शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील आठ हजार शिक्षकांची आर्थिक कोंडी

By admin | Updated: April 27, 2015 02:00 IST

जिल्हा परिषद शिक्षकांची अनेक प्रकरणे शिक्षण विभागाकडे प्रलंबित आहे.

यवतमाळ : जिल्हा परिषद शिक्षकांची अनेक प्रकरणे शिक्षण विभागाकडे प्रलंबित आहे. गेली तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. त्यामुळे शिक्षकांची आर्थिक कोंडी झाली आहे. बँका आणि पतसंस्थेच्या व्याजाचा भुर्दंड त्यांच्यावर पडत आहे. या प्रश्नांना घेवून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघातर्फे धरणे दिले जाणार आहे. २ मे रोजी हे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजुदास जाधव यांनी दिली. जिल्हा परिषदेतील जवळपास आठ हजार शिक्षकांना शिक्षण विभागाच्या वेळकाढू धोरणाचा फटका बसत आहे. नक्षलग्रस्त भागातील शिक्षकांच्या एकस्तर वेतनश्रेणीचा प्रश्न बरेच दिवसांपासून प्रलंबित आहे. नियमित १ तारखेला वेतन अदा करावे, असे निर्देश असताना त्याचे पालन केले जात नाही. चट्टोपाध्याय प्रकरणे धूळ खात पडून आहेत. भविष्य निर्वाह निधीचा अद्यावत हिशेब देवून प्रकरणे निकाली काढली जात नाही. सदर प्रश्नांसह शिक्षकांच्या आपसी बदल्या, अप्रशिक्षित आणि निमशिक्षकांना थकबाकी तत्काळ द्यावी आदी मागण्या राजुदास जाधव यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी आणि वित्त अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. ३० एप्रिलपर्यंत प्रश्न निकाली न निघाल्यास २ मे रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे दिले जाणार आहे. त्यात शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष राजुदास जाधव, विनोद गोडे, विलास भोयर, गौतम कांबळे, शेख जलील, नामदेव महल्ले, शेख लुकमान, राजेंद्र पिंपळशेंडे, आसाराम चव्हाण, गणेश कदम, आनंद कुंभलवार, साहेबराव राठोड, राजू दुधे, भानुदास राऊत, रामराव टेकाळे, नंदेश चव्हाण, अनिल सरताबे, दीपक दोडके, विजय डंभारे, दादाराव देशमुख, विष्णूदास चव्हाण, शत्रुघ्न चव्हाण, प्रवीण राणे, सचिन इंगोले, अजय अक्कलवार, सुदर्शन चव्हाण, बसवेश्वर डब्बावार, सुधाकर राऊत, संजय आगुलवार, गुणवंत इंगोले, सुरेश नरवाडे, शरद इंगळे, काशीनाथ आडे आदींनी केले आहे. (वार्ताहर)