शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

स्वातंत्र्याच्या ७३ वर्षानंतरही रस्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST

मारेगाव तालुक्यातील कान्हाळगाव (वाई) हे डोंगर कपारित वसलेले १०० घरांचे आदिवासीबहुल गाव अगदी तालुक्याच्या एका टोकाला आहे. हे गाव वणी विधानसभा क्षेत्रात येत असले तरी पांढरकवडा शहर हे या गावाची बाजारपेठ आहे. त्यामुळे राजकीयदृष्टीने गावाला दुर्लक्षितपणाचा कलंक सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । कान्हाळगाव(वाई) येथील ग्रामस्थ त्रस्त, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतोयं परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्ष पूर्ण झालीत. तरीही मारेगाव तालुक्याच्या एका टोकावर असलेल्या कान्हाळगाव (वाई) या आदिवासीबहुल गावात अद्याप रस्ता पोहोचला नाही. त्यामुळे बाराही महिने मोठ्या यातना सहन करीत नागरिकांना ये-जा करावी लागते.मारेगाव तालुक्यातील कान्हाळगाव (वाई) हे डोंगर कपारित वसलेले १०० घरांचे आदिवासीबहुल गाव अगदी तालुक्याच्या एका टोकाला आहे. हे गाव वणी विधानसभा क्षेत्रात येत असले तरी पांढरकवडा शहर हे या गावाची बाजारपेठ आहे. त्यामुळे राजकीयदृष्टीने गावाला दुर्लक्षितपणाचा कलंक सहन करावा लागत आहे. भारतीय स्वातंत्र्याला ७३ वर्षे पुर्ण झालीत. गावाच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जातात.पंतप्रधान, मुख्यमंत्री अशा विविध योजना आल्या तरी कान्हाळगाव मुख्य रस्त्याला जोडले गेले नाही. गावापासून चार किलोमीटर अंतरावरून दोन पक्के जिल्हा मार्ग आहेत. परंतु या मार्गाला जोडणारा गावातून रस्ता नाही. जिल्हा मार्गावर पोहोचण्यासाठी गावातून दोन रस्ते आहेत. परंतु हे रस्ते जाण्यास योग्य नसून या रस्त्यावर नाले आहे. पावसाळ्यात या नाल्याला पूर येऊन गावाचा संपर्क बरेचदा खंडीत होत असतो.गावात जिल्हा परिषदेची पाचवीपर्यंत शाळा आहे. त्यापुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना बाहेरगावी जावे लागते. परंतु गावाला बारमाही रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडतो. त्यामुळे रोजगाराचे प्रमाण गावात कमी आहे.याबाबत अनेकदा लोकप्रतिनिधींच्या भेटी घेतल्या, निवेदन दिले. परंतु आश्वासनापलीकडे ग्रामस्थांना काहीही मिळाले नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये मात्र प्रशासनाविषयी तीव्र असंतोष दिसून येत आहे.निवडणुकीवर टाकला होता बहिष्काररस्त्याच्या समस्येकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष वळविण्यासाठी गावकऱ्यांनी अनेक उपाययोजना केल्या, अनेकदा निवदने दिली. परंतु फक्त आश्वाशिवाय जनतेच्या काहीही पदरात पडले नाही. शेवटी गावकऱ्यांनी विधानसभा, लोकसभा निवडणुका मतदानावर बहिष्कार टाकला. परंतु याचाही प्रशासनावर काहीही परिणाम झाला नाही. आता बेमूदत उपोषणाला बसू, अशा इशारा कान्हळगावच्या नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.एकाकीपणाची भावनाआज सगळ्या गावात पक्के रस्ते पोहोचले. लोकांचे राहणीमान बदलले. प्रत्येक गावात वाहतुकीची साधने आली. मोटारसायकल आली, परंतु गावाला रस्ता नसल्याने गावात कोणत्याही सुविधा पोहोचल्या नाही. गावात जाण्यासाठी योग्य रस्ताच नसल्याने अधिकारी कर्मचारी येत नाही. गावात दोन शिक्षकी शाळा असून शिक्षक मिळत नाही. त्यामुळे गावकºयांत एकाकीपणाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे या कामात लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सरपंच माया पेंदोर यांनी केली आहे.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास