शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

वीज महावितरणचा पाटणबोरीत भोंगळ कारभार

By admin | Updated: May 14, 2016 02:28 IST

देयकाचे पैसे घेण्यास नकार :

देयकाचे पैसे घेण्यास नकार : भारनियमनाने ग्राहक त्रस्त, कनिष्ठ अभियंता करतात पांढरकवडा येथून ‘अप-डाउन‘पाटणबोरी : येथील वीज वितरण कंपनीच्या कारभाराने भोंगळपणाचा कळस गाठला आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या भारनियमनाविरोधात नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.येथील वीज कार्यालयाला कुणीही वाली नाही. सर्व कामकाज ‘रामभरोसे’ सुरू आहे. येथे कनिष्ठ अभियंतापदी महिला आहे. त्या नियमित येत नसल्याचे ग्राहक सांगतात. ग्राहकांना तक्रारी देण्याकरिता पांढरकवडा येथे जावे लागते. स्वतंत्र क्वॉर्टर असूनही त्या पांढरकवडा येथून ये-जा करतात. गावातील ट्रान्सफार्मरचे मेंटेनन्स नसल्याने गेल्या १५ दिवसात पाच डी.पी. जळाल्या. त्यापैकी स्टेट बँकेच्या मागील डी.पी.चा बॉक्स बसविला. मात्र बाकीच्या चारची जुजबी दुरूस्ती करून त्या सुरू करण्यात आल्या आहे. येथील महावितरण कार्यालयाला ‘ट्री कटिंग’च्या नावाखाली वर्षाला एक लाखाच्यावर रक्कम येत असल्याची माहिती आहे. मात्र कित्येक ठिकाणी झाडावर विद्युत तारा आढळून येतात. उपकेंद्रातील गवत काढण्याकरिता वर्षातून दोनदा १०-१० हजार रूपये मिळत असल्याचीही माहिती आहे. मात्र उपकेंद्राच्या आवारात टोंगळ्यापर्यंत गवत वाढलेले दिसून येते. देयकाचे पैसे घेण्याकरिता कोणतीही व्यवस्था या कार्यालयाकडे नाही. डाक विभागाचे कर्मचारीही तुटवडा असल्याचे कारण देत देयक स्विकारण्याकरिता हात वर करतात. त्यामुळे ग्राहकांचा वाढता रोष बघून येथे देयक स्विकारून ते पांढरकवडा येथे रक्कम भरून पावती दुसऱ्या दिवशी देण्यात येत होती. मात्र त्यातही मोठ्या प्रमाणात घोळ झाला. देयक भरल्यानंतरही ते पुढील देयकांत लागून येत होते. परिणामी तक्रारी वाढल्या. देयक भरताना येथील महावितरण कार्यालय शिक्का मारून देत होते. पावती दुसऱ्या दिवशी मिळत होती. मात्र यामुळे ग्राहकांना दोनदा चकरा माराव्या लागत होत्या. त्यात मोठ्या प्रमाणात घोळ वाढल्याने कनिष्ठ अभियंत्यांनी यावेळी देयके न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. आता ग्राहकांना देयक भरण्याकरिता पांढरकवडा येथे जाण्याची वेळ आली आहे. येथील वीज अपकेंद्रात पाच के.व्ही.चे नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यात आले. त्याची पूजा करून, नारळ फोडून चाचणी घेण्यात आली. मात्र ते सुरू करण्याकरिता महावितरणला अद्याप मुर्हूतच सापडला नाही. अर्थिंगकरिता पाणीही उपलब्ध नाही. त्यासाठी परवानगी नसल्याचे कारण कंपनीकडून देण्यात येते. येथील दोन लाईनमन वगळता उर्वरित कर्मचारी अनधिकृत आहेत. येथील जुन्या कर्मचाऱ्यांची बदली झाली, तर काही कर्मचारी ड्युटीच बजावत नसल्याच्या तक्रारी आहे. काही विशिष्ट आॅपरेटर आपल्या स्वत:च्या कामातच व्यस्त असतात. त्यांना ड्युटीकरिता वेळच मिळत नाही. (वार्ताहर)मीटर करिता उकळले जातात जादा पैसेकित्येकदा येथील सुरक्षा रक्षकच ड्युटी बजावताना दिसून येतो. आत्तापर्यंत जेवढे मीटर लावण्यात आले, त्या अनेकांना अद्याप अधिकृत पावती देण्यात आली नसल्याचे ग्राहक सांगतात. १ हजार ६०० ते १ हजार ८०० रूपये अधिकृत रक्कम असलेल्या मीटरकरिता गोरगरीब जनता तीन हजार ते चार हजार रूपये देतात. मीटरकरतिाही जादा पैसे उकळले जात आहे. त्यामुळे या कार्यालयाकडून ग्राहकांची केवळ पिळवणूकच केली जात असल्याची ओरड सुरू आहे.