शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
3
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
4
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
5
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
6
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
7
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
8
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
9
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
10
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
11
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
12
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
13
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
14
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
15
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
16
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
17
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
18
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
19
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
20
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सरकारविरुद्ध एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 21:51 IST

गेल्या कित्येक वर्षांपासून साडेसात हजार रुपये पेन्शनची मागणी करणाºया सेवानिवृत्तांकडे सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे पेन्शनर राष्ट्रीय समन्वय समितीने सरकारविरुद्ध एल्गार पुकारत विद्यमान लोकप्रतिनिधींना मतदान न करण्याचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देदुर्लक्ष केल्याचा आरोप : साडेसात हजार रुपये पेन्शनची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : गेल्या कित्येक वर्षांपासून साडेसात हजार रुपये पेन्शनची मागणी करणाऱ्या सेवानिवृत्तांकडे सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे पेन्शनर राष्ट्रीय समन्वय समितीने सरकारविरुद्ध एल्गार पुकारत विद्यमान लोकप्रतिनिधींना मतदान न करण्याचा इशारा दिला आहे.इपीएफ पेन्शन योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या एक हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळते. या योजनेत देशभरातील १८६ उद्योग व संस्थांचे कर्मचारी समाविष्ट आहे. जवळपास ६० लाख पेन्शनर्स आहे. या सर्व पेन्शनर्सनी दरमहा साडेसात हजार रुपये पेन्शन व त्यावर महागाई भत्ता देण्याची मागणी केली. मात्र सरकारने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. या योजनेत बँक कर्मचारी, एसटी महामंडळ, विद्युत महामंडळ, सहकारी संस्था, खरेदी-विक्री संघ, बाजार समिती, जिनिंग-प्रेसिंग आदींच्या सेवानिवृत्तांचा समावेश आहे.सध्या दरमहा केवळ हजार रुपये पेन्शन मिळत असल्याने जीवन जगणे कठीण झाल्याचे समितीने म्हटले आहे. यापूर्वी काँग्रेस सरकारने या मागणीवर विचार करण्यासाठी खासदारांची कोशियार समिती नेमली होती. या समितीने मासिक तीन हजार रुपये पेन्शन व त्यावर महागाई भत्ता देण्याची शिफारस केली होती. मात्र नंतर सरकार बदलले.यानंतर प्रकाश जावडेकर केंद्रात मंत्री झाले. त्यांनी तीन महिन्यात प्रश्न निकाली काढण्याची ग्वाही दिली. हंसराज अहीर यांनीही सरकार नवीन असल्याने थोडा वेळ देण्याची विनंती केली. त्याला आता चार वर्षे लोटूनही आणि चारदा आंदोलन करूनही सरकार दाद देत नसल्याचा आरोप सेवानिवृत्तांनी केला आहे. त्यामुळे विद्यमान मंत्री, खासदार, आमदार व त्यांच्या पक्षांना मतदान न करण्याचा निर्णय पेन्शनर राष्ट्रीय समन्वय समितीने घेतला आहे. विशेष म्हणजे, याबाबत समितीने चक्क निषेध फलकही लावले आहे.तुटपुंज्या पेन्शनमुळे हालसध्या तुटपुंजी पेन्शन मिळत असल्याने इपीएफ पेन्शनरांचे हाल होत असल्याचे समन्वय समितीचे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत काळे यांनी सांगितले. एक हजार रुपयात साधा औषधाचाही खर्च होत नाही मग जगायचे कसे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गजानन भावे यांनी उमेदीच्या काळात रात्रंदिवस एक करून कामे केल्याचे सांगून तुटपुंजी पेन्शन मिळत असल्याबद्दल संताप व्यक्त केला. सरकार दुर्लक्ष करीत असल्याने कुटुंब चालविण्यासाठी मोठी कसरत होत असल्याचे त्यांनी सांगितले.