शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

सामाजिक न्याय विभागाच्या इमारतींवर वीज अटकाव यंत्रणा

By admin | Updated: August 24, 2015 00:16 IST

राज्यात वीज पडून मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. यासाठी अंतरिम उपाययोजना म्हणून प्रायोगिक तत्वावर वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

शासनाचा निर्णय : विजेमुळे होणारे मृत्यू कमी करण्याचा प्रयत्नयवतमाळ : राज्यात वीज पडून मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. यासाठी अंतरिम उपाययोजना म्हणून प्रायोगिक तत्वावर वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यातून अपमृत्युंचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात येत आहे. सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखालील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या इमारतींवर वीज अटकाव यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखालील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या राज्यातील एकूण २३ शासकीय इमारतींवर वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येकी दोन लाख ५५ हजार रुपये या प्रमाणे २३ इमारतींसाठी ५८ लाख ६५ हजार रुपये खर्चास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मान्यता दिली आहे. या संदर्भात ई-निविदा प्रक्रियेत सर्वात कमी दर असलेल्या पुणे येथील एका एजन्सीमार्फत हे वीज अटकाव यंत्रणा बसविण्याची व्यवस्था करण्याचेही शासनाने सुचविले आहे. याबाबत शासनाने काही निकष ठरविले आहे. त्यानुसार वीज अटकाव यंत्रणा बसविण्याबाबत महसूल व वन विभाग, मदत कार्य, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापनसंदर्भातील शासन निर्णयातील अटींचे तंतोतंत पालन करण्यात यावे, ज्या शासकीय इमारतींवर सदर यंत्रणा बसविण्यात येणार आहे, त्या इमारतींच्या बांधकामाच्या अंदाजपत्रकात वीज अटकाव यंत्रणेसाठी तरतूद करण्यात आलेली नाही, तसेच यापूर्वी सदर इमारतीवर ही यंत्रणा बसविण्यात आली नाही, याची खातरजमा करावी आणि त्यानंतरच यंत्रणा बसविण्यात यावी, या संदर्भातील निकडता समाजकल्याणचे आयुक्त (पुणे) यांनी तपासून पहावी आदींसह इतरही काही अटी ठरवून दिल्या आहेत. या यंत्रणेमुळे वीज पडून होणाऱ्या मृ्त्युंच्या संख्येत निश्चितच घट येणार आहे. (प्रतिनिधी)