शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
2
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
3
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
4
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
5
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
6
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
7
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
8
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
9
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
10
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
11
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
12
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
13
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
14
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
15
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
16
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
17
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
18
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
19
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
20
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अनाथांच्या पुनर्वसनासाठी अभियंता सागरची धडपड

By admin | Updated: October 22, 2014 23:25 IST

लहानपणीच आईवडिलांचं छत्र हरविलं. अनाथाश्रमाच्या आश्रयात बालपण गेलं. वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यावर तेथूनही बाहेर पडाव लागलं. पुढे काय या विवंचनेत एक तरुण उभा राहिला. संघर्ष करीत त्याने

प्रकाश लामणे ल्ल पुसदपुसद : लहानपणीच आईवडिलांचं छत्र हरविलं. अनाथाश्रमाच्या आश्रयात बालपण गेलं. वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यावर तेथूनही बाहेर पडाव लागलं. पुढे काय या विवंचनेत एक तरुण उभा राहिला. संघर्ष करीत त्याने अभियांत्रिकीची पदवी घेतली. आपल्या सारख्याच अनाथ असलेल्या अनेकांना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्याने धडपड सुरू केली. आज त्याने ४८० अनाथ मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेतले. सामाजिक जाणीव असलेल्या या तरुणाचे नाव आहे, सागर रेड्डी. नवी मुंबईतील एल अ‍ॅन्ड टी कंपनीत प्लॅनिंग इंजिनिअर म्हणून २६ वर्षीय सागर काम करतो. राज्यभरातील अनाथांचे पुनर्वसन करून त्यांना सामाजिक हक्क मिळवून देण्यासाठी राज्यभर प्रवास सुरू केला आहे. त्याअंतर्गत पुसद येथे आला असता ‘लोकमत’शी बोलत होता. सागरने एकता निराधार संघ स्थापन केला आहे. त्या माध्यमातून ठाणे, मुंबई, वाशी, पुणे येथील अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी तो धडपडत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीवर या विद्यार्थ्यांचे शिक्षण त्याला करायचे आहे. त्यासाठी सर्वांची साथ हवी आहे, असे सांगत पोटतिडकीने सांगतो. सागर हा मूळचा आंध्रप्रदेशातील. सागरचे आई-वडील मुंबईत उच्च शिक्षणासाठी होते. वडील व्यंकटेश रेड्डी यांनी महाराष्ट्रीय तरुणी पौर्णिमा काळे हिच्यासोबत प्रेमविवाह केला. त्यांच्या संसारवेलीवर सागरच्या रुपाने फुल उमलले. सुखाचा संसार सुरू असताना काळाची दृष्ट नजर लागली. सागर अडीच वर्षाचा असताना प्रेमविवाह प्रकरणातून या दाम्पत्याची आंध्रप्रदेशात हत्या करण्यात आली. सागर अनाथ झाला. त्यानंतर आला तो लोणावळाच्या आंतरभारती अनाथालयात तेथेच वयाच्या १८ वर्षापर्यंत त्याचे लालन-पालन झाले. मात्र १८ वर्ष पूर्ण झाले की आश्रमातून बाहेर पडावे लागते. सागर समोरही हाच प्रश्न निर्माण झाला. मात्र परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या सागरने परिस्थितीवर मात करीत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. एल अ‍ॅन्ड टी कंपनीत नोकरीही मिळाली. मात्र आपल्या वाट्याला आलेला अनाथाचा प्रवास इतरांच्या वाट्याला येऊ नये, अनाथांचे शिक्षण व्हावे म्हणून एकता निराधार संघ स्थापन केला. अनाथ तरुणांना एकत्र करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्यासाठी स्वत:च्या वेतनातील पैसे तो खर्च करतो. सुटीत वेळ काढून अनाथांच्या पंखात बळ भरण्याचे काम करतो. आता तो राज्यातील दानशुरांंना आव्हान करीत असून अनाथांच्या हक्कासाठी धडपडत आहे.