शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

By admin | Updated: June 22, 2015 02:12 IST

काही भागात धो धो, तर काही भागात थेंबही नाही, अशी पावसाची जिल्ह्यात परिस्थिती होती.

३४ मिमी : १६ घरांची पडझड, पारवा-पांढरकवडा मार्ग पुरामुळे बंद यवतमाळ : काही भागात धो धो, तर काही भागात थेंबही नाही, अशी पावसाची जिल्ह्यात परिस्थिती होती. मात्र गेली २४ तासात पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. जिल्ह्यात झालेल्या पावसाची ३४ मिमी एवढी नोंद करण्यात आली आहे. यासोबतच शेतीच्या कामाला गती आली आहे. पारवा-पांढरकवडा मार्ग बंद वगळता जिल्ह्यात कुठेही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली नाही. १६ घरांची अंशता पडझड झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे.गेली १५ दिवसांपासून जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली होती. पाऊस झालेल्या भागात शेतीकामाला वेग आला होता. जवळपास ९० टक्के पेरण्या या भागात पूर्ण झाल्या. मात्र काही भागात तुरळक पाऊस झाल्याने शेतीची कामे अतिशय संथ गतीने सुरू होती. मात्र शनिवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. पाऊस संततधार नसला तरी, पेरणीयोग्य असल्याने शेतीकामाला गती आली आहे. बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची बाजारात गर्दी वाढली आहे. काही भागात नाले दुथडी भरून वाहत होते.जिल्ह्यातील नऊ लाख ४०० हेक्टरपैकी दोन लाख ६४ हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत. सात लाख हेक्टरवरील पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या होत्या. बहुतांश भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतीकामाला गती मिळाली आहे. मागील २४ तासात सर्वाधिक ८९ मिमी पावसाची नोंद केळापूर तालुक्यात करण्यात आली आहे. सर्वात कमी पाऊस महागाव तालुक्यात पाच मिमी इतका झाला आहे. (शहर वार्ताहर)सोमवारीही मुसळधार पावसाचा इशारापारवा ते पांढरकवडा मार्गावरील झुली पुलावर पाणी चढल्याने तब्बल अडीच तास वाहतूक ठप्प झाली होती. या पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी ही समस्या निर्माण होते. परिसरात गेली दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. रविवारी या पुलावरून तीन फूट पाणी वाहत होते. परिणामी माहूर, उनकेश्वर, आर्णी, माहूर, उमरखेडकडे जाणारी वाहने थांबली होती.