शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
6
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
7
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
8
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
9
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
10
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
11
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
12
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
13
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
14
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
15
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
16
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
17
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
18
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
19
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
20
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार

वृद्धांनी अनुभवला मायेचा ओलावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 23:24 IST

घरातील कर्ती माणसं वृद्ध झाली की त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविणारी अनेक पोरं समाजात वावरताना दिसतात. या वृद्धांना घरापासून लांब ठेवले जाते. तेथे अगदी परक्याप्रमाणे ते जीवन जगतात.

ठळक मुद्देअक्षय-वैशालीचा विवाह : ऊमरी पठार वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना खास वºहाडींचा सन्मान

ऑनलाईन लोकमतआर्णी : घरातील कर्ती माणसं वृद्ध झाली की त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविणारी अनेक पोरं समाजात वावरताना दिसतात. या वृद्धांना घरापासून लांब ठेवले जाते. तेथे अगदी परक्याप्रमाणे ते जीवन जगतात. मायेचा ओलावा आटलेला असतो. मात्र या वृद्धांनाच मानाने लग्नात निमंत्रित करून त्यांना ‘खास’ वऱ्हाडी म्हणून सन्मान देणारेही समाजात आहेत, याची प्रचिती आर्णीत आली.तालुक्यातील ऊमरी पठार येथील संत दोलाराम महाराज वृद्धाश्रमात अनेक वृद्ध वास्तव्याला आहेत. शेषराव डोंगरे त्यांची मायेने शुश्रृषा करतात. गेल्या २६ वर्षांपासून ते या वृद्धांंचा सांभाळ करतात. सोमवारी या वृद्धांना प्रथमच लग्न मानाने लग्न सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली.सोमवारी येथील बाळासाहेब गिरी यांचा धाकटा मुलगा अक्षयचे लग्न होते. लग्नाला राजकीय, सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. त्यांच्यासोबत वृद्धाश्रमातील ६० महिला, पुरुष या लग्नाचे खास पाहुणे होते.मंडपात सर्व वऱ्हाडी खाली बसले होते. मात्र या वृद्धांना विशेष खुर्चीवर बसविण्यात आले. बाळासाहेब गिरी व त्यांच्या पत्नी सुभाषिणी, वर अक्षय, त्याचा मोठा भाऊ अभिजित, त्याची पत्नी सोनाली, नववधू वैशाली यांच्यासह जावई, बहिणी या सर्वांनी वृद्धांना मायेचा ओलावा देत त्यांचा सत्कार केला. प्रत्येक वृद्धाजवळ जाऊन साष्टांग दंडवत घालत त्यांना कपडे दिले. मंगलाष्टकानंतर मानाची पंगत बसवून वृद्धाश्रमातील पाहुण्यांना सर्वप्रथम भोजन देण्यात आले. नंतरच इतर वऱ्हाड्यांना जेवण मिळाले.आदरातिथ्याने भारावलेलग्नातील आदरातिथ्याने सर्वच वृद्ध भारावून गेले. आपल्यांनी दुरावले, मात्र परक्यांनी आपुलकी दिल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची छटा दिसून येत होती. गेल्या २६ वर्षांत कुणी असा सन्मानच दिला नाही, असे मनोगत शेषराव डोंगरे यांनी व्यक्त केले. वृद्धांच्या चेहऱ्यावर काही काळापुरते का होईना हास्य उमलावे म्हणून आपण हा सर्व खटाटोप केल्याचे बाळासाहेब गिरी यांनी सांगितले.