शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

रेतीघाट लिलावाच्या नव्या धोरणात त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 22:21 IST

रेती घाटाच्या लिलावासंदर्भात शासनाने नवीन धोरण निश्चित केले आहे. पुढील वर्षी लिलाव होणाऱ्या वाळू घाटांची निश्चिती करण्यासाठी महसूल विभागाने नवे निर्देश दिले असून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसुधारणांची गरज : रेती तस्करांना मिळू शकतो फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रेती घाटाच्या लिलावासंदर्भात शासनाने नवीन धोरण निश्चित केले आहे. पुढील वर्षी लिलाव होणाऱ्या वाळू घाटांची निश्चिती करण्यासाठी महसूल विभागाने नवे निर्देश दिले असून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र या नव्या धोरणातही अनेक त्रुट्या असून त्या वेळीच सुधारल्या नाही तर तस्करांना त्याचा आपसूक फायदा मिळण्याची शक्यता आहे.शासनाच्या नवीन रेती घाट धोरणात दोन रेती घाटांचे अंतर्गत १०० मीटरचे असावे, असे म्हटले आहे. परंतु अनेक ठिकाणी नदी पात्रात असे अंतर मोजता येणे अशक्य आहे. एका गावच्या भौगोलिक क्षेत्रात येणाºया संपूर्ण रेती घाटाचा लिलाव एकत्र करण्याची गरज आहे. त्याच बरोबर नदी दोन जिल्ह्याच्या सीमेतून वाहत असेल तर एका जिल्ह्याच्या गावासोबतच समोरील दुसºया गावाच्या भौगोलिक क्षेत्रासही त्यात सामील करून घेणे गरजेचे आहे. जिल्हा सीमेवरील दोन्ही गावांच्या रेती घाटांचा एकत्रित लिलाव करून मिळणारी रॉयल्टी दोन्ही जिल्ह्यात वाटून देण्याची तरतूद करणे गरजेचे आहे.रेती घाटाच्या लिलावासाठी नेहमी ग्रामसभेच्या ठरावाची औपचारिकता पूर्ण केली जाते. अनेकदा असे ठराव मॅनेज केले जातात. त्यासाठी रेती घाट लिलावासंदर्भातील ग्रामसभांचे व्हीडीओ शूटिंग घेण्याची तरतूद करण्याची आवश्यकता आहे. रेती घाट ५० लाख, ७५ लाख, कोटी-दीड कोटी अशा रकमेत लिलावात जातो. रेती वाहतूक जड वाहनाद्वारे केली जाते. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अडचणी निर्माण होतात. रेती घाटातून मिळणारा महसूल आणि रस्त्यांचे होणारे नुकसान याचा विचार करून लिलावासंबंधी निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.या नवीन धोरणात असलेल्या त्रुटींमध्ये दुरुस्ती केली नाही तर त्याचा फायदा पुन्हा रेती तस्करांना होऊ शकतो. रेती घाट घेताना कंत्राटदारांची चौकडी तयार केली जाते. त्यातून कंत्राट पदरात पाडले जाते. या प्रकारालाही आळा घालण्यासाठी त्यात सुधारणा होणे आवश्यक आहे.ग्रामपंचायतींना मिळू शकतो विकास निधीग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या रेती घाटांचा अधिक आर्थिक वाटा ग्रामपंचायतीला मिळू शकतो. या निधीतून विकास कामांना हातभार लागू शकतो. मात्र आतापर्यंत रेती वाहतुकीमुळे रस्त्यांचीच अवस्था वाईट झाली आहे. ग्रामपंचायतींना रेती घाटात महसुलाचा वाटा वाढून देण्याची गरज आहे.

टॅग्स :sandवाळू