शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

महागाव एपीएमसीच्या १८ जागांसाठी निवडणूक

By admin | Updated: January 12, 2017 00:55 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील १८ जागांसाठी संचालक मंडळाची निवडणूक होऊ घातली आहे.

२६ पर्यंत नामांकन : गरज पडल्यास होणार मतदान, भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रचारात गाजणार संजय भगत  महागाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील १८ जागांसाठी संचालक मंडळाची निवडणूक होऊ घातली आहे. २६ जानेवारीपर्यंत नामांकन दाखल करता येणार असून, १९ फेब्रुवारी रोजी आवश्यकता असल्यास मतदान होऊ घातले आहे. व्यापारी-अडते दोन जागा, हमाल-मापारी एक, बहुउद्देशीय सहकारी संस्था ११ पैकी सर्वसाधारण ७ विमुक्त जाती, भटक्या जमाती एक, इतर मागासवर्गांसाठी एक, महिला राखीव दोन जागा, ग्रामपंचायत मतदारसंघातून चार पैकी सर्वसाधारण दोन, अनुसूचित जाती-जमाती एक आणि आर्थिक दुर्बळ एक अशा एकूण १८ जागांसाठी ही निवडणूक होऊ घातली आहे. तालुक्यातील सहकार क्षेत्रात सर्वात मोठी असलेली संस्था नेहमीच राष्ट्रवादी काँगे्रसच्या ताब्यात राहात आली आहे. गेल्या काही वर्षात समितीच्या संचालक मंडळाने कापूस खरेदीतून समितीला सेसच्या माध्यमातूनच बरेच आर्थिक नुकसान पोहोचविले आहे. तसेच गरज नसताना समितीमध्ये कर्मचारी भरती करण्यात अली आहे. दोन्ही प्रकरणातून संचालकांनी बरीच आर्थिक उलाढाल केली असून, त्याच्या तक्रारी जिल्हा उपनिबंधक कार्यालय यवतमाळ आणि पणन संचालक पुणे येथे पोहोचल्या आहेत. काँग्रेसचे भगवानराव पंडागळे यांनी येथील समितीचा भ्रष्ट कारभार जिल्हा उपनिबंधक कार्यालयापर्यंत पोहोचविलेला आहे. तक्रारीचा चौकशी अहवाल गुंडाळून ठेवण्यात आला आहे. शासनस्तरावरून न्याय मिळत नसल्याचे पाहून तक्रारकर्त्याने न्यायालयात धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे. शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून काम करणाऱ्या संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत संचालक मंडळ गेल्या काही वर्षांपासून पदारूढ आहे. या संचालक मंडळाने संस्थेच्या विकासात्मक कार्यासाठी कधीच पुढाकार घेतला नाही. हे आजपर्यंत संस्थेच्या सर्व बंद पडलेल्या उपबाजार आणि ढेपाळलेल्या सेस वसुलीवरून स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांची संस्था अन्नसंस्थेप्रमाणे शेवटच्या घटका मोजत असून, याला सत्ताधारी संचालक मंडळ जेवढे कारणीभूत आहेत तेवढेच त्या पक्षाचे नेते आहेत, असा सनसनाटी आरोपही आता विरोधी गटातून केल्या जात आहे. सत्ताधारी संचालक मंडळाने केलेली कर्मचारी भरती आणि त्या भरती प्रक्रियेतून उकळण्यात आलेला मलिदा, सेसवसुलीमधून बाजार समितीला बसलेला आर्थिक फटका संस्थेला अधोगतीकडे नेण्यास कारणीभूत ठरल्याची भावना संस्थेच्या सभासदांची झाली आहे. एकमेव शेतकऱ्यांची असलेली ही संस्था पुन्हा या सत्ताधाऱ्यांच्या हातात गेल्यास या संस्थेचे अवशेषही शिल्लक राहणार नाही, असा आरोप विरोधकांकडून होत आहे. हेच मुद्दे येत्या निवडणुकीत प्रचारात राहणार आहे. बाजार समितीचा कारभार ढेपाळला शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून काम करणाऱ्या महागाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित संचालक मंडळ कार्यरत आहे. परंतु या संचालक मंडळाने बाजार समिती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी कोणतेही ठोस कार्य केले नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे. त्यामुळेच बाजार समितीचा सेसही कमी झाला आहे. हेच प्रमुख मुद्दे घेऊन विरोधक आता पुढे सरसावले असल्याचे चित्र दिसून येत आहे.