शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी खासदारांचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा, पोलिसांनी अनेकांना घेतले ताब्यात...
2
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
3
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
4
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
5
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
6
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
7
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
8
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
9
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
10
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
11
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
12
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
13
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
14
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
15
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
16
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
17
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
18
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
19
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
20
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...

संचालक नियुक्तीच्या घोळात अखेर प्रशासकाला बसविले

By admin | Updated: August 17, 2014 23:26 IST

कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींचा कार्यकाळ संपल्याने संचालक नियुक्तीसाठी याद्यांवर याद्या पडल्याने अखेर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. यानिमित्तानेच तालुक्यात असलेली काँग्रेस आणि

नेर : कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींचा कार्यकाळ संपल्याने संचालक नियुक्तीसाठी याद्यांवर याद्या पडल्याने अखेर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. यानिमित्तानेच तालुक्यात असलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. बाजार समितीवर वर्चस्वाच्या लढाईत मात्र विकासाचे तीनतेरा वाजले आहे. आता प्रशासक म्हणून सहायक निबंधक सुनील भालेराव यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे.सभापतींचा कार्यकाळ ४ आॅगस्ट २०१४ रोजी संपला. यानंतर प्रशासकीय संचालक नियुक्तीसाठी काँग्रेस, राकाँ, शिवसेना या पक्षांची गर्दी वाढली. सुरुवातीला काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी सल्लामसलत करून काँग्रेसचे नऊ आणि राकाँचे सहा अशा एकूण १५ जणांच्या नावांची यादी सादर केली. ही यादी कुठल्याही परिस्थितीत मंजूर होईल, असे सांगितले जात होते. मात्र माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनीही यादी सादर केली. या प्रकारातूनच ठाकरे आणि देशमुख यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले. दरम्यान, खासदार भावना गवळी आणि आमदार संजय राठोड यांनी सहायक निबंधकांना पत्र पाठवून काँग्रेस-राकाँने सुचविलेली नावे सक्षम प्रशासन देवू शकत नाही, असे सांगत प्रशासक बनवूच नये असे म्हटले. शिवाय त्यांची स्वतंत्र यादी सादर केली. काँग्रेस-राकाँ, संजय देशमुख आणि सेनेची तिसरी यादी पडताळणीसाठी जमा झाली. यावर कुठलाही निर्णय होत नसतानाच राष्ट्रवादीने पुन्हा दहा नावांची यादी सादर केली. याद्यांच्या या घोळात प्रशासन अडचणीत सापडले. नेमका निर्णय देण्यास अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे अखेर या बाजार समितीवर प्रशासक म्हणून सुनील भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली. सुरुवातीला माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राकाँ अशी १५ नावांची यादी सादर केली होती. यानंतरही अन्न व औषध प्रशासनमंत्री मनोहरराव नाईक यांनी पुन्हा दहा नावांची यादी कशी सादर केली हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केवळ वर्चस्वासाठी हा घोळ घातला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे. मात्र बाजार समितीचा विकास थांबला याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने नाराजीचा सूर आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष युवराज अर्मळ यांना विचारले असता ते म्हणाले, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राकाँसह १५ नावांची यादी सादर केल्यानंतर संजय देशमुख यांनी चार नावांची यादी पाठविली. त्यामुळेच अन्न व औषध प्रशासनमंत्री मनोहरराव नाईक यांनी पुन्हा दहा नावे पाठविली असल्याचे त्यांनी सांगितले.(तालुका प्रतिनिधी)