शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वणी एमआयडीसीच्या जागेवर केले अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 05:00 IST

१०६ गट क्रमांक असलेली ही जागा १३३ हेक्टर असून याच जागेत एमआयडीसीदेखील उभी आहे. त्यात अनेक उद्योग कार्यान्वीत आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर जागा रिकामी असून आठवडाभरापूर्वी या जागेवर काही लोकांची नजर पडली आणि त्यांनी थेट या जागेवर अतिक्रमण करणे सुरू केले. काहींनी दगडाने खुणा करून आपली जागा निश्चित केली. तर काहींनी चक्क त्यावर टिनाच्या झोपड्या उभारल्या.

ठळक मुद्देजागेबाबत संभ्रम : प्रशासनाकडून कारवाईची तयारी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शहरालगतच्या एमआयडीसी परिसरातील भल्या मोठ्या मोकळ्या जागेवर गेल्या आठवडाभरापासून काही लोकांनी अतिक्रमण करणे सुरू केले आहे. अनेकांनी आपापली जागा हेरून त्यावर कुंपणही करून टाकले. आता या अतिक्रमणधारकांविरूद्ध कारवाई करण्यासाठी महसूल प्रशासनाने तयारी चालविली आहे.१०६ गट क्रमांक असलेली ही जागा १३३ हेक्टर असून याच जागेत एमआयडीसीदेखील उभी आहे. त्यात अनेक उद्योग कार्यान्वीत आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर जागा रिकामी असून आठवडाभरापूर्वी या जागेवर काही लोकांची नजर पडली आणि त्यांनी थेट या जागेवर अतिक्रमण करणे सुरू केले. काहींनी दगडाने खुणा करून आपली जागा निश्चित केली. तर काहींनी चक्क त्यावर टिनाच्या झोपड्या उभारल्या. यासंदर्भात कुणकुण लागताच, वणीचे तहसीलदार श्याम धनमने यांनी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देऊन पाहणी करण्यास सांगीतले. सोबत एक तलाठीही देण्यात आला. वनविभागाने या जागेची पाहणी केली असता, सदर जागा ही वनविभागाची नसल्याचे स्पष्ट झाले. सदर मोकळी जागा ही महाराष्ट्र औद्योगीक महामंडळाची असून त्याचा सातबाराही याच नावाने असल्याचे वणीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील ताजने यांनी ह्यलोकमतह्णला सांगीतले. एमआयडीसी परिसरातील ही जागा अतिशय महत्वाची असून ही जागा बळकाविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न चालविले आहे. त्यासाठी अतिक्रमणाचा मार्ग या लोकांनी स्विकारला आहे. ही जागा एमआयडीसीची असल्याने या जागेची काळजी वाहण्याची जबाबदारी ही नगरपालिकेची आहे. त्यामुळे नगरपालिकेने दोन दिवसांपूर्वी या परिसरात ऑटोद्वारे ध्वनीक्षेपकावरून एमआयडीसीच्या जागेवर कुणीही अतिक्रमण करू नये. अतिक्रमण केल्यास अतिक्रमणधारकांविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.६८ वर्षांपूर्वी या जागेवर केली जायची वहितीसुमारे ६८ वर्षांपूर्वी गट क्रमांक १०६ मधील काही जमिनी सरकारने भूमिहीनांना दिल्या होत्या. मात्र संबंधितांनी काही वर्ष या जमिनीवर वहिती करून नंतर वहिती करणे बंद केले होते. परिणामी सरकारने या जमिनी ताब्यात घेतल्या. याविरूद्ध नऊ जमिनधारकांनी न्यायालयात प्रकरणही दाखल केले होते. एकूणच ही जागा आता वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण