शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सरकारविरुद्ध एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 21:51 IST

गेल्या कित्येक वर्षांपासून साडेसात हजार रुपये पेन्शनची मागणी करणाºया सेवानिवृत्तांकडे सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे पेन्शनर राष्ट्रीय समन्वय समितीने सरकारविरुद्ध एल्गार पुकारत विद्यमान लोकप्रतिनिधींना मतदान न करण्याचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देदुर्लक्ष केल्याचा आरोप : साडेसात हजार रुपये पेन्शनची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : गेल्या कित्येक वर्षांपासून साडेसात हजार रुपये पेन्शनची मागणी करणाऱ्या सेवानिवृत्तांकडे सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे पेन्शनर राष्ट्रीय समन्वय समितीने सरकारविरुद्ध एल्गार पुकारत विद्यमान लोकप्रतिनिधींना मतदान न करण्याचा इशारा दिला आहे.इपीएफ पेन्शन योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या एक हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळते. या योजनेत देशभरातील १८६ उद्योग व संस्थांचे कर्मचारी समाविष्ट आहे. जवळपास ६० लाख पेन्शनर्स आहे. या सर्व पेन्शनर्सनी दरमहा साडेसात हजार रुपये पेन्शन व त्यावर महागाई भत्ता देण्याची मागणी केली. मात्र सरकारने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. या योजनेत बँक कर्मचारी, एसटी महामंडळ, विद्युत महामंडळ, सहकारी संस्था, खरेदी-विक्री संघ, बाजार समिती, जिनिंग-प्रेसिंग आदींच्या सेवानिवृत्तांचा समावेश आहे.सध्या दरमहा केवळ हजार रुपये पेन्शन मिळत असल्याने जीवन जगणे कठीण झाल्याचे समितीने म्हटले आहे. यापूर्वी काँग्रेस सरकारने या मागणीवर विचार करण्यासाठी खासदारांची कोशियार समिती नेमली होती. या समितीने मासिक तीन हजार रुपये पेन्शन व त्यावर महागाई भत्ता देण्याची शिफारस केली होती. मात्र नंतर सरकार बदलले.यानंतर प्रकाश जावडेकर केंद्रात मंत्री झाले. त्यांनी तीन महिन्यात प्रश्न निकाली काढण्याची ग्वाही दिली. हंसराज अहीर यांनीही सरकार नवीन असल्याने थोडा वेळ देण्याची विनंती केली. त्याला आता चार वर्षे लोटूनही आणि चारदा आंदोलन करूनही सरकार दाद देत नसल्याचा आरोप सेवानिवृत्तांनी केला आहे. त्यामुळे विद्यमान मंत्री, खासदार, आमदार व त्यांच्या पक्षांना मतदान न करण्याचा निर्णय पेन्शनर राष्ट्रीय समन्वय समितीने घेतला आहे. विशेष म्हणजे, याबाबत समितीने चक्क निषेध फलकही लावले आहे.तुटपुंज्या पेन्शनमुळे हालसध्या तुटपुंजी पेन्शन मिळत असल्याने इपीएफ पेन्शनरांचे हाल होत असल्याचे समन्वय समितीचे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत काळे यांनी सांगितले. एक हजार रुपयात साधा औषधाचाही खर्च होत नाही मग जगायचे कसे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गजानन भावे यांनी उमेदीच्या काळात रात्रंदिवस एक करून कामे केल्याचे सांगून तुटपुंजी पेन्शन मिळत असल्याबद्दल संताप व्यक्त केला. सरकार दुर्लक्ष करीत असल्याने कुटुंब चालविण्यासाठी मोठी कसरत होत असल्याचे त्यांनी सांगितले.