शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

संचालक नियुक्तीच्या घोळात अखेर प्रशासकाला बसविले

By admin | Updated: August 17, 2014 23:26 IST

कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींचा कार्यकाळ संपल्याने संचालक नियुक्तीसाठी याद्यांवर याद्या पडल्याने अखेर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. यानिमित्तानेच तालुक्यात असलेली काँग्रेस आणि

नेर : कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींचा कार्यकाळ संपल्याने संचालक नियुक्तीसाठी याद्यांवर याद्या पडल्याने अखेर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. यानिमित्तानेच तालुक्यात असलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. बाजार समितीवर वर्चस्वाच्या लढाईत मात्र विकासाचे तीनतेरा वाजले आहे. आता प्रशासक म्हणून सहायक निबंधक सुनील भालेराव यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे.सभापतींचा कार्यकाळ ४ आॅगस्ट २०१४ रोजी संपला. यानंतर प्रशासकीय संचालक नियुक्तीसाठी काँग्रेस, राकाँ, शिवसेना या पक्षांची गर्दी वाढली. सुरुवातीला काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी सल्लामसलत करून काँग्रेसचे नऊ आणि राकाँचे सहा अशा एकूण १५ जणांच्या नावांची यादी सादर केली. ही यादी कुठल्याही परिस्थितीत मंजूर होईल, असे सांगितले जात होते. मात्र माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनीही यादी सादर केली. या प्रकारातूनच ठाकरे आणि देशमुख यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले. दरम्यान, खासदार भावना गवळी आणि आमदार संजय राठोड यांनी सहायक निबंधकांना पत्र पाठवून काँग्रेस-राकाँने सुचविलेली नावे सक्षम प्रशासन देवू शकत नाही, असे सांगत प्रशासक बनवूच नये असे म्हटले. शिवाय त्यांची स्वतंत्र यादी सादर केली. काँग्रेस-राकाँ, संजय देशमुख आणि सेनेची तिसरी यादी पडताळणीसाठी जमा झाली. यावर कुठलाही निर्णय होत नसतानाच राष्ट्रवादीने पुन्हा दहा नावांची यादी सादर केली. याद्यांच्या या घोळात प्रशासन अडचणीत सापडले. नेमका निर्णय देण्यास अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे अखेर या बाजार समितीवर प्रशासक म्हणून सुनील भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली. सुरुवातीला माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राकाँ अशी १५ नावांची यादी सादर केली होती. यानंतरही अन्न व औषध प्रशासनमंत्री मनोहरराव नाईक यांनी पुन्हा दहा नावांची यादी कशी सादर केली हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केवळ वर्चस्वासाठी हा घोळ घातला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे. मात्र बाजार समितीचा विकास थांबला याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने नाराजीचा सूर आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष युवराज अर्मळ यांना विचारले असता ते म्हणाले, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राकाँसह १५ नावांची यादी सादर केल्यानंतर संजय देशमुख यांनी चार नावांची यादी पाठविली. त्यामुळेच अन्न व औषध प्रशासनमंत्री मनोहरराव नाईक यांनी पुन्हा दहा नावे पाठविली असल्याचे त्यांनी सांगितले.(तालुका प्रतिनिधी)