शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा १९७७ ची निवडणूक; वसंतराव नाईक यांच्या ‘त्या’ भाषणाने फिरला निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 13:24 IST

आणीबाणीनंतर १९७७ मध्ये सहाव्या लोकसभेची निवडणूक झाली. त्यात राळेगाव तालुक्यातील दोन दिग्गजांमध्ये चुरस होती. तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या एका भाषणाने ‘त्या’ निवडणुकीचा निकाल फिरला होता.

ठळक मुद्दे अर्ध्या तासात होत्याचे झाले नव्हते

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आणीबाणीनंतर १९७७ मध्ये सहाव्या लोकसभेची निवडणूक झाली. त्यात राळेगाव तालुक्यातील दोन दिग्गजांमध्ये चुरस होती. तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या एका भाषणाने ‘त्या’ निवडणुकीचा निकाल फिरला होता.तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी घोषित केली होती. त्यानंतर देशाचे चित्रच पालटले होते. लोकनायक जयप्रकाश नारायण, राजनारायण, चरणसिंग, मोरारजी देसाई, जॉर्ज फर्नांडीस आदी नेत्यांनी त्यावेळी आणीबाणीविरुद्ध प्रचंड रान उठविले. परिणामी अनेकांना कारागृहात जावे लागले. विरोधकांनी प्रचंड राळ उठविल्याने काँग़्रेसविरूद्ध देशभर वातावरण तापले होते. दोन वर्षानंतर त्याच स्थितीत १९७७ मध्ये देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाली होती.काँग्रेसविरोधी वातावरणामुळे त्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये धाकधूक होती. त्यावेळी यवतमाळ लोकसभा मतदार संघात काँग्रेसने राळेगाव तालुक्यातील श्रीधरराव जवादे यांना उमेदवारी दिली. विरोधकांनीही त्यांच्याविरूद्ध राळेगाव तालुक्यातीलच नानाभाऊ एंबडवार यांना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरविले. जवादे यांना ‘गाय-वासरू’, तर एंबडवार यांना ‘सायकल’ चिन्ह मिळाले होते. दोन्ही उमेदवार एकाच तालुक्यातील असल्याने त्यांना एकमेकांची ‘उणी-दुणी’ चांगलीच ठाऊक होती. त्यामुळे प्रचारात रंगत आली होती. आणीबाणीमुळे विरोधी उमेदवार नानाभाऊ एंबडवार यांची चांगलीच हवा झाली होती. ते विजयाकडे कूच करीत असल्याचे चित्र निर्माण झाले होते.विरोधकांच्या आरोपांमुळे काँग्रेस उमेदवार अडचणीत आले होते. अशावेळी तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांची जवादे यांच्या समर्थनार्थ यवतमाळच्या आझाद मैदानात सभा लावण्यात आली. ‘त्या’ सभेत नाईक यांनी ‘माणूसकीची प्रयोगशाळा’ या विषयावर भाषण देताना चांगला पक्ष व चांगला उमेदवार कसा निवडावा, याबाबत मार्गदर्शन केले. मतदारांनी उमेदवाराचे बॅकग्राऊंड तपासावे. उमेदवाराची जनतेप्रती असलेली तळमळ लक्षात घ्यावी.पक्ष आणि उमेदवार जनतेचे हितकर्ते असावे, असे स्पष्ट केले. त्यांच्या या एका भाषणाने निवडणुकीचा नूरच पालटला अन् पराभवाच्या छायेत असलेले जवादे अखेर १२ हजार १९७ मतांच्या निसटत्या फरकाने विजयी झाले होते. नाईक यांच्या एका भाषणाने निकाल फिरला होता. मात्र विरोधी उमेदवाराचे ‘होत्याचे नव्हते’ झाले होते.या निवडणुकीनंतर देशात काँगे्रसचा पराभव होऊन केंद्रात जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले होते. मात्र अवघ्या अडीच वर्षांत हे सरकार कोसळले अन् जवादे यांची खासदारकी गेली. विशेष म्हणजे १९७७ च्या निवडणुकीत खुद्द इंदिरा गांधी यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

विजयानंतर रॅली नाहीयवतमाळ मतदार संघात त्यावेळी श्रीधरराव जवादे यांना एक लाख ९२ हजार २२८ मते मिळाली होती. विरोधी उमेदवार नानाभाऊ एंबडवार यांना एक लाख ८० हजार ३१ मते मिळाली होती. १२ हजार १९७ मतांनी जवादे तरले होते. विजयानंतर काँग्रेसने विजयी मिरवणूक काढण्याची तयारी केली होती. मात्र तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी काँग्रेस नेत्यांना तुम्ही जरी जिंकले असलात, तरी इंदिरा गांधी यांचा पराभव झाल्याची माहिती दिली. यामुळे काँग्रेसने विजयी मिरवणूक रद्द केली. दरम्यान, श्रीधरराव जवादे हे काँग्रेसमधील तत्कालीन बडे प्रस्थ शंकरराव चव्हाण यांच्या गटाचे म्हणून ओळखले जातं. चव्हाण यांनीच जवादे यांना उमेदवारी मिळवून देण्यात मोलाची भूमिका वठविली होती. दुसरीकडे नानाभाऊ एंबडवार यांच्याबद्दल दिवंगत वसंतराव नाईक यांना ‘आपुलकी’ होती. तथापि पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांना जवादे यांच्या समर्थनार्थ सभा घ्यावी लागली होती. मतदारांनी त्यांचे भाषण ऐकून जवादे यांना निसटत्या फरकाने विजयी केले. एकूण नाईक यांच्या ‘त्या’ भाषणानेच ही निवडणूक गाजली अन् त्यांचा उमेदवारही निवडून आल्याची आठवण या निवडणुकीचे साक्षीदार असलेल्या एका ज्येष्ठ माजी लोकप्रतिनिधीने ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक