शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

दारूबंदीसाठी एल्गार

By admin | Updated: January 27, 2015 23:42 IST

गावातील शांतता व सुव्यवस्थेला धोका पोहोचविणारी दारू आणि जुगार गावातून हद्दपार करण्यासाठी मांगलादेवी येथील महिलांनी एल्गार पुकारला आहे. सोमवारी झालेल्या ग्रामसभेत तसा ठरावही घेण्यात आला.

मांगलादेवी : गावातील शांतता व सुव्यवस्थेला धोका पोहोचविणारी दारू आणि जुगार गावातून हद्दपार करण्यासाठी मांगलादेवी येथील महिलांनी एल्गार पुकारला आहे. सोमवारी झालेल्या ग्रामसभेत तसा ठरावही घेण्यात आला. एवढेच नव्हे तर गावात अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यांची नावेही वाचून दाखविण्यात आली. आता पोलिसांच्या भूमिकेवर या महिलांच्या प्रयत्नाचे यश अवलंबून आहे. नेर तालुक्यात येत असलेल्या या गावातील महिलावर्ग अवैधरीत्या विकल्या जाणाऱ्या दारूमुळे आणि जागोजागी सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यामुळे त्रस्त झाला आहे. सायंकाळी घरी परतणारा धनी कशा स्थितीत येईल, याची चिंता त्यांना दिवसभर सतावत असते. शिवाय युवा वर्गही दारूच्या आहारी जात असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. दारू ढोसून तर्रर्र झालेल्या लोकांमुळे रस्त्याने ये-जा करणे कठीण होवून बसले आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींनाही याचा त्रास सहन करावा लागतो. कोण कुठे झिंगून पडलेला राहील याचा नेम नाही. या सर्व बाबी आतापर्यंत अनेकदा नेर पोलिसांपुढे मांडण्यात आल्या. परंतु अजून तरी यावर उपाययोजना करण्यात आली नाही. शिवाय गावामध्ये जुगाराचे अड्डेही अनेक ठिकाणी सुरू आहेत. घरातील वापरामध्ये असलेल्या वस्तू विकून मिळालेले पैसे जुगारात मांडले जात आहे. परिणामी कौटुंबिक कलह वाढत आहे. अनेकांचे संसार दारू आणि जुगारामुळे उद्ध्वस्त होत आहे. आता हा प्रकार चालू द्यायचा नाही, असा निर्धार या गावातील महिलांनी केला आहे.ग्रामपंचायत कार्यालयात महिलांची विशेष ग्रामसभा घेण्यात आली. सुशीलाबाई परोपटे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या सभेत महिलांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. गावात दारूबंदीचा ठराव घेण्यात आला. यापूर्वी सदर महिलांनी नेर पोलीस ठाण्यावर धडक देवून १०० टक्के दारूबंदीची मागणी ठाणेदार गणेश भावसार यांच्याकडे केली होती. त्यावेळी त्यांनी संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले होते. आता दारू आणि जुगारबंदीचा ठराव घेण्यात आल्याने पोलीस काय भूमिका घेतात याकडे या गावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)