शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुका थांबल्या अन् २२ हजार कोटीही लांबले, महाराष्ट्राला २ वर्षात ८ हजार कोटींचा फटका

By अविनाश साबापुरे | Updated: December 28, 2023 17:06 IST

Amravati News: देवानं देल्लं पण कर्मानं नेलं... असे खेड्यापाड्यात दिवाळखोर माणसांबद्दल नेहमीच बोलले जाते. हाच किस्सा महाराष्ट्रातल्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत खरा ठरला आहे.

- अविनाश साबापुरेयवतमाळ -  देवानं देल्लं पण कर्मानं नेलं... असे खेड्यापाड्यात दिवाळखोर माणसांबद्दल नेहमीच बोलले जाते. हाच किस्सा महाराष्ट्रातल्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत खरा ठरला आहे. गेल्या दोन अडीच वर्षांपासून नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका थांबलेल्या आहेत. त्यामुळे केंद्राच्या १५ व्या वित्त आयोगाकडून आलेले हक्काचे आठ हजार ७६८ कोटी रुपये या संस्थांना अद्यापही मिळू शकलेले नाहीत. तर पुढील तीन वर्षासाठी मंजूर असलेल्या जवळपास २२ हजार कोटी रुपयांचाही फटका महाराष्ट्राला बसण्याचा धोका निर्माण झाला आहे.

केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाने २०२१-२२ ते २०२५-२६ या पाच वर्षांसाठी एकंदर २८ राज्यांतील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांकरिता २,३६,३६१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आयोगाने याबाबत १४ जुलै २०२१ रोजी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना अवगत केले होते. त्यानुसार, महाराष्ट्राला २०२५-२६ पर्यंत २२,७१३ कोटी रुपये मंजूर आहेत. पण यातील मागील दोन वर्षात मिळालेले ८,७६८ कोटी रुपये जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदांपर्यंत येऊ शकलेले नाहीत. कारण हा निधी मिळण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (ड्यूली काॅन्स्टिट्यूटेड लोकल गव्हर्नमेंट) निवडून आलेले लोकप्रतिनिधी कार्यरत असावे, असा वित्त आयोगाचा निकष आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्रातील २०० पेक्षा अधिक नगरपरिषदा, नगरपंचायती, २५ जिल्हा परिषद, २८४ पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन अडीच वर्षांपासून थांबलेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आलेला वित्त आयोगाचा निधी अद्याप ‘रिलिज’ होऊ शकलेला नाही. यामध्ये पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणे, रेनवाॅटर हार्वेस्टिंग, स्वच्छता या कामांसाठी ६० टक्के निधी (टाइड ग्रांट) दिला जातो. तर स्थानिक संस्थेच्या गरजेनुसार करायच्या कामांसाठी ४० टक्के निधी (बेसिक ग्रांट) दिला जातो. पण महाराष्ट्रात हे दोन्ही निधी थांबलेले आहेत.

तुमचा होतो खेळ, आमचा जातो पैसाजिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबल्याने १५ व्या वित्त आयोगाचा निधी थांबला आहे. याचा फटका ग्रामपंचायतींना बसतोय. कारण वित्त आयोगातील ७० टक्केपेक्षा अधिक वाटा ग्रामपंचायतींना दिला जातो. हा निधी नसल्याने पाणीपुरवठा, स्वच्छता, सांडपाण्याचा पुनर्वापर, रेनवाॅटर हार्वेस्टिंग अशा कामांसाठी पैसाच मिळणे बंद झाले आहे. याबाबत गवंडी गावचे सरपंच विनोद वाटमोडे म्हणाले, राजकारणासाठी निवडणुका थांबवलेल्या आहेत. पण त्यामुळे आमच्या गावातली कामे खोळंबत आहे. तर माहिती अधिकार प्रशिक्षक विशाल ठाकरे म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी येऊन परत जातोय, यात महाराष्ट्रातील जनतेचे मोठे नुकसान आहे. मोठ्या प्रमाणात कर भरूनही महाराष्ट्रातील जनतेला हा अन्याय सहन करावा लागत आहे. विकासकामे ठप्प झाली आहेत.

 १५ व्या वित्त आयोगातून महाराष्ट्राला वर्षनिहाय मंजूर निधी (बेसिक व टाइड ग्रांट / आकडे कोटीत)२०२१-२२ : १७२२.८ : २५८४.२२०२२-२३ : १७८४.४ : २६७६.६२०२३-२४ : १८०४ : २७०६२०२४-२५ : १९१०.४ : २८६५.६२०२५-२६ : १८६३.६ : २७९५.४एकूण : ९०८५.२ : १३६२७.८

 देशात कोणाला किती निधी?(आकडे कोटीत)आंध्र प्रदेश : १०,२३१अरुणाचल प्रदेश : ९००आसाम : ६,२५३बिहार : १९,५६१छत्तीसगड : ५,६६९गुजरात : १२,४५५हरयाणा : ४,९२९हिमाचल प्रदेश : १,६७३झारखंड : ६,५८५कर्नाटक : १२,५३९केरळ : ६,३४४मध्यप्रदेश : १५५२७महाराष्ट्र : २२,७१३उत्तर प्रदेश : ३८,०१२उत्तराखंड : २,२३९पश्चिम बंगाल : १७,१९९ओडिशा : ८,८००पंजाब : ५,४१०राजस्थान : १५,०५३सिक्कीम : १६५तमीळनाडू : १४,०५९तेलंगणा : ७,२०१गोवा : २९३मणिपूर : ६९०मेघालय : ७११मिझोराम : ३६२नागालँड : ४८६त्रिपूरा : ७४६एकूण : २,३६,८०५

टॅग्स :ElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्र