शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

अनाथांच्या पुनर्वसनासाठी अभियंता सागरची धडपड

By admin | Updated: October 22, 2014 23:25 IST

लहानपणीच आईवडिलांचं छत्र हरविलं. अनाथाश्रमाच्या आश्रयात बालपण गेलं. वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यावर तेथूनही बाहेर पडाव लागलं. पुढे काय या विवंचनेत एक तरुण उभा राहिला. संघर्ष करीत त्याने

प्रकाश लामणे ल्ल पुसदपुसद : लहानपणीच आईवडिलांचं छत्र हरविलं. अनाथाश्रमाच्या आश्रयात बालपण गेलं. वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यावर तेथूनही बाहेर पडाव लागलं. पुढे काय या विवंचनेत एक तरुण उभा राहिला. संघर्ष करीत त्याने अभियांत्रिकीची पदवी घेतली. आपल्या सारख्याच अनाथ असलेल्या अनेकांना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्याने धडपड सुरू केली. आज त्याने ४८० अनाथ मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेतले. सामाजिक जाणीव असलेल्या या तरुणाचे नाव आहे, सागर रेड्डी. नवी मुंबईतील एल अ‍ॅन्ड टी कंपनीत प्लॅनिंग इंजिनिअर म्हणून २६ वर्षीय सागर काम करतो. राज्यभरातील अनाथांचे पुनर्वसन करून त्यांना सामाजिक हक्क मिळवून देण्यासाठी राज्यभर प्रवास सुरू केला आहे. त्याअंतर्गत पुसद येथे आला असता ‘लोकमत’शी बोलत होता. सागरने एकता निराधार संघ स्थापन केला आहे. त्या माध्यमातून ठाणे, मुंबई, वाशी, पुणे येथील अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी तो धडपडत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीवर या विद्यार्थ्यांचे शिक्षण त्याला करायचे आहे. त्यासाठी सर्वांची साथ हवी आहे, असे सांगत पोटतिडकीने सांगतो. सागर हा मूळचा आंध्रप्रदेशातील. सागरचे आई-वडील मुंबईत उच्च शिक्षणासाठी होते. वडील व्यंकटेश रेड्डी यांनी महाराष्ट्रीय तरुणी पौर्णिमा काळे हिच्यासोबत प्रेमविवाह केला. त्यांच्या संसारवेलीवर सागरच्या रुपाने फुल उमलले. सुखाचा संसार सुरू असताना काळाची दृष्ट नजर लागली. सागर अडीच वर्षाचा असताना प्रेमविवाह प्रकरणातून या दाम्पत्याची आंध्रप्रदेशात हत्या करण्यात आली. सागर अनाथ झाला. त्यानंतर आला तो लोणावळाच्या आंतरभारती अनाथालयात तेथेच वयाच्या १८ वर्षापर्यंत त्याचे लालन-पालन झाले. मात्र १८ वर्ष पूर्ण झाले की आश्रमातून बाहेर पडावे लागते. सागर समोरही हाच प्रश्न निर्माण झाला. मात्र परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या सागरने परिस्थितीवर मात करीत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. एल अ‍ॅन्ड टी कंपनीत नोकरीही मिळाली. मात्र आपल्या वाट्याला आलेला अनाथाचा प्रवास इतरांच्या वाट्याला येऊ नये, अनाथांचे शिक्षण व्हावे म्हणून एकता निराधार संघ स्थापन केला. अनाथ तरुणांना एकत्र करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्यासाठी स्वत:च्या वेतनातील पैसे तो खर्च करतो. सुटीत वेळ काढून अनाथांच्या पंखात बळ भरण्याचे काम करतो. आता तो राज्यातील दानशुरांंना आव्हान करीत असून अनाथांच्या हक्कासाठी धडपडत आहे.