शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

विजेचा ‘स्थिर आकार दर’ वर्षभरात दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 22:25 IST

वीज नियामक आयोगाच्या निर्णयानुसार वीज वितरण कंपनीने वीजबिलाच्या स्थिर आकारात वाढ केली आहे. ही वाढ वर्षभरात तीन वेळा झाली आहे. यात विविध गटात ५० ते ८८ टक्के वाढ झाली आहे. २०२० पर्यंत स्थिर आकार दरात वाढ करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देग्राहकांना भुर्दंड : नियामक आयोगाने वर्षभरात केली तीन वेळा वाढ, आणखी दोन वर्षे वाढीचे संकेत

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वीज नियामक आयोगाच्या निर्णयानुसार वीज वितरण कंपनीने वीजबिलाच्या स्थिर आकारात वाढ केली आहे. ही वाढ वर्षभरात तीन वेळा झाली आहे. यात विविध गटात ५० ते ८८ टक्के वाढ झाली आहे. २०२० पर्यंत स्थिर आकार दरात वाढ करण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांना भुर्दंड सोसावा लागणार आहे.कोळशाचा तुटवडा, डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किमती यामुळे ट्रान्सपोर्टचे वाढलेले दर, वीज गळती याचा परिणाम वीज निर्मितीवर झाला आहे. वीज नियामक आयोगाने स्थिर आकारात वाढ सूचविली आहे. २०१६ ते २०२० पर्यंत चार टप्प्यात विजेची दरवाढ होणार आहे. यावर्षी तीन वेळा विविध गटातील स्थिर आकार दरात वाढ झाली आहे. मार्च २०१७ मध्ये स्थिर आकार दर ५५ रूपये होता. मार्च २०१८ मध्ये घरगुती ग्राहकांचा स्थिर आकार दर ६० रूपये झाला. एप्रिलमध्ये ६५ रूपये, सप्टेंबरमध्ये ८० रूपये करण्यात आला. हे वाढीव दर आॅक्टोबरच्या बिलात लावून आले आहेत. अशा पद्धतीने घरगुती थ्री फेज आणि वाणिज्यिक ग्राहकांच्या बिलात वाढ झाली.घरगुती थ्री फेज ग्राहकांचा मार्च १८ मधील स्थिर आकर दर १७० रूपये होता. एप्रिलमध्ये १८५ रूपये, सप्टेंबरमध्ये ३०० रूपये करण्यात आला. वाणिज्यिक ग्राहकांचा मार्च १८ मध्ये स्थिर आकार दर २५० रूपये होता. एप्रिलमध्ये २७० रूपये, सप्टेंबरमध्ये ३५० रूपयांवर पोहचला. एप्रिल २०१९ मध्ये आयोगाने आणखी वाढ सूचविली आहे. यातून वीज कंपनी विविध दुरूस्तीचे काम हाती घेणार आहे. मात्र सर्वसामान्य ग्राहकांच्या वीज बिलात वाढीव रकमा येणार आहे.बिलाच्या युनिटचे दर वाढलेवीजबिलाच्या युनिटमध्ये वाढ करण्यासाठी एमईआरसीने प्रथम सुनावणी घेतली. सप्टेंबरला त्याची अंमलबजावणी सुरू केली. आॅक्टोबरला हे वाढीव बिल लावून आले. यामध्ये युनिटला २२ ते २४ पैशांची वाढ नोंदविण्यात आली. यामुळे ग्राहकांच्या वीजबिलात वाढ झाली आहे. ही वाढ यापुढेही कायम राहण्याची शक्यता असल्याने वीज ग्राहक संघटना आक्रमक पवित्र्यात आहे.२०० युनिटचा स्पॅन तूर्त नाहीवीजबिलाचे धोरण ठरविताना ० ते १०० आणि १०० ते ३०० युनिटचा एक स्पॅन हा नियम बदलवावा. त्याऐवजी १०० ते २०० युनिट असा स्पॅन तयार करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केली आहे. हा विषय एमईआरसीपुढे ठेवण्यात आला. त्यावर अमरावती आणि नागपुरात सुनावणी झाली. मात्र कुठलाही निर्णय झाला नाही.

टॅग्स :electricityवीज