शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक न्याय विभागाच्या इमारतींवर वीज अटकाव यंत्रणा

By admin | Updated: August 24, 2015 00:16 IST

राज्यात वीज पडून मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. यासाठी अंतरिम उपाययोजना म्हणून प्रायोगिक तत्वावर वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

शासनाचा निर्णय : विजेमुळे होणारे मृत्यू कमी करण्याचा प्रयत्नयवतमाळ : राज्यात वीज पडून मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. यासाठी अंतरिम उपाययोजना म्हणून प्रायोगिक तत्वावर वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यातून अपमृत्युंचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात येत आहे. सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखालील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या इमारतींवर वीज अटकाव यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखालील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या राज्यातील एकूण २३ शासकीय इमारतींवर वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येकी दोन लाख ५५ हजार रुपये या प्रमाणे २३ इमारतींसाठी ५८ लाख ६५ हजार रुपये खर्चास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मान्यता दिली आहे. या संदर्भात ई-निविदा प्रक्रियेत सर्वात कमी दर असलेल्या पुणे येथील एका एजन्सीमार्फत हे वीज अटकाव यंत्रणा बसविण्याची व्यवस्था करण्याचेही शासनाने सुचविले आहे. याबाबत शासनाने काही निकष ठरविले आहे. त्यानुसार वीज अटकाव यंत्रणा बसविण्याबाबत महसूल व वन विभाग, मदत कार्य, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापनसंदर्भातील शासन निर्णयातील अटींचे तंतोतंत पालन करण्यात यावे, ज्या शासकीय इमारतींवर सदर यंत्रणा बसविण्यात येणार आहे, त्या इमारतींच्या बांधकामाच्या अंदाजपत्रकात वीज अटकाव यंत्रणेसाठी तरतूद करण्यात आलेली नाही, तसेच यापूर्वी सदर इमारतीवर ही यंत्रणा बसविण्यात आली नाही, याची खातरजमा करावी आणि त्यानंतरच यंत्रणा बसविण्यात यावी, या संदर्भातील निकडता समाजकल्याणचे आयुक्त (पुणे) यांनी तपासून पहावी आदींसह इतरही काही अटी ठरवून दिल्या आहेत. या यंत्रणेमुळे वीज पडून होणाऱ्या मृ्त्युंच्या संख्येत निश्चितच घट येणार आहे. (प्रतिनिधी)