर कपारित वसलेले १०० घरांचे आदिवासीबहुल गाव अगदी तालुक्याच्या एका टोकाला आहे. हे गाव वणी विधानसभा क्षेत्रात येत असले तरी पांढरकवडा शहर हे या गावाची बाजारपेठ आहे. त्यामुळे राजकीयदृष्टीने गावाला दुर्लक्षितपणाचा कलंक सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । कान्हाळगाव(वाई) येथील ग्रामस्थ त्रस्त, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतोयं परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्ष पूर्ण झालीत. तरीही मारेगाव तालुक्याच्या एका टोकावर असलेल्या कान्हाळगाव (वाई) या आदिवासीबहुल गावात अद्याप रस्ता पोहोचला नाही. त्यामुळे बाराही महिने मोठ्या यातना सहन करीत नागरिकांना ये-जा करावी लागते.मारेगाव तालुक्यातील कान्हाळगाव (वाई) हे डोंगर कपारित वसलेले १०० घरांचे आदिवासीबहुल गाव अगदी तालुक्याच्या एका टोकाला आहे. हे गाव वणी विधानसभा क्षेत्रात येत असले तरी पांढरकवडा शहर हे या गावाची बाजारपेठ आहे. त्यामुळे राजकीयदृष्टीने गावाला दुर्लक्षितपणाचा कलंक सहन करावा लागत आहे. भारतीय स्वातंत्र्याला ७३ वर्षे पुर्ण झालीत. गावाच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जातात.पंतप्रधान, मुख्यमंत्री अशा विविध योजना आल्या तरी कान्हाळगाव मुख्य रस्त्याला जोडले गेले नाही. गावापासून चार किलोमीटर अंतरावरून दोन पक्के जिल्हा मार्ग आहेत. परंतु या मार्गाला जोडणारा गावातून रस्ता नाही. जिल्हा मार्गावर पोहोचण्यासाठी गावातून दोन रस्ते आहेत. परंतु हे रस्ते जाण्यास योग्य नसून या रस्त्यावर नाले आहे. पावसाळ्यात या नाल्याला पूर येऊन गावाचा संपर्क बरेचदा खंडीत होत असतो.गावात जिल्हा परिषदेची पाचवीपर्यंत शाळा आहे. त्यापुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना बाहेरगावी जावे लागते. परंतु गावाला बारमाही रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडतो. त्यामुळे रोजगाराचे प्रमाण गावात कमी आहे.याबाबत अनेकदा लोकप्रतिनिधींच्या भेटी घेतल्या, निवेदन दिले. परंतु आश्वासनापलीकडे ग्रामस्थांना काहीही मिळाले नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये मात्र प्रशासनाविषयी तीव्र असंतोष दिसून येत आहे.निवडणुकीवर टाकला होता बहिष्काररस्त्याच्या समस्येकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष वळविण्यासाठी गावकऱ्यांनी अनेक उपाययोजना केल्या, अनेकदा निवदने दिली. परंतु फक्त आश्वाशिवाय जनतेच्या काहीही पदरात पडले नाही. शेवटी गावकऱ्यांनी विधानसभा, लोकसभा निवडणुका मतदानावर बहिष्कार टाकला. परंतु याचाही प्रशासनावर काहीही परिणाम झाला नाही. आता बेमूदत उपोषणाला बसू, अशा इशारा कान्हळगावच्या नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.एकाकीपणाची भावनाआज सगळ्या गावात पक्के रस्ते पोहोचले. लोकांचे राहणीमान बदलले. प्रत्येक गावात वाहतुकीची साधने आली. मोटारसायकल आली, परंतु गावाला रस्ता नसल्याने गावात कोणत्याही सुविधा पोहोचल्या नाही. गावात जाण्यासाठी योग्य रस्ताच नसल्याने अधिकारी कर्मचारी येत नाही. गावात दोन शिक्षकी शाळा असून शिक्षक मिळत नाही. त्यामुळे गावकºयांत एकाकीपणाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे या कामात लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सरपंच माया पेंदोर यांनी केली आहे.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास