शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

लोकसभा १९७७ ची निवडणूक; वसंतराव नाईक यांच्या ‘त्या’ भाषणाने फिरला निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 13:24 IST

आणीबाणीनंतर १९७७ मध्ये सहाव्या लोकसभेची निवडणूक झाली. त्यात राळेगाव तालुक्यातील दोन दिग्गजांमध्ये चुरस होती. तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या एका भाषणाने ‘त्या’ निवडणुकीचा निकाल फिरला होता.

ठळक मुद्दे अर्ध्या तासात होत्याचे झाले नव्हते

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आणीबाणीनंतर १९७७ मध्ये सहाव्या लोकसभेची निवडणूक झाली. त्यात राळेगाव तालुक्यातील दोन दिग्गजांमध्ये चुरस होती. तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या एका भाषणाने ‘त्या’ निवडणुकीचा निकाल फिरला होता.तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी घोषित केली होती. त्यानंतर देशाचे चित्रच पालटले होते. लोकनायक जयप्रकाश नारायण, राजनारायण, चरणसिंग, मोरारजी देसाई, जॉर्ज फर्नांडीस आदी नेत्यांनी त्यावेळी आणीबाणीविरुद्ध प्रचंड रान उठविले. परिणामी अनेकांना कारागृहात जावे लागले. विरोधकांनी प्रचंड राळ उठविल्याने काँग़्रेसविरूद्ध देशभर वातावरण तापले होते. दोन वर्षानंतर त्याच स्थितीत १९७७ मध्ये देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाली होती.काँग्रेसविरोधी वातावरणामुळे त्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये धाकधूक होती. त्यावेळी यवतमाळ लोकसभा मतदार संघात काँग्रेसने राळेगाव तालुक्यातील श्रीधरराव जवादे यांना उमेदवारी दिली. विरोधकांनीही त्यांच्याविरूद्ध राळेगाव तालुक्यातीलच नानाभाऊ एंबडवार यांना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरविले. जवादे यांना ‘गाय-वासरू’, तर एंबडवार यांना ‘सायकल’ चिन्ह मिळाले होते. दोन्ही उमेदवार एकाच तालुक्यातील असल्याने त्यांना एकमेकांची ‘उणी-दुणी’ चांगलीच ठाऊक होती. त्यामुळे प्रचारात रंगत आली होती. आणीबाणीमुळे विरोधी उमेदवार नानाभाऊ एंबडवार यांची चांगलीच हवा झाली होती. ते विजयाकडे कूच करीत असल्याचे चित्र निर्माण झाले होते.विरोधकांच्या आरोपांमुळे काँग्रेस उमेदवार अडचणीत आले होते. अशावेळी तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांची जवादे यांच्या समर्थनार्थ यवतमाळच्या आझाद मैदानात सभा लावण्यात आली. ‘त्या’ सभेत नाईक यांनी ‘माणूसकीची प्रयोगशाळा’ या विषयावर भाषण देताना चांगला पक्ष व चांगला उमेदवार कसा निवडावा, याबाबत मार्गदर्शन केले. मतदारांनी उमेदवाराचे बॅकग्राऊंड तपासावे. उमेदवाराची जनतेप्रती असलेली तळमळ लक्षात घ्यावी.पक्ष आणि उमेदवार जनतेचे हितकर्ते असावे, असे स्पष्ट केले. त्यांच्या या एका भाषणाने निवडणुकीचा नूरच पालटला अन् पराभवाच्या छायेत असलेले जवादे अखेर १२ हजार १९७ मतांच्या निसटत्या फरकाने विजयी झाले होते. नाईक यांच्या एका भाषणाने निकाल फिरला होता. मात्र विरोधी उमेदवाराचे ‘होत्याचे नव्हते’ झाले होते.या निवडणुकीनंतर देशात काँगे्रसचा पराभव होऊन केंद्रात जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले होते. मात्र अवघ्या अडीच वर्षांत हे सरकार कोसळले अन् जवादे यांची खासदारकी गेली. विशेष म्हणजे १९७७ च्या निवडणुकीत खुद्द इंदिरा गांधी यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

विजयानंतर रॅली नाहीयवतमाळ मतदार संघात त्यावेळी श्रीधरराव जवादे यांना एक लाख ९२ हजार २२८ मते मिळाली होती. विरोधी उमेदवार नानाभाऊ एंबडवार यांना एक लाख ८० हजार ३१ मते मिळाली होती. १२ हजार १९७ मतांनी जवादे तरले होते. विजयानंतर काँग्रेसने विजयी मिरवणूक काढण्याची तयारी केली होती. मात्र तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी काँग्रेस नेत्यांना तुम्ही जरी जिंकले असलात, तरी इंदिरा गांधी यांचा पराभव झाल्याची माहिती दिली. यामुळे काँग्रेसने विजयी मिरवणूक रद्द केली. दरम्यान, श्रीधरराव जवादे हे काँग्रेसमधील तत्कालीन बडे प्रस्थ शंकरराव चव्हाण यांच्या गटाचे म्हणून ओळखले जातं. चव्हाण यांनीच जवादे यांना उमेदवारी मिळवून देण्यात मोलाची भूमिका वठविली होती. दुसरीकडे नानाभाऊ एंबडवार यांच्याबद्दल दिवंगत वसंतराव नाईक यांना ‘आपुलकी’ होती. तथापि पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांना जवादे यांच्या समर्थनार्थ सभा घ्यावी लागली होती. मतदारांनी त्यांचे भाषण ऐकून जवादे यांना निसटत्या फरकाने विजयी केले. एकूण नाईक यांच्या ‘त्या’ भाषणानेच ही निवडणूक गाजली अन् त्यांचा उमेदवारही निवडून आल्याची आठवण या निवडणुकीचे साक्षीदार असलेल्या एका ज्येष्ठ माजी लोकप्रतिनिधीने ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक