शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

वणी एमआयडीसीच्या जागेवर केले अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 05:00 IST

१०६ गट क्रमांक असलेली ही जागा १३३ हेक्टर असून याच जागेत एमआयडीसीदेखील उभी आहे. त्यात अनेक उद्योग कार्यान्वीत आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर जागा रिकामी असून आठवडाभरापूर्वी या जागेवर काही लोकांची नजर पडली आणि त्यांनी थेट या जागेवर अतिक्रमण करणे सुरू केले. काहींनी दगडाने खुणा करून आपली जागा निश्चित केली. तर काहींनी चक्क त्यावर टिनाच्या झोपड्या उभारल्या.

ठळक मुद्देजागेबाबत संभ्रम : प्रशासनाकडून कारवाईची तयारी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शहरालगतच्या एमआयडीसी परिसरातील भल्या मोठ्या मोकळ्या जागेवर गेल्या आठवडाभरापासून काही लोकांनी अतिक्रमण करणे सुरू केले आहे. अनेकांनी आपापली जागा हेरून त्यावर कुंपणही करून टाकले. आता या अतिक्रमणधारकांविरूद्ध कारवाई करण्यासाठी महसूल प्रशासनाने तयारी चालविली आहे.१०६ गट क्रमांक असलेली ही जागा १३३ हेक्टर असून याच जागेत एमआयडीसीदेखील उभी आहे. त्यात अनेक उद्योग कार्यान्वीत आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर जागा रिकामी असून आठवडाभरापूर्वी या जागेवर काही लोकांची नजर पडली आणि त्यांनी थेट या जागेवर अतिक्रमण करणे सुरू केले. काहींनी दगडाने खुणा करून आपली जागा निश्चित केली. तर काहींनी चक्क त्यावर टिनाच्या झोपड्या उभारल्या. यासंदर्भात कुणकुण लागताच, वणीचे तहसीलदार श्याम धनमने यांनी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देऊन पाहणी करण्यास सांगीतले. सोबत एक तलाठीही देण्यात आला. वनविभागाने या जागेची पाहणी केली असता, सदर जागा ही वनविभागाची नसल्याचे स्पष्ट झाले. सदर मोकळी जागा ही महाराष्ट्र औद्योगीक महामंडळाची असून त्याचा सातबाराही याच नावाने असल्याचे वणीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील ताजने यांनी ह्यलोकमतह्णला सांगीतले. एमआयडीसी परिसरातील ही जागा अतिशय महत्वाची असून ही जागा बळकाविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न चालविले आहे. त्यासाठी अतिक्रमणाचा मार्ग या लोकांनी स्विकारला आहे. ही जागा एमआयडीसीची असल्याने या जागेची काळजी वाहण्याची जबाबदारी ही नगरपालिकेची आहे. त्यामुळे नगरपालिकेने दोन दिवसांपूर्वी या परिसरात ऑटोद्वारे ध्वनीक्षेपकावरून एमआयडीसीच्या जागेवर कुणीही अतिक्रमण करू नये. अतिक्रमण केल्यास अतिक्रमणधारकांविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.६८ वर्षांपूर्वी या जागेवर केली जायची वहितीसुमारे ६८ वर्षांपूर्वी गट क्रमांक १०६ मधील काही जमिनी सरकारने भूमिहीनांना दिल्या होत्या. मात्र संबंधितांनी काही वर्ष या जमिनीवर वहिती करून नंतर वहिती करणे बंद केले होते. परिणामी सरकारने या जमिनी ताब्यात घेतल्या. याविरूद्ध नऊ जमिनधारकांनी न्यायालयात प्रकरणही दाखल केले होते. एकूणच ही जागा आता वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण