शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

निवडणुका थांबल्या अन् २२ हजार कोटीही लांबले, महाराष्ट्राला २ वर्षात ८ हजार कोटींचा फटका

By अविनाश साबापुरे | Updated: December 28, 2023 17:06 IST

Amravati News: देवानं देल्लं पण कर्मानं नेलं... असे खेड्यापाड्यात दिवाळखोर माणसांबद्दल नेहमीच बोलले जाते. हाच किस्सा महाराष्ट्रातल्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत खरा ठरला आहे.

- अविनाश साबापुरेयवतमाळ -  देवानं देल्लं पण कर्मानं नेलं... असे खेड्यापाड्यात दिवाळखोर माणसांबद्दल नेहमीच बोलले जाते. हाच किस्सा महाराष्ट्रातल्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत खरा ठरला आहे. गेल्या दोन अडीच वर्षांपासून नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका थांबलेल्या आहेत. त्यामुळे केंद्राच्या १५ व्या वित्त आयोगाकडून आलेले हक्काचे आठ हजार ७६८ कोटी रुपये या संस्थांना अद्यापही मिळू शकलेले नाहीत. तर पुढील तीन वर्षासाठी मंजूर असलेल्या जवळपास २२ हजार कोटी रुपयांचाही फटका महाराष्ट्राला बसण्याचा धोका निर्माण झाला आहे.

केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाने २०२१-२२ ते २०२५-२६ या पाच वर्षांसाठी एकंदर २८ राज्यांतील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांकरिता २,३६,३६१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आयोगाने याबाबत १४ जुलै २०२१ रोजी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना अवगत केले होते. त्यानुसार, महाराष्ट्राला २०२५-२६ पर्यंत २२,७१३ कोटी रुपये मंजूर आहेत. पण यातील मागील दोन वर्षात मिळालेले ८,७६८ कोटी रुपये जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदांपर्यंत येऊ शकलेले नाहीत. कारण हा निधी मिळण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (ड्यूली काॅन्स्टिट्यूटेड लोकल गव्हर्नमेंट) निवडून आलेले लोकप्रतिनिधी कार्यरत असावे, असा वित्त आयोगाचा निकष आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्रातील २०० पेक्षा अधिक नगरपरिषदा, नगरपंचायती, २५ जिल्हा परिषद, २८४ पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन अडीच वर्षांपासून थांबलेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आलेला वित्त आयोगाचा निधी अद्याप ‘रिलिज’ होऊ शकलेला नाही. यामध्ये पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणे, रेनवाॅटर हार्वेस्टिंग, स्वच्छता या कामांसाठी ६० टक्के निधी (टाइड ग्रांट) दिला जातो. तर स्थानिक संस्थेच्या गरजेनुसार करायच्या कामांसाठी ४० टक्के निधी (बेसिक ग्रांट) दिला जातो. पण महाराष्ट्रात हे दोन्ही निधी थांबलेले आहेत.

तुमचा होतो खेळ, आमचा जातो पैसाजिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबल्याने १५ व्या वित्त आयोगाचा निधी थांबला आहे. याचा फटका ग्रामपंचायतींना बसतोय. कारण वित्त आयोगातील ७० टक्केपेक्षा अधिक वाटा ग्रामपंचायतींना दिला जातो. हा निधी नसल्याने पाणीपुरवठा, स्वच्छता, सांडपाण्याचा पुनर्वापर, रेनवाॅटर हार्वेस्टिंग अशा कामांसाठी पैसाच मिळणे बंद झाले आहे. याबाबत गवंडी गावचे सरपंच विनोद वाटमोडे म्हणाले, राजकारणासाठी निवडणुका थांबवलेल्या आहेत. पण त्यामुळे आमच्या गावातली कामे खोळंबत आहे. तर माहिती अधिकार प्रशिक्षक विशाल ठाकरे म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी येऊन परत जातोय, यात महाराष्ट्रातील जनतेचे मोठे नुकसान आहे. मोठ्या प्रमाणात कर भरूनही महाराष्ट्रातील जनतेला हा अन्याय सहन करावा लागत आहे. विकासकामे ठप्प झाली आहेत.

 १५ व्या वित्त आयोगातून महाराष्ट्राला वर्षनिहाय मंजूर निधी (बेसिक व टाइड ग्रांट / आकडे कोटीत)२०२१-२२ : १७२२.८ : २५८४.२२०२२-२३ : १७८४.४ : २६७६.६२०२३-२४ : १८०४ : २७०६२०२४-२५ : १९१०.४ : २८६५.६२०२५-२६ : १८६३.६ : २७९५.४एकूण : ९०८५.२ : १३६२७.८

 देशात कोणाला किती निधी?(आकडे कोटीत)आंध्र प्रदेश : १०,२३१अरुणाचल प्रदेश : ९००आसाम : ६,२५३बिहार : १९,५६१छत्तीसगड : ५,६६९गुजरात : १२,४५५हरयाणा : ४,९२९हिमाचल प्रदेश : १,६७३झारखंड : ६,५८५कर्नाटक : १२,५३९केरळ : ६,३४४मध्यप्रदेश : १५५२७महाराष्ट्र : २२,७१३उत्तर प्रदेश : ३८,०१२उत्तराखंड : २,२३९पश्चिम बंगाल : १७,१९९ओडिशा : ८,८००पंजाब : ५,४१०राजस्थान : १५,०५३सिक्कीम : १६५तमीळनाडू : १४,०५९तेलंगणा : ७,२०१गोवा : २९३मणिपूर : ६९०मेघालय : ७११मिझोराम : ३६२नागालँड : ४८६त्रिपूरा : ७४६एकूण : २,३६,८०५

टॅग्स :ElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्र